शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

भाजपचे दोन मते फुटल्याने पहूरला राष्ट्रवादीचा उपसरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 10:37 PM

भाजपच्या सत्तेला सुरुंग : श्यामराव साळवे यांनी मारली बाजी

पहूर, ता. जामनेर : पेठ ग्रामपंचायत मध्ये उपसरंपच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे दोन मते फोडण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी होऊन उपसरपंचपदी श्यामराव नामदेव सावळे यांनी विजय प्राप्त केला असून भाजपाचे बहुमत असतांनाही राष्ट्रवादीने भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावला आहे. यामुळे तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र ते भाजपचे बंडखोर सदस्य कोण? हा स्थानिक भाजपासाठी चिंतनाचा विषय आहे.भाजपाने गेल्या वर्षी प्राप्त केला होता ऐतिहासिक विजयभाजपाने गेल्या वर्षी निसटता ऐतिहासिक विजय प्राप्त करून सत्ता स्थापन केली होती. यात भाजपाचे नऊ सदस्य तर राष्ट्रवादीचे आठ सदस्य असे संख्या बळ होते.भाजपाचे उपसरपंच रवींद्र मोरे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने एप्रिलमध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.या रिक्त पदासाठीसोमवारी पिठासीन अधिकारी सरंपच निता रामेश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यासाठी भाजपाकडून महेराजबी शेख बिसमिल्ला यांनी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी कडून श्यामराव नामदेव सावळे यांचा अर्ज होता. त्यांना भाजपच्या दोन बंडखोर सदस्यांनी मतदान केल्याने श्यामराव सावळे यांना दहा मते मिळाली. यामुळे त्यांची उपसंरपच पदी निवड झाली. तर महेराजबी यांना फक्त सात मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला, गोपनीय पध्दतीने मतदान घेण्यात आले आहे.यामुळे काही काळ ग्रामपंचायत मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादी भाजपाच्या सत्तेत वाटकरी झाल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आंनंद साजरा केलो. तर भाजपच्या गोटात धक्काच बसल्याचे दिसून आले आहे. निवडणूकीसाठी दोन्हींकडून पाच अर्ज दाखल झाले होते.माघारीच्या दरम्यान तीन अर्ज मागे घेण्यात आले होते. महेराजबी शेख बिसमिल्ला या सहा नंबर वाडार्तून ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या एका मताने विजयी झाल्या आहेत.माजी सरंपंचाचे वर्चस्वमाजी सरंपच प्रदिप लोढा यांनी पेठ ग्रामपंचायतची एक हाती सत्ता पंचवीस वर्षे हातात ठेवली. गेल्या वर्षी त्यांच्या हातून सत्ता निसटली. मात्र उपसरपंच पदासाठी त्यांचे समर्थक श्यामराव सावळे यांना त्यांनी भाजपच्या दोन सदस्यांच्या सहाय्याने भाजपच्या सत्तेत सहभागी केल्याने त्यांच्या चाणक्य नितीचा अनुभव पुन्हा पहूकरांना आला असून लोढांचे वर्चस्व सिध्द झाले आहे.कसबेची पुनरावृत्तीपहूर कसबेत तीन वषार्पूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे बहूमत होते. मात्र एक भाजपचे मत फुटल्याने राष्ट्रवादीचे योगेश भडांगे उपसरपंच झाले आहे. याचीच पुनरावृत्ती पेठ ग्रामपंचायत मध्ये झाल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र पेठ ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे फुटलेले बंडखोर सदस्य दोन कोणते असा प्रश्न समोर आला आहे.निवडणुकीच्या वेळी रामेश्वर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख, भाजपा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सलीम शेख गणी, माजी सरंपच प्रदिप लोढा, संदीप बेढे, आर.बी.पाटील, समाधान पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.भाजपाला अंतर्गत गटबाजीचा फटकापेठ ग्रामपंचायतची सत्ता हातात घेण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करून राजकीय रणनीतीचा वापर करीत तत्कालीन सरंपच प्रदिप मोहनलाल लोढा यांच्या ताब्यातून सत्ता हातात घेतली. सरंपचपदी भाजाच्या निता पाटील यांची लोकनियुक्त मधून निवड झाली. मात्र सत्ता हातात घेतल्या पासून अंतर्गत हेवेदावे पाहण्यास मिळाले. प्रत्येक कार्यक्रमांमधून गटबाजी दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. त्याचा फायदा विरोधी गटाने उचलून भाजपाचे दोन बंडखोर सदस्य आपल्या गळाला लावल्याची चर्चा सुरू आहे.