शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बंडखोरीच्या नावाने चांगभल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:25 IST

चंद्रशेखर जोशीजळगाव : निवडणुका आणि तत्व हे समिकरणाचा आता दूरदूरवर संबंध उरलेला नाही. याची प्रचिती महापालिका निवडणुकांच्या दरम्यान व त्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यक्षेत्रात पहायला मिळाली. काही पक्ष हे तत्वसोडून राजकारण करत नसत. आज त्यांची स्थिती पहाता तत्वाशी काहीही संबंध नाही असेच अनुभव येतायं. तत्वांचा विचार करता. भाजपाबाबत अनेक जण अतिशय ...

चंद्रशेखर जोशीजळगाव : निवडणुका आणि तत्व हे समिकरणाचा आता दूरदूरवर संबंध उरलेला नाही. याची प्रचिती महापालिका निवडणुकांच्या दरम्यान व त्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यक्षेत्रात पहायला मिळाली. काही पक्ष हे तत्वसोडून राजकारण करत नसत. आज त्यांची स्थिती पहाता तत्वाशी काहीही संबंध नाही असेच अनुभव येतायं. तत्वांचा विचार करता. भाजपाबाबत अनेक जण अतिशय चांगल्या भूमिका मांडत. निवडणुकीत यश आले नाही तरी चालेल पण तत्वाशी तडजोड नको अशीच भूमिका पक्षाची व पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्ते व नेत्यांची असायची. यात उदाहरणच द्यायचे झाले तर उमेदवारीवरून होणाºया वादांची. उमेदवारी मिळावी, आपल्यालाही संधी मिळावी अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. ती पूर्ण न झाल्यास जे खरोखर तत्वनिष्ठ असतात ते हिरमुसतात, नाराज होतात पण शांत बसून कामाला लागतात. पण ज्यांच्यातील महत्वाकांक्षा जागृत झाली असेल ते शांत बसत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच याच जीद्दीने ते काम करतात व बंडखोरी करतात. आम्ही आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्यात का? अशी त्यांची भावना असते. पूर्वी अशी भूमिका असलेल्यांना स्थानिक प्रमुख पदाधिकारी बंडखोरीची शिक्षा काही दिवसातच द्यायचे. निवडणुकीच्या काळातच संबंधीतास पक्षातून काढायचे किंवा निवडणूक लढवत असलेल्या या व्यक्तीचा आता पक्षाशी काहीही संबंध नाही असे जाहीर केले जात असे. मात्र आज या उलट परिस्थिती दिसून येत आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करूनही नेतृत्व करणारे पदाधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेतात. पक्षाविरोधात बंडखोरी केली तरी आपल्या बंडखोर आपल्या कामाचा आहे. पुढची निवडणूक आपली आहे, त्यावेळी साथ मिळणार नाही. अशी भूमिका नेते मंडळी घेतात. ही भूमिका बंडखोरांना फावते. आपले कोणी काही बिघडवू शकत नाही... अशी भूमिका यामुळे बळावते आहे. त्यामुळे तत्ववगैरे सब झुट...बंडखोरीच्या नावाने चांगभल अशीच परस्थिती राजकीय पक्षांच्या पातळ्यांवर दिसत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावElectionनिवडणूक