शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

“१९९३ ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला”: एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 17:06 IST

देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य पंतप्रधान मोदींनाही मान्य नसेल, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

जळगाव: एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावानंतर महाविकास आघाडी आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांची धार अधिकच वाढत चाललेली दिसत आहे. यातच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fanavis) यांनी शिवसेनेवर टीका करताना जनाब बाळासाहेब असा शब्दप्रयोग केला होता. यावरून आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना, १९९३ ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला, असे म्हटले आहे. 

हिंदुत्वाचे प्रखर विचार मांडणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या लेखणीतून व वाणीतून समाज जागृत करण्याचे काम केले आहे, असे सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना झाल्या, असे एकनाथ खडसे यांनी नमूद केले आहे. देवेंद्र फडणवीस मला वडीलधारे मानत असतील तर त्यांना सल्ला देऊन उपयोग आहे. मात्र देवेंद्र फडणवीस सातत्याने करत असलेले वक्तव्य हे नैराश्येतून आलेले वक्तव्य असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

बाळासाहेबांचा मला अनेक वर्ष सहवास राहिला

देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांना जनाब म्हटले. माझ्या मनाला तीव्र वेदना झाल्या. बाळासाहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान राहिले आहे. बाळासाहेबांचा मला अनेक वर्ष सहवास राहिला आहे. मी त्यांच्याकडे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांसोबत गेलो आहे. हिंदुत्वाबद्दल त्यांच्यातला जाज्वल्य अभिमान त्यांच्या लेखणीतून मी अनुभवलेला आहे. १९९३ मध्ये जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट झाले, तेव्हा मी आमदार होतो. तेव्हाची बाळासाहेबांची भूमिका अतुलनीय आहे. बाळासाहेब होते, म्हणून त्या काळात मुंबईतला हिंदू सुरक्षित राहिला. हे कुणीही नाकारू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हादरलेला आणि घाबरलेला होता. रक्ताचे पाट वाहात होते. अशा काळात मदतीला कुणीही गेले नव्हते. तेव्हा बाळासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो लोक रस्त्यावर उतरलेले मी पाहिले, अशी आठवण खडसे यांनी सांगितली. 

पंतप्रधान मोदी यांनी कायम बाळासाहेबांचा आदरच केला 

देवेंद्र फडणीस यांचे वक्तव्य हे पंतप्रधानांनाही मान्य नसेल, कारण नरेंद्र मोदी यांनी कायम बाळासाहेबांचा आदरच केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे वक्तव्य आम्ही कधी अनुभवले नाही, अशी बोचरी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे