शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सीताफळाप्रमाणे प्रतिकुलतेतून उभे राहत दीदींनी स्वरांचा गोडवा दिल्याने सीताफळाचे झाले ‘लता’ फळ; कवीवर्य ना.धों. महानोर यांची अनोखी आराधना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 16:30 IST

दिनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले त्या वेळी लता मंगेशकर केवळ साडे अकरा वर्षांच्या होत्या. इतर भावंडे तर लहानच होते. त्या वेळी आर्थिक स्थिती बिकट असताना घराचे भाडे देणेही कठीण असताना लता दीदी उभ्या राहिल्या व आपल्या गायनातून गोड स्वर दिला, असे महानोर लता फळाची पार्श्वभूमी सांगताना म्हणाले.

- विजयकुमार सैतवाल

जळगाव- कमी पाणी व खडकाळ जमीन अशा प्रतिकूल परिस्थितीतूनही फुलून गोड फळ देणाऱ्या सीताफळाच्या झाडाप्रमाणे सर्व संकटावर मात करीत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देशाला, जगाला गोड स्वर दिला. सीताफळ व दीदींच्या आवाजातील हा गोडवा कोठेही मिळू शकत नाही, यामुळेच आपण आपल्या उद्यानातील सीताफळांना ‘लता’ फळ असे नाव दिले, असे अभिमानाने कवीवर्य ना.धों. महानोर यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणी जागविताना सांगितले. गेल्या ६२ वर्षांपासून अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पळासखेडा या महानोर यांच्या गावात लता फळ फुलत आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त धडकले आणि दीदींसोबत काम करीत असतानाच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्याचे ना.धों. महानोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या वेळी त्यांनी लता फळाचा आवर्जून उल्लेख केला. 

संकटातूनही उभी राहिली अनोखी प्रतिभा

दिनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले त्या वेळी लता मंगेशकर केवळ साडे अकरा वर्षांच्या होत्या. इतर भावंडे तर लहानच होते. त्या वेळी आर्थिक स्थिती बिकट असताना घराचे भाडे देणेही कठीण असताना लता दीदी उभ्या राहिल्या व आपल्या गायनातून गोड स्वर दिला, असे महानोर लता फळाची पार्श्वभूमी सांगताना म्हणाले. सीताफळाचे झाड ज्या प्रमाणे खडकाळ जमिनीत कमी पाण्यात उभे राहून गोड फळ देते त्या प्रमाणेच घरातील बिकट स्थितीतूनही दीदी उभ्या राहिल्या व अजरामर स्वरांची अनोखी प्रतिभाच जगाला मिळाली, असे ना.धों. महानोर यांनी सांगितले. त्यांचा हा खडतर प्रवास सीताफळाच्या झाडाप्रमाणेच असल्याने आपण आपल्या शेतातील उद्यानाला १९६०मध्ये लता मंगेशकर उद्यान नाव देत फळही लता फळ नावाने केल्याचे महानोर यांनी सांगितले. 

माझ्या आजोळच्या गाण्यांना खान्देशचा लय!

शेतातील फळांसोबतच गाणे, कवितांविषयीचा अनुभव सांगताना महानोर म्हणाले की, त्यांच्यासोबत ‘जैत रे जैत’ हा चित्रपट करण्याची संधी मिळाली. त्यावेळी दीदींनी मलाच गाणी लिहिण्याचा आग्रह केला. यानिमित्ताने मार्च १९७७मध्ये गुडीपाडव्याचा दिवस त्यांच्या सोबत घालविला तो दिवस माझ्यासाठी मोठा गोड दिवस ठरला, असाही उल्लेख महानोर यांनी केला. त्या वेळी मी १६ गाणे लिहिली. त्यानंतर पुन्हा सहा गाणी लिहायला सांगितली. हे सांगत असताना  ‘माझ्या आजोळातील या गाण्यांना खान्देशचा लय असतो’, असे कौतुकाने दीदी म्हणाल्याचे महानोर यांनी सांगितले.

माझ्या शब्दांना दीदींच्या स्वराचा स्पर्श मिळणे माझे भाग्य-

देशाला आपला आवाज देताना सर्वस्व अर्पण करणाऱ्या लता मंगेशकर म्हणजे गीतकार, संगीतकार, कलावंत यांच्यासाठी स्वरसाधनेची अनोखी देणगीच म्हणावी लागेल. त्यांच्या स्वरांच्या स्पर्शामुळेच ही सर्व मंडळी एका उंचीवर पोहचली. यामध्ये माझ्या शब्दांनादेखील दीदींच्या स्वराचा स्पर्श मिळणे हे माझे भाग्यच आहे, असेही भावनिक उद्गार ना.धों. महानोर यांनी काढले. ‘जैत रे जैत’ या चित्रपटाच्या वेळी माझ्यासह सर्व टीम नवीन होती. त्या वेळी दीदी आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या व हा चित्रपट आकाराला आला. त्यानंतर दीदींना मला गाणे लिहिण्याची संधी दिली व माझ्या शब्दांना दीदींचा स्वर मिळत गेला. त्यामुळे ही गाणी अजरामर झाली.  राजकारण असो की कोणतेही क्षेत्र असो, काम झाले की त्या व्यक्तीचा विसर पडतो. मात्र लता मंगेशकर या माझ्या प्रत्येक सुख-दु:खात नेहमी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, असेही महानोर म्हणाले.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकर