शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Sharad Pawar on BJP-MNS Yuti: भाजप आणि मनसेची युती होईल का? शरद पवारांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:23 IST

Sharad Pawar on BJP-MNS Yuti: सध्या समाजातील सामाजिक ऐक्य धोक्यात येत असून, ही चिंतनीय बाब असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

जळगाव: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या लागोपाठ झालेल्या दोन सभांनंतर राज्यातील राजकारण अधिकच तापताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यानंतर शरद पवार यांनीही राज ठाकरेंवर पलटवार केला. राज ठाकरे यांच्या मुद्द्यांचे समर्थन भाजप करताना पाहायला मिळत असून, आता पुन्हा एकदा भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत. जळगाव दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. 

जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जातीयवादी का म्हटले, हे माहित नाही. मात्र, फडणवीस यांनी केलेल्या ट्विटचा आनंद घेतोय, असा मिश्किल टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला. तसेच सर्वांना सोबत घेण्याची आमची निती आहे. राज्यात विरोधकांचे स्वप्नभंग झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप शरद पवार यांनी यावेळी बोलताना केला. 

मनसे व भाजप यांची युती होईल की नाही? 

या पत्रकार परिषदेत भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांविषयी शरद पवार यांना विचारले असता, मनसे व भाजप यांची युती होईल की नाही याबाबत सांगू शकत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे हे सध्या हिंदुत्वाकडे वळत आहेत, असेही पवार म्हणाले. राज ठाकरे यांनी दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांचा संदर्भ देत शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. यावर बोलताना, जेम्स लेन हे चांगले शिवअभ्यासक आहेत असे कौतुक बाबासाहेब पुरंदरे यांनी केले होते. जेम्स लेन यांच्या पुस्तकात शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण आहे, असे सांगत सध्या समाजातील सामाजिक ऐक्य धोक्यात येत आहे. ही चिंतनीय बाब असल्याचा दावा शरद पवार यांनी केला.

दरम्यान, आताच्या घडीला राज्यावर भारनियमनाचे संकट ओढावलेले आहे. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आले. महाराष्ट्रात सध्या भारनियमन सुरु आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जामंत्री संपर्कात आहे. राज्य शासन वीजेच्या प्रश्नाबाबत गंभीर आहे, असे शरद पवार म्हणाले.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेJalgaonजळगाव