शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

भुसावळ शहरात रंगला मुशायरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:59 IST

अनीक फाऊंडेशन आणि खान्देश उर्दू रायटर्स यांच्यातर्फे ‘रगो मे खून न होता तो मर गये होते’ आणि ‘वक्त क्यूं शाम का आंखो मे ठहर जाता है’ या अंत्य यमकावर आधारीत गझल सादरीकरणाचा कार्यक्रम खडका चौफुलीवर पार पडला.

ठळक मुद्देजग कितीही झपाट्याने बदलत असले तरी साहित्य निर्मिती प्रक्रियेत पारंपरिक मापदंडांना महत्वाचे स्थान आहे त्यांना सोडून दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकत नाहीखान्देशच्या शायरांनी उर्दू साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल झाला उहापोह

भुसावळ, जि.जळगाव : अनीक फाऊंडेशन आणि खान्देश उर्दू रायटर्स यांच्यातर्फे ‘रगो मे खून न होता तो मर गये होते’ आणि ‘वक्त क्यूं शाम का आंखो मे ठहर जाता है’ या अंत्य यमकावर आधारीत गझल सादरीकरणाचा कार्यक्रम खडका चौफुलीवर पार पडला.हाफिज मुश्ताक साहिल यांच्या कुराण पठणाने आणि रईस फैजपुरी यांच्या प्रेषित स्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुप्रसिद्ध लघुकथाकावर अहमद कलीम फैजपुरी अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी खान्देश उर्दू रायटर्स फाऊंडेशनचे संस्थापक, लघुकथा लेखक आणि माजी प्राचार्य सगीर अहमद यांनी प्रास्ताविक केले. आकाशवाणीचे जावेद अन्सारी यांनी भावी कृती योजनांबद्दल माहिती दिली. कविवर्य रईस फैजपुरी, शकील हसरत, शाहीर नुसरत, साईद जिलानी, हाफिज मीनानगरी, रहीम राजा, काझी रफीक राही, शकील अंजूम मीनानगरी, अखलाक निजामी, वकार सिद्दीकी, हाफिज मुश्ताक साहिल, इकबाल असर, रफीक पटवे आणि इशराक रावेरी यांनी संयोजकांनी दिलेल्या अंत्ययमकावर आधारीत आपापल्या गझला सादर केल्या.डॉ.गयास उसमानी यांनी उर्दू भाषेच्या लोकप्रियतेबद्दल विचार प्रकट केले तर कय्यूम असर आणि शकील मेवाती यांनी सादरीकृत गझलांचे परीक्षण केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अहमद कलीम फैजपुरी यांनी उर्दू साहित्य चळवळ नव्याने जोम धरत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले. खान्देशच्या शायरांनी उर्दू साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल माहिती दिली व ईमान ब्यावली, कमर भुसावली, सैफ भुसावली आणि मिर्जा मुस्तफा आबादी यांच्या निवडक शेरोशायरीवर प्रकाश टाकला. जग कितीही झपाट्याने बदलत असले तरी साहित्य निर्मिती प्रक्रियेत पारंपरिक मापदंडांना महत्वाचे स्थान आहे त्यांना सोडून दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकत नाही असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाला अब्दुल रशीद कासमी, मुश्ताक करीमी यासह हनीफ खान ईस्माईल उर्फ मल्लू शेठ, हाजी अंसार और नदीम मिर्जा इत्यादी मान्यवर आणि जिल्ह्यातील अनेक उर्दू साहित्य प्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन हारुन उस्मानी व आभार अनीक फाऊंडेशनचे अध्यक्ष शकील हसरत यांनी केले. 

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ