शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भुसावळ शहरात रंगला मुशायरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:59 IST

अनीक फाऊंडेशन आणि खान्देश उर्दू रायटर्स यांच्यातर्फे ‘रगो मे खून न होता तो मर गये होते’ आणि ‘वक्त क्यूं शाम का आंखो मे ठहर जाता है’ या अंत्य यमकावर आधारीत गझल सादरीकरणाचा कार्यक्रम खडका चौफुलीवर पार पडला.

ठळक मुद्देजग कितीही झपाट्याने बदलत असले तरी साहित्य निर्मिती प्रक्रियेत पारंपरिक मापदंडांना महत्वाचे स्थान आहे त्यांना सोडून दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकत नाहीखान्देशच्या शायरांनी उर्दू साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल झाला उहापोह

भुसावळ, जि.जळगाव : अनीक फाऊंडेशन आणि खान्देश उर्दू रायटर्स यांच्यातर्फे ‘रगो मे खून न होता तो मर गये होते’ आणि ‘वक्त क्यूं शाम का आंखो मे ठहर जाता है’ या अंत्य यमकावर आधारीत गझल सादरीकरणाचा कार्यक्रम खडका चौफुलीवर पार पडला.हाफिज मुश्ताक साहिल यांच्या कुराण पठणाने आणि रईस फैजपुरी यांच्या प्रेषित स्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुप्रसिद्ध लघुकथाकावर अहमद कलीम फैजपुरी अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी खान्देश उर्दू रायटर्स फाऊंडेशनचे संस्थापक, लघुकथा लेखक आणि माजी प्राचार्य सगीर अहमद यांनी प्रास्ताविक केले. आकाशवाणीचे जावेद अन्सारी यांनी भावी कृती योजनांबद्दल माहिती दिली. कविवर्य रईस फैजपुरी, शकील हसरत, शाहीर नुसरत, साईद जिलानी, हाफिज मीनानगरी, रहीम राजा, काझी रफीक राही, शकील अंजूम मीनानगरी, अखलाक निजामी, वकार सिद्दीकी, हाफिज मुश्ताक साहिल, इकबाल असर, रफीक पटवे आणि इशराक रावेरी यांनी संयोजकांनी दिलेल्या अंत्ययमकावर आधारीत आपापल्या गझला सादर केल्या.डॉ.गयास उसमानी यांनी उर्दू भाषेच्या लोकप्रियतेबद्दल विचार प्रकट केले तर कय्यूम असर आणि शकील मेवाती यांनी सादरीकृत गझलांचे परीक्षण केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अहमद कलीम फैजपुरी यांनी उर्दू साहित्य चळवळ नव्याने जोम धरत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले. खान्देशच्या शायरांनी उर्दू साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल माहिती दिली व ईमान ब्यावली, कमर भुसावली, सैफ भुसावली आणि मिर्जा मुस्तफा आबादी यांच्या निवडक शेरोशायरीवर प्रकाश टाकला. जग कितीही झपाट्याने बदलत असले तरी साहित्य निर्मिती प्रक्रियेत पारंपरिक मापदंडांना महत्वाचे स्थान आहे त्यांना सोडून दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकत नाही असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाला अब्दुल रशीद कासमी, मुश्ताक करीमी यासह हनीफ खान ईस्माईल उर्फ मल्लू शेठ, हाजी अंसार और नदीम मिर्जा इत्यादी मान्यवर आणि जिल्ह्यातील अनेक उर्दू साहित्य प्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन हारुन उस्मानी व आभार अनीक फाऊंडेशनचे अध्यक्ष शकील हसरत यांनी केले. 

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ