शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

माझ्या मना लागो छंद ... नित्य गोविंद गोविंद... इंजिनिअर झाला जळगाव इस्कॉन शाखेचा प्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:59 IST

चांगला युवक घडविण्यासाठी चैतन्य जीवनदासची धडपड

चुडामण बोरसे जळगाव : उच्च शिक्षण घेऊनही त्याचा ओढा अध्यात्माकडे होता. याच आवडीतून त्याला सवड मिळाली आणि सवडीतून जणू छंद लागला. आणि ‘माझ्या मना लागो छंद .... नित्य गोविंद गोविंद या संत एकनाथ महाराजांच्या अभंगासारखीच अशीच स्थिती या युवकाची झाली आणि आज तो जळगावच्या इस्कॉन शाखेचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता मुखोदगत करीत तो आता प्रवचन देत असतो.चेतन भागवत वंजारी (रा. मुक्ताईनगर) वय वर्षे २६ असे या युवकाचे नाव. आता इस्कॉनमध्ये दीक्षा घेतल्यानंतर चैतन्य जीवनदास असे त्याचे नामकरण झाले आहे. चेतन याचा परिवारही इस्कॉनशी संबंधित आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविलेले.. घरची स्थिती जेम- तेम. मग कसे- बसे बारावीपर्यंतचे शिक्षण मुक्ताईनगर येथे झाले. त्यानंतर जळगावमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली. कॉलेजला असताना इस्कॉनच्या संपर्कात तो आला.जीवनात वेगासोबत असावी दिशाजीवनात वेग असून उपयोग नाही तर त्याला योग्य दिशा आणि ध्येय असणे तितकेच महत्त्वाचे आहे, अशी जाणीव त्याला झाली. कॉलेजमध्ये अभ्यासासोबत भगवतगीता, भागवत यासह अनेक पवित्र ग्रंथंचे अध्ययन त्याने सुरू केले. यापूर्वीही त्याने भगवद्गीता वाचली होती.गोविंद हा जनी-वनी...म्हणे एका जनार्दनीमुंबईत काम करीत असला तरी त्याचा आतला आवाज मात्र अध्यात्माचा होता. मुंबई येथे व्यसनाच्या अधीन झालेली तरुण पिढी पहिली, व्यसनासाठी आई -वडीलांना फसविणारे मुले -मुली पाहिल्या. त्यावेळी आपण विकास तर करत आहोत.पण...या पिढीला एक चांगला मनुष्य म्हणून प्रशिक्षित नाही केले तर .... असा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला. वाढती गुन्हेगारी, घटस्फोट, व्यसनाधिनता पाहून तो खिन्न झाला. आपण दारू पिलेल्या माकडाचा हातात बंदूक देत आहोत, याने शांती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून या समाजाला दिशा देण्यासाठी साधू जीवनाचा स्वीकार करण्याचे त्याने ठरविले आणि याच मागार्साठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला.सुशिक्षित आणि एका चांगल्या ठिकाणी काम करणारे लोक भगवद्गीता आणि अध्यात्माकडे वळत आहेत, याची जाणीव तरुणांना व्हावी, असा उद्देशही यामागे होता. इस्कॉनमध्ये तो गेला आणि त्यांचाच झाला. इस्कॉनच्या अनेक पायऱ्या पार करीत हा युवक जळगाव इस्कॉन शाखेचा आज प्रमुख बनला आहे. दर बुधवारी त्याचा सत्संग तो घेत असतो. चांगला समाज घडविण्यासाठी त्याची धडपड वाखणण्यासारखी आहे. आज चेतन याचा संपूर्ण परिवार श्रीकृष्ण यांची भक्तीत रममाण आहे.त्यामुळे ...गोविंद हा जनी- वनी म्हणे एका जनार्दनी...गीतेत भगवान श्रीकृष्ण यांना नेमके म्हणायचे काय हे कळत नव्हते. पण जोपर्यंत प्रामाणिक वैष्णव भक्त यांची कृपया होत नाही तोपर्यंत भगवद्गीता समजत नाही हे तितकेच खरे. त्यानंतर मुंबई विमानतळावर इलेक्ट्रानिक्स अभियंता म्हणून तो कामाला लागला. तिथे जवळपास तीन वर्षे काम केले. पण तिथे अध्यात्माचा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. यातूनच त्याचा ओढा वाढला आणि तो आज इस्कॉन शाखेचा प्रमुुख बनला आहे.तरुणांनी भगवान श्रीकृष्ण यांची भक्ती करावी , एक सुंदर आनंदी जीवन जगावे तसेच एक व्यसनमुक्त ,सुसंस्कृत आणि गुन्हेगारी मुक्त समाज घडावा अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे. इस्कॉनमध्ये असे अनेक तरुण मुले जुळलेलीी आहेत. विशेष म्हणजे ही मुले कॉलेज अध्ययन संपल्यावर मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहे.- चैतन्य जीवनदास (प्रमुख, जळगाव इस्कॉन शाखा)

टॅग्स :Jalgaonजळगाव