शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुर्दापूर धरण ओसंडून वाहू लागले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:35 IST

उंची वाढीचा मुहूर्त कधी?: ..तर जास्त पाणीसाठा झाला असता, दिरंगाईबाबत नाराजी

नशिराबाद : येथून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या मुदार्पूर धरण उंची वाढीचे पाच टक्के काम नऊ वर्षापासून रखडलेले आहे. सातत्याने सूचना देऊन तसेच पाठपुरावा करूनही तापी महामंडळातर्फे उंचीवाढीच्या कामात दिरंगाई होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.यंदाही मुर्दापूर धरण शंभर टक्के भरले असून ओसंडून वाहत आहे. लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. परिणामी उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागते. मात्र धरणाची उंची वाढ झाली असती तर आज पाणी साठवण मोठ्या प्रमाणावर झाले असती मात्र प्रशासनाचा दिरंगाई व हलगर्जीपणाच उंची वाढीस कारणीभूत ठरत असल्याची ओरड होत आहे.मुर्दापूर लघुपाटबंधारे तलाव सन १९९७ मध्ये बांधण्यात आला. मुर्दापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे आहे.त्यामुळे गेल्यावर्षी कमी पाऊस होवूनही धरण सध्याचा साठवण क्षमतेतच शंभर टक्के भरले. मात्र उंची वाढण्याचे काम ९५ टक्के झाले आहे पण केवळ पाच टक्के काम नऊ वर्षापासून रखडल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्यास अडचणी येतात. पाणी ओसंडून वाहत आहे. या धरणावर नशिराबादची पाणीपुरवठा योजना अवलंबून असून शेतीसाठीही याचा चांगला लाभ होणार आहे.अतिरिक्त भूसंपादन अद्याप झालेले नाही, अशी सबब सांगण्यात येते. भूसंपादनासाठी सुमारे २४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास सन २०१५मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मग काम रखडले कसे? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत दखल घ्यावी व धरणाच्या उंची वाढीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या धरणाच्या सांडव्याच्या भिंतीचे २५ टक्के काम बाकी आहे. कारण उंची वाढीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त भूसंपादनाचे काम बाकी असल्याचे समजते. सन २०१०मध्ये वेग वर्धित सिंचन योजनेत या कामाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर निधी उपलब्ध झाल्याने कामास सुरुवात झाली. त्यामुळे या धरणाची सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे मात्र त्यानंतर अवघे पाच टक्के काम रखडले आहे. हे पूर्ण झाले तर पाणीसाठ्यात वाढ होणार असून त्यामुळे तेथील गावकऱ्यांना लाभ होणार आहे.जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील व सहकारी शेतकरी हे वारंवार उंची वाढीसंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र अनेकदा तक्रार करूनही अद्याप पाच टक्के उंचीचे काम रखडले असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.खोदकामामुळे जलसाठ्यात वाढमहामार्ग चौपदरीकरण व रेल्वे लाईनच्या कामासाठी याच धरणातून खोदण्याचे काम करण्यात आले त्यामुळे सुमारे एक ते दोन लाख घनमीटर धरणाची पाणी साठवण क्षमता वाढली आहे मात्र यंदा संततधार पाऊस व धानवड पिंपळे इथून झालेल्या धरणातील विसगार्मुळे मुर्दापूर धरण शंभर टक्के भरले असून ओसंडून वाहत आहे.

टॅग्स :riverनदीJalgaonजळगाव