शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

मुर्दापूर धरण ओसंडून वाहू लागले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:35 IST

उंची वाढीचा मुहूर्त कधी?: ..तर जास्त पाणीसाठा झाला असता, दिरंगाईबाबत नाराजी

नशिराबाद : येथून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या मुदार्पूर धरण उंची वाढीचे पाच टक्के काम नऊ वर्षापासून रखडलेले आहे. सातत्याने सूचना देऊन तसेच पाठपुरावा करूनही तापी महामंडळातर्फे उंचीवाढीच्या कामात दिरंगाई होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.यंदाही मुर्दापूर धरण शंभर टक्के भरले असून ओसंडून वाहत आहे. लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. परिणामी उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागते. मात्र धरणाची उंची वाढ झाली असती तर आज पाणी साठवण मोठ्या प्रमाणावर झाले असती मात्र प्रशासनाचा दिरंगाई व हलगर्जीपणाच उंची वाढीस कारणीभूत ठरत असल्याची ओरड होत आहे.मुर्दापूर लघुपाटबंधारे तलाव सन १९९७ मध्ये बांधण्यात आला. मुर्दापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे आहे.त्यामुळे गेल्यावर्षी कमी पाऊस होवूनही धरण सध्याचा साठवण क्षमतेतच शंभर टक्के भरले. मात्र उंची वाढण्याचे काम ९५ टक्के झाले आहे पण केवळ पाच टक्के काम नऊ वर्षापासून रखडल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्यास अडचणी येतात. पाणी ओसंडून वाहत आहे. या धरणावर नशिराबादची पाणीपुरवठा योजना अवलंबून असून शेतीसाठीही याचा चांगला लाभ होणार आहे.अतिरिक्त भूसंपादन अद्याप झालेले नाही, अशी सबब सांगण्यात येते. भूसंपादनासाठी सुमारे २४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास सन २०१५मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मग काम रखडले कसे? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत दखल घ्यावी व धरणाच्या उंची वाढीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या धरणाच्या सांडव्याच्या भिंतीचे २५ टक्के काम बाकी आहे. कारण उंची वाढीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त भूसंपादनाचे काम बाकी असल्याचे समजते. सन २०१०मध्ये वेग वर्धित सिंचन योजनेत या कामाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर निधी उपलब्ध झाल्याने कामास सुरुवात झाली. त्यामुळे या धरणाची सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे मात्र त्यानंतर अवघे पाच टक्के काम रखडले आहे. हे पूर्ण झाले तर पाणीसाठ्यात वाढ होणार असून त्यामुळे तेथील गावकऱ्यांना लाभ होणार आहे.जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील व सहकारी शेतकरी हे वारंवार उंची वाढीसंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र अनेकदा तक्रार करूनही अद्याप पाच टक्के उंचीचे काम रखडले असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.खोदकामामुळे जलसाठ्यात वाढमहामार्ग चौपदरीकरण व रेल्वे लाईनच्या कामासाठी याच धरणातून खोदण्याचे काम करण्यात आले त्यामुळे सुमारे एक ते दोन लाख घनमीटर धरणाची पाणी साठवण क्षमता वाढली आहे मात्र यंदा संततधार पाऊस व धानवड पिंपळे इथून झालेल्या धरणातील विसगार्मुळे मुर्दापूर धरण शंभर टक्के भरले असून ओसंडून वाहत आहे.

टॅग्स :riverनदीJalgaonजळगाव