शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड म्हणतात... ‘मी मराठीत शिकलो, हे माझं सौभाग्यच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 01:32 IST

मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत मराठी भाषेसंदर्भात आपली मतं मांडताहेत नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड

‘मी महाराष्टÑात जन्म घेतला आणि ज्या मातीत जन्मलो, त्याच मातृभाषेत मला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेता आले, हे माझे सौभाग्यच, नव्हे तर मराठी भाषेमुळेच मला शिक्षणाची गोडी लागली आणि संस्काराचे धडेही मिळाले म्हणूनच मला आयएएस होता आले’ असे नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड अभिमानाने सांगतात.डॉ.राजेंद्र भारुड यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. प्रतिकूल परिस्थितीत अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत त्यांचे शिक्षण झाले. पण त्यांची जिद्द, चिकाटी आणि बुद्धीमत्तेपुढे परिस्थितीलाही हार मानावी लागली. आणि डॉ.राजेंद्र भारुड नावाचे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व नव्या पिढीला मिळाले. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘मी एक स्वप्न पाहिले’ हे पुस्तक आजही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. सध्या बहुतांश पालकांना मुलाला जर उच्च शिक्षित करायचे असेल तर त्याला इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण दिले गेले पाहिजे, असा समज आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.राजेंद्र भारुड सांगतात, ‘खरे तर इंग्रजीतून शिक्षण घेतले तरच मुलगा उच्चशिक्षित होतो यावर माझा विश्वास नाही. ज्या मातीत तुम्ही जन्माला येतात त्याच मातृभाषेत जर तुमचे प्राथमिक शिक्षण झाले तर ते खऱ्या अर्थाने प्रभावीत ठरते. कारण ती भाषा आपली असते, ते शब्द आपल्या हृदयापर्यंत भिडतात. साहजिकच त्यामुळे शिक्षणाचीही गोडी निर्माण होते. मराठी भाषेबद्दल बोलायचे झाल्यास ही भाषा सुसंस्कृत व समृद्ध भाषा आहे. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झाले. ते माझे सौभाग्यच मानतो. भले त्या माझ्या शाळेला भव्य व आधुनिक इमारतीऐवजी ती शेणाने सारवलेली होती, कौलारू होती पण त्यात आपुलकीचे वातावरण होते. माझे गुरुजी देवरे गुरुजी, पगारे गुरुजी, भारती बाई यांनी दिलेले शिक्षण आजही माझ्या स्मरणात आहे. त्या शाळेत मला जे शिक्षण मिळाले त्यातूनच आयएएस होण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे पालकांना माझे आवाहन आहे की, आपली मुले इंग्रजी शाळेत पाठवली म्हणजे ते उच्चशिक्षित होतीलच असा समज करुन घेऊ नका. कुठलेही बीज लावल्या लावल्या त्याचे फळ मिळत नाही. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलाला शाळेत शिक्षणाबद्दल आवड निर्माण होणे महत्त्वाचे आहे. ही आवड विशेषत: स्वत:च्या भाषेतील शिक्षणातूनच मिळू शकते. त्यासाठी मराठी उत्तम पर्याय असून मराठी भाषेचे भविष्य उज्वल असल्याचे ते सांगतात.(शब्दांकन : रमाकांत पाटील)

टॅग्स :literatureसाहित्यnandurbar-acनंदुरबार