शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादी काँग्रेस पार्टी हाच सक्षम पर्याय - अनिल भाईदास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 15:33 IST

संस्थात्मक अनुभवाच्या बळावर उमेदवारीची अपेक्षा

जळगाव : शरद पवार यांच्यासारख्या कर्तृत्ववान, द्रष्ट्या नेतृत्वाकडून जनसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. भाजपा-शिवसेनेला राष्टÑवादी काँग्रेस पार्टी हा सक्षम पर्याय ठरू शकतो, असा विश्वास निर्माण करण्यात आम्हाला यश आले असल्याचा दावा जिल्हा बँकेचे संचालक व जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीची तयारी वेगात सुरू असून पक्षीय पातळीवर इच्छुक, सक्षम, प्रबळ अशा उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या पाटील यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली आणि निवडणुकीविषयी मनमोकळी चर्चा केली.प्रश्न: राजकीय वारसा नसतानाही तुम्ही संस्थात्मक जीवनात मोठी कामगिरी केली. याठिकाणी काम करताना तुम्हाला काय अनुभव आला?पाटील : मला राजकीय पार्श्वभूमी नाही, हे अगदी खरे आहे. माझे वडील नोकरदार होते. माझा जन्म भडगावचा आहे. माझे शिक्षण चाळीसगाव, जळगाव येथे झाले. उच्चशिक्षणासाठी पुण्यात सिंबायसीसमध्ये गेलो. सध्या अमळनेरात वास्तव्य व व्यवसाय करीत आहे. विविध कार्यकारी सहकारी संस्थेपासून माझ्या संस्थात्मक जीवनाला सुरुवात झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचा १० वर्षे सभापती, जिल्हा परिषदेचा १० वर्षे सदस्य, जिल्हा बँकेचा १० वर्षे संचालक आहे. अमळनेर पालिकेत पत्नी जयश्री या नगराध्यक्ष होत्या. यंदाही आमची आघाडी विजयी झाली. पण पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे.प्रश्न : लोकसभा निवडणूक लढविण्यामागील कारणमीमांसा काय?पाटील : माझा संस्थात्मक अनुभव पाहता प्रत्येक संस्थेचे कार्यक्षेत्र निश्चित असते. विविध कार्यकारी संस्था, जिल्हा बँक, जिल्हा परिषद गट, पालिका क्षेत्र असा अनुभव घेतल्यानंतर लक्षात आले की, सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघ हा व्यापक आणि लोकाभिमुख कार्य करण्याची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्याला आव्हानात्मक असा आहे. केंद्र सरकारच्या विविध खात्यांचा मोठा निधी अभ्यासपूर्वक मतदारसंघात आणता येईल, असा मला विश्वास आहे.प्रश्न : तुम्ही राष्टÑवादी काँग्रेस पक्षात नवखे आहात, तुम्हाला स्विकारले जाईल, असे वाटते.पाटील : शरद पवार यांचा परिसस्पर्श झालेल्या या पक्षात खुलेपणा, दिलदारपणा असल्याचे अल्पावधीत जाणवले. तळागाळातील माणसांचा तसेच शेतकºयांचा विचार करणारा हा पक्ष आहे. समुद्रातील थेंब बनून त्यात मी सहभागी झालो आहे.प्रश्न : हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हटला जातो, मग राष्टÑवादी काँग्रेस कशी लढत देणार?पाटील : २००९ मध्ये आमचे ५ आमदार या मतदारसंघातून निवडून आले होते.काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसचे चांगले समन्वय आणि संवाद आहे. पाच वर्षातील भाजपा सरकारच्या कामगिरीने जनता निराश झाली आहे, त्यांना बदल हवा आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत.प्रश्न : भाजपा सोडण्याचे कारण काय ?पाटील: २००९ आणि २०१४ मध्ये अमळनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने मला उमेदवारी दिली. परंतु, स्थानिक पदाधिकाºयांचे असहकार्य, विरोधकांना केलेली मदत यामुळे पराभव झाला. भाजपामध्ये कार्यकर्त्यांचा फक्त वापर केला जातो, हा अनुभव आला. म्हणून पक्ष सोडला.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव