शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केळीच्या नवीन लागवडीला आता सीएमव्ही रोगाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 00:06 IST

जून महिन्यात तीन वेळा झालेल्या वादळी पावसात ९०० हेक्टरमधील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर आता नवीन लागवड केलेल्या केळीवर कुक्कूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) चे संकट बांधावर घोंघावत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे.

ठळक मुद्दे रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिकावादळी पावसात ९०० हेक्टरमधील बागांचे नुकसान

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : जून महिन्यात तीन वेळा झालेल्या वादळी पावसात ९०० हेक्टरमधील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर आता नवीन लागवड केलेल्या केळीवर कुक्कूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) चे संकट बांधावर घोंघावत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे.रावेर तालुका केळीचे माहेर म्हणून ओळखला जातो. असे असले तरी या माहेरातच एकीकडे मायबाप सरकारकडून व व्यापारी वर्गाकडून केळी उत्पादकांना मेटाकुटीस आणले जात आहे, तर दुसरीकडे लहरी निसर्गाच्या आकांडतांडवाने केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे.हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराधार ठरली असताना जून महिन्यातील सुरुवातीच्या पंधरवड्यात वादळी पावसाने तडाखा दिल्याने तालुक्यातील सुमारे ३५ गावांमधील ९०० हेक्टरमधील उभ्या कापणीवरील केळीबागा भुईसपाट झाल्या. यात सुमारे ७५ कोटी रुपयांची अपरिचित हानी झाली आहे. विमा कंपनीने वाºयावर सोडले असताना ९५ कोटी अर्थात १ अब्ज रूपयांचा हा तोंडी आलेला मोठा घास निसर्गाने हिरावून घेतला. हे संकट कमी की काय मृगबहार लागवडीखालील केळीबागांवर कुक्कूंभर मोझॅक व्हायरस केळीबागांच्या बांधावर घोंघावू लागला आहे. तालुक्यातील विवरे बुद्रूक येथील एका केळीबागेत सात खोडांवर या रोगाचा प्रादुर्भाव यंदा प्रथमच आढळून आला आहे.रावेर व यावल तालुक्यात अजून वाढता प्रादुर्भाव नसला तरी, केळी बागांमधील व बांधावरील वाढते तण व वेलवर्गीय पिकांमुळे रसशोषक कीडींचा प्रादुर्भाव वाढून कुक्कूंभर मोझॅक व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत आहे. तणविरहीत बागा ठेवून व दर आठवड्याला न चुकता कीटकनाशकांची फवारणी करून त्यावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.जून महिन्याच्या आरंभीच पाऊस सुरू झाल्याने तणवाढ लवकर झाली. किंबहुना ढगाळ वातावरणात केणा, चिल्याची भाजी, दुधी या तणांसह बांधावरील जंगली तणाचे वेल तथा बांधालगत मका, चवळी, कपाशी, मिरची, वांगी आदी असल्यास त्यावर दर आठवड्याला इमिडा ८ मि.ली., अ‍ॅसिफेट १५ ग्रॅम, निंबोळी अर्क ५० मि.ली. असे मिश्रण १५ लीटर पाण्यात घेऊन दर आठवड्याला न चुकता फवारणी केल्यास कुक्कूंभर मोझॅक व्हायरसचा बंदोबस्त वेळीच करता येवू शकतो-डॉ.के.बी.पाटील, आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ, जळगाव

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर