शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रवादी काँग्रेसची युवा जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 22:58 IST

चंद्रशेखर जोशी एकेकाळी जिल्ह्यात भक्कम स्थान असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. केवळ पारोळा ...

चंद्रशेखर जोशीएकेकाळी जिल्ह्यात भक्कम स्थान असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. केवळ पारोळा विधानसभा मतदार संघातील डॉ. सतीश पाटील हे विजयी झाले. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्राबल्यही कमी झाले तर काही ठिकाणची सत्ता या पक्षाला गमवावी लागली. त्यानंतर चार वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, कृषि उत्पन्न बाजार समित्या, नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्येही हा पक्ष फारसा चमत्कार दाखवू शकला नाही. त्यामुळे काहीशी मरगळ गत काळात पक्षात होती. जिल्ह्यातील दिग्गज नेते या पक्षाकडे आहेत. माजी मंत्री, विधासभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन यासह काही माजी आमदार व माजी खासदार या पक्षात आहेत. असे असताना सातत्याने पदरी पडलेले अपयश पक्षाच्या नेत्यांनाही धक्कादायक ठरले आहेत. गत तीन-साडेतीन वर्षात काही मोजकी आंदोलने वगळता पक्षाकडून फारशी आक्रमक आंदोलने सरकार विरोधात झाली नाही, काहीशी मरगळ दिसून आली. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यात काही संघटनात्मक बदल पक्षश्रेष्ठींनी केले. यात जिल्हाध्यक्षपदीची जबाबदारीअ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. महानगरातील अध्यक्षांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेची वाट धरली. या पदावर गेल्या आठवड्यात पक्षातील एक पदाधिकारी नामदेव चौधरी यांच्यावर महानगर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यातच या आठवड्याच्या प्रारंभी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्याचा दौरा केला. जिल्ह्यातील युवा शक्तीला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात कार्यक्रम राबविले गेले. महाविद्यालयीन युवक-युवतींशी संवाद, महिला मेळावे, कार्यकर्त्यांशी संवाद असे कार्यक्रम सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाले. या काळात जिल्ह्यातील काही प्रलंबित विषयांना त्यांनी हात घालून जनमत आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमती, हमी भाव, भारनियमन, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरची भाववाढ असे महिलांशी संबंधीत विषय महिलांशी साधलेल्या संवादातून मांडले. थेट महिलांशी प्रश्नोत्तर स्वरूपात त्यांनी संवाद साधला. पक्षाचा कार्यकर्ता आगामी निवडणुकांसाठी तयार व्हावा असे त्यांचे प्रयत्न दिसून आले. येता काळ निवडणुकांचा असल्यामुळे त्यांनी दिलेल्या हाकेला कितपत साथ मिळते हे येता काळच ठरवेल.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस