शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

राष्टÑवादी काँग्रेस पार्टी हाच सक्षम पर्याय - अनिल भाईदास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 15:33 IST

संस्थात्मक अनुभवाच्या बळावर उमेदवारीची अपेक्षा

जळगाव : शरद पवार यांच्यासारख्या कर्तृत्ववान, द्रष्ट्या नेतृत्वाकडून जनसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. भाजपा-शिवसेनेला राष्टÑवादी काँग्रेस पार्टी हा सक्षम पर्याय ठरू शकतो, असा विश्वास निर्माण करण्यात आम्हाला यश आले असल्याचा दावा जिल्हा बँकेचे संचालक व जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीची तयारी वेगात सुरू असून पक्षीय पातळीवर इच्छुक, सक्षम, प्रबळ अशा उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या पाटील यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली आणि निवडणुकीविषयी मनमोकळी चर्चा केली.प्रश्न: राजकीय वारसा नसतानाही तुम्ही संस्थात्मक जीवनात मोठी कामगिरी केली. याठिकाणी काम करताना तुम्हाला काय अनुभव आला?पाटील : मला राजकीय पार्श्वभूमी नाही, हे अगदी खरे आहे. माझे वडील नोकरदार होते. माझा जन्म भडगावचा आहे. माझे शिक्षण चाळीसगाव, जळगाव येथे झाले. उच्चशिक्षणासाठी पुण्यात सिंबायसीसमध्ये गेलो. सध्या अमळनेरात वास्तव्य व व्यवसाय करीत आहे. विविध कार्यकारी सहकारी संस्थेपासून माझ्या संस्थात्मक जीवनाला सुरुवात झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचा १० वर्षे सभापती, जिल्हा परिषदेचा १० वर्षे सदस्य, जिल्हा बँकेचा १० वर्षे संचालक आहे. अमळनेर पालिकेत पत्नी जयश्री या नगराध्यक्ष होत्या. यंदाही आमची आघाडी विजयी झाली. पण पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे.प्रश्न : लोकसभा निवडणूक लढविण्यामागील कारणमीमांसा काय?पाटील : माझा संस्थात्मक अनुभव पाहता प्रत्येक संस्थेचे कार्यक्षेत्र निश्चित असते. विविध कार्यकारी संस्था, जिल्हा बँक, जिल्हा परिषद गट, पालिका क्षेत्र असा अनुभव घेतल्यानंतर लक्षात आले की, सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघ हा व्यापक आणि लोकाभिमुख कार्य करण्याची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्याला आव्हानात्मक असा आहे. केंद्र सरकारच्या विविध खात्यांचा मोठा निधी अभ्यासपूर्वक मतदारसंघात आणता येईल, असा मला विश्वास आहे.प्रश्न : तुम्ही राष्टÑवादी काँग्रेस पक्षात नवखे आहात, तुम्हाला स्विकारले जाईल, असे वाटते.पाटील : शरद पवार यांचा परिसस्पर्श झालेल्या या पक्षात खुलेपणा, दिलदारपणा असल्याचे अल्पावधीत जाणवले. तळागाळातील माणसांचा तसेच शेतकºयांचा विचार करणारा हा पक्ष आहे. समुद्रातील थेंब बनून त्यात मी सहभागी झालो आहे.प्रश्न : हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हटला जातो, मग राष्टÑवादी काँग्रेस कशी लढत देणार?पाटील : २००९ मध्ये आमचे ५ आमदार या मतदारसंघातून निवडून आले होते.काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसचे चांगले समन्वय आणि संवाद आहे. पाच वर्षातील भाजपा सरकारच्या कामगिरीने जनता निराश झाली आहे, त्यांना बदल हवा आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत.प्रश्न : भाजपा सोडण्याचे कारण काय ?पाटील: २००९ आणि २०१४ मध्ये अमळनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने मला उमेदवारी दिली. परंतु, स्थानिक पदाधिकाºयांचे असहकार्य, विरोधकांना केलेली मदत यामुळे पराभव झाला. भाजपामध्ये कार्यकर्त्यांचा फक्त वापर केला जातो, हा अनुभव आला. म्हणून पक्ष सोडला.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव