शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

सीताफळाप्रमाणे प्रतिकुलतेतून उभे राहत दीदींनी स्वरांचा गोडवा दिल्याने सीताफळाचे झाले ‘लता’ फळ; कवीवर्य ना.धों. महानोर यांची अनोखी आराधना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 16:30 IST

दिनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले त्या वेळी लता मंगेशकर केवळ साडे अकरा वर्षांच्या होत्या. इतर भावंडे तर लहानच होते. त्या वेळी आर्थिक स्थिती बिकट असताना घराचे भाडे देणेही कठीण असताना लता दीदी उभ्या राहिल्या व आपल्या गायनातून गोड स्वर दिला, असे महानोर लता फळाची पार्श्वभूमी सांगताना म्हणाले.

- विजयकुमार सैतवाल

जळगाव- कमी पाणी व खडकाळ जमीन अशा प्रतिकूल परिस्थितीतूनही फुलून गोड फळ देणाऱ्या सीताफळाच्या झाडाप्रमाणे सर्व संकटावर मात करीत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देशाला, जगाला गोड स्वर दिला. सीताफळ व दीदींच्या आवाजातील हा गोडवा कोठेही मिळू शकत नाही, यामुळेच आपण आपल्या उद्यानातील सीताफळांना ‘लता’ फळ असे नाव दिले, असे अभिमानाने कवीवर्य ना.धों. महानोर यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणी जागविताना सांगितले. गेल्या ६२ वर्षांपासून अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पळासखेडा या महानोर यांच्या गावात लता फळ फुलत आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त धडकले आणि दीदींसोबत काम करीत असतानाच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्याचे ना.धों. महानोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या वेळी त्यांनी लता फळाचा आवर्जून उल्लेख केला. 

संकटातूनही उभी राहिली अनोखी प्रतिभा

दिनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले त्या वेळी लता मंगेशकर केवळ साडे अकरा वर्षांच्या होत्या. इतर भावंडे तर लहानच होते. त्या वेळी आर्थिक स्थिती बिकट असताना घराचे भाडे देणेही कठीण असताना लता दीदी उभ्या राहिल्या व आपल्या गायनातून गोड स्वर दिला, असे महानोर लता फळाची पार्श्वभूमी सांगताना म्हणाले. सीताफळाचे झाड ज्या प्रमाणे खडकाळ जमिनीत कमी पाण्यात उभे राहून गोड फळ देते त्या प्रमाणेच घरातील बिकट स्थितीतूनही दीदी उभ्या राहिल्या व अजरामर स्वरांची अनोखी प्रतिभाच जगाला मिळाली, असे ना.धों. महानोर यांनी सांगितले. त्यांचा हा खडतर प्रवास सीताफळाच्या झाडाप्रमाणेच असल्याने आपण आपल्या शेतातील उद्यानाला १९६०मध्ये लता मंगेशकर उद्यान नाव देत फळही लता फळ नावाने केल्याचे महानोर यांनी सांगितले. 

माझ्या आजोळच्या गाण्यांना खान्देशचा लय!

शेतातील फळांसोबतच गाणे, कवितांविषयीचा अनुभव सांगताना महानोर म्हणाले की, त्यांच्यासोबत ‘जैत रे जैत’ हा चित्रपट करण्याची संधी मिळाली. त्यावेळी दीदींनी मलाच गाणी लिहिण्याचा आग्रह केला. यानिमित्ताने मार्च १९७७मध्ये गुडीपाडव्याचा दिवस त्यांच्या सोबत घालविला तो दिवस माझ्यासाठी मोठा गोड दिवस ठरला, असाही उल्लेख महानोर यांनी केला. त्या वेळी मी १६ गाणे लिहिली. त्यानंतर पुन्हा सहा गाणी लिहायला सांगितली. हे सांगत असताना  ‘माझ्या आजोळातील या गाण्यांना खान्देशचा लय असतो’, असे कौतुकाने दीदी म्हणाल्याचे महानोर यांनी सांगितले.

माझ्या शब्दांना दीदींच्या स्वराचा स्पर्श मिळणे माझे भाग्य-

देशाला आपला आवाज देताना सर्वस्व अर्पण करणाऱ्या लता मंगेशकर म्हणजे गीतकार, संगीतकार, कलावंत यांच्यासाठी स्वरसाधनेची अनोखी देणगीच म्हणावी लागेल. त्यांच्या स्वरांच्या स्पर्शामुळेच ही सर्व मंडळी एका उंचीवर पोहचली. यामध्ये माझ्या शब्दांनादेखील दीदींच्या स्वराचा स्पर्श मिळणे हे माझे भाग्यच आहे, असेही भावनिक उद्गार ना.धों. महानोर यांनी काढले. ‘जैत रे जैत’ या चित्रपटाच्या वेळी माझ्यासह सर्व टीम नवीन होती. त्या वेळी दीदी आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या व हा चित्रपट आकाराला आला. त्यानंतर दीदींना मला गाणे लिहिण्याची संधी दिली व माझ्या शब्दांना दीदींचा स्वर मिळत गेला. त्यामुळे ही गाणी अजरामर झाली.  राजकारण असो की कोणतेही क्षेत्र असो, काम झाले की त्या व्यक्तीचा विसर पडतो. मात्र लता मंगेशकर या माझ्या प्रत्येक सुख-दु:खात नेहमी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, असेही महानोर म्हणाले.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकर