शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
6
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
7
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
8
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
9
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
10
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
11
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
12
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
13
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
14
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
15
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
16
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
17
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
18
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
19
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
20
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

माझ्या मना लागो छंद ... नित्य गोविंद गोविंद... इंजिनिअर झाला जळगाव इस्कॉन शाखेचा प्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:59 IST

चांगला युवक घडविण्यासाठी चैतन्य जीवनदासची धडपड

चुडामण बोरसे जळगाव : उच्च शिक्षण घेऊनही त्याचा ओढा अध्यात्माकडे होता. याच आवडीतून त्याला सवड मिळाली आणि सवडीतून जणू छंद लागला. आणि ‘माझ्या मना लागो छंद .... नित्य गोविंद गोविंद या संत एकनाथ महाराजांच्या अभंगासारखीच अशीच स्थिती या युवकाची झाली आणि आज तो जळगावच्या इस्कॉन शाखेचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता मुखोदगत करीत तो आता प्रवचन देत असतो.चेतन भागवत वंजारी (रा. मुक्ताईनगर) वय वर्षे २६ असे या युवकाचे नाव. आता इस्कॉनमध्ये दीक्षा घेतल्यानंतर चैतन्य जीवनदास असे त्याचे नामकरण झाले आहे. चेतन याचा परिवारही इस्कॉनशी संबंधित आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविलेले.. घरची स्थिती जेम- तेम. मग कसे- बसे बारावीपर्यंतचे शिक्षण मुक्ताईनगर येथे झाले. त्यानंतर जळगावमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली. कॉलेजला असताना इस्कॉनच्या संपर्कात तो आला.जीवनात वेगासोबत असावी दिशाजीवनात वेग असून उपयोग नाही तर त्याला योग्य दिशा आणि ध्येय असणे तितकेच महत्त्वाचे आहे, अशी जाणीव त्याला झाली. कॉलेजमध्ये अभ्यासासोबत भगवतगीता, भागवत यासह अनेक पवित्र ग्रंथंचे अध्ययन त्याने सुरू केले. यापूर्वीही त्याने भगवद्गीता वाचली होती.गोविंद हा जनी-वनी...म्हणे एका जनार्दनीमुंबईत काम करीत असला तरी त्याचा आतला आवाज मात्र अध्यात्माचा होता. मुंबई येथे व्यसनाच्या अधीन झालेली तरुण पिढी पहिली, व्यसनासाठी आई -वडीलांना फसविणारे मुले -मुली पाहिल्या. त्यावेळी आपण विकास तर करत आहोत.पण...या पिढीला एक चांगला मनुष्य म्हणून प्रशिक्षित नाही केले तर .... असा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला. वाढती गुन्हेगारी, घटस्फोट, व्यसनाधिनता पाहून तो खिन्न झाला. आपण दारू पिलेल्या माकडाचा हातात बंदूक देत आहोत, याने शांती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून या समाजाला दिशा देण्यासाठी साधू जीवनाचा स्वीकार करण्याचे त्याने ठरविले आणि याच मागार्साठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला.सुशिक्षित आणि एका चांगल्या ठिकाणी काम करणारे लोक भगवद्गीता आणि अध्यात्माकडे वळत आहेत, याची जाणीव तरुणांना व्हावी, असा उद्देशही यामागे होता. इस्कॉनमध्ये तो गेला आणि त्यांचाच झाला. इस्कॉनच्या अनेक पायऱ्या पार करीत हा युवक जळगाव इस्कॉन शाखेचा आज प्रमुख बनला आहे. दर बुधवारी त्याचा सत्संग तो घेत असतो. चांगला समाज घडविण्यासाठी त्याची धडपड वाखणण्यासारखी आहे. आज चेतन याचा संपूर्ण परिवार श्रीकृष्ण यांची भक्तीत रममाण आहे.त्यामुळे ...गोविंद हा जनी- वनी म्हणे एका जनार्दनी...गीतेत भगवान श्रीकृष्ण यांना नेमके म्हणायचे काय हे कळत नव्हते. पण जोपर्यंत प्रामाणिक वैष्णव भक्त यांची कृपया होत नाही तोपर्यंत भगवद्गीता समजत नाही हे तितकेच खरे. त्यानंतर मुंबई विमानतळावर इलेक्ट्रानिक्स अभियंता म्हणून तो कामाला लागला. तिथे जवळपास तीन वर्षे काम केले. पण तिथे अध्यात्माचा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. यातूनच त्याचा ओढा वाढला आणि तो आज इस्कॉन शाखेचा प्रमुुख बनला आहे.तरुणांनी भगवान श्रीकृष्ण यांची भक्ती करावी , एक सुंदर आनंदी जीवन जगावे तसेच एक व्यसनमुक्त ,सुसंस्कृत आणि गुन्हेगारी मुक्त समाज घडावा अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे. इस्कॉनमध्ये असे अनेक तरुण मुले जुळलेलीी आहेत. विशेष म्हणजे ही मुले कॉलेज अध्ययन संपल्यावर मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहे.- चैतन्य जीवनदास (प्रमुख, जळगाव इस्कॉन शाखा)

टॅग्स :Jalgaonजळगाव