शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

भुसावळ शहरात रंगला मुशायरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:59 IST

अनीक फाऊंडेशन आणि खान्देश उर्दू रायटर्स यांच्यातर्फे ‘रगो मे खून न होता तो मर गये होते’ आणि ‘वक्त क्यूं शाम का आंखो मे ठहर जाता है’ या अंत्य यमकावर आधारीत गझल सादरीकरणाचा कार्यक्रम खडका चौफुलीवर पार पडला.

ठळक मुद्देजग कितीही झपाट्याने बदलत असले तरी साहित्य निर्मिती प्रक्रियेत पारंपरिक मापदंडांना महत्वाचे स्थान आहे त्यांना सोडून दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकत नाहीखान्देशच्या शायरांनी उर्दू साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल झाला उहापोह

भुसावळ, जि.जळगाव : अनीक फाऊंडेशन आणि खान्देश उर्दू रायटर्स यांच्यातर्फे ‘रगो मे खून न होता तो मर गये होते’ आणि ‘वक्त क्यूं शाम का आंखो मे ठहर जाता है’ या अंत्य यमकावर आधारीत गझल सादरीकरणाचा कार्यक्रम खडका चौफुलीवर पार पडला.हाफिज मुश्ताक साहिल यांच्या कुराण पठणाने आणि रईस फैजपुरी यांच्या प्रेषित स्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुप्रसिद्ध लघुकथाकावर अहमद कलीम फैजपुरी अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी खान्देश उर्दू रायटर्स फाऊंडेशनचे संस्थापक, लघुकथा लेखक आणि माजी प्राचार्य सगीर अहमद यांनी प्रास्ताविक केले. आकाशवाणीचे जावेद अन्सारी यांनी भावी कृती योजनांबद्दल माहिती दिली. कविवर्य रईस फैजपुरी, शकील हसरत, शाहीर नुसरत, साईद जिलानी, हाफिज मीनानगरी, रहीम राजा, काझी रफीक राही, शकील अंजूम मीनानगरी, अखलाक निजामी, वकार सिद्दीकी, हाफिज मुश्ताक साहिल, इकबाल असर, रफीक पटवे आणि इशराक रावेरी यांनी संयोजकांनी दिलेल्या अंत्ययमकावर आधारीत आपापल्या गझला सादर केल्या.डॉ.गयास उसमानी यांनी उर्दू भाषेच्या लोकप्रियतेबद्दल विचार प्रकट केले तर कय्यूम असर आणि शकील मेवाती यांनी सादरीकृत गझलांचे परीक्षण केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अहमद कलीम फैजपुरी यांनी उर्दू साहित्य चळवळ नव्याने जोम धरत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले. खान्देशच्या शायरांनी उर्दू साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल माहिती दिली व ईमान ब्यावली, कमर भुसावली, सैफ भुसावली आणि मिर्जा मुस्तफा आबादी यांच्या निवडक शेरोशायरीवर प्रकाश टाकला. जग कितीही झपाट्याने बदलत असले तरी साहित्य निर्मिती प्रक्रियेत पारंपरिक मापदंडांना महत्वाचे स्थान आहे त्यांना सोडून दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकत नाही असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाला अब्दुल रशीद कासमी, मुश्ताक करीमी यासह हनीफ खान ईस्माईल उर्फ मल्लू शेठ, हाजी अंसार और नदीम मिर्जा इत्यादी मान्यवर आणि जिल्ह्यातील अनेक उर्दू साहित्य प्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन हारुन उस्मानी व आभार अनीक फाऊंडेशनचे अध्यक्ष शकील हसरत यांनी केले. 

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ