शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

मुर्दापूर धरण ओसंडून वाहू लागले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:35 IST

उंची वाढीचा मुहूर्त कधी?: ..तर जास्त पाणीसाठा झाला असता, दिरंगाईबाबत नाराजी

नशिराबाद : येथून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या मुदार्पूर धरण उंची वाढीचे पाच टक्के काम नऊ वर्षापासून रखडलेले आहे. सातत्याने सूचना देऊन तसेच पाठपुरावा करूनही तापी महामंडळातर्फे उंचीवाढीच्या कामात दिरंगाई होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.यंदाही मुर्दापूर धरण शंभर टक्के भरले असून ओसंडून वाहत आहे. लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. परिणामी उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागते. मात्र धरणाची उंची वाढ झाली असती तर आज पाणी साठवण मोठ्या प्रमाणावर झाले असती मात्र प्रशासनाचा दिरंगाई व हलगर्जीपणाच उंची वाढीस कारणीभूत ठरत असल्याची ओरड होत आहे.मुर्दापूर लघुपाटबंधारे तलाव सन १९९७ मध्ये बांधण्यात आला. मुर्दापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे आहे.त्यामुळे गेल्यावर्षी कमी पाऊस होवूनही धरण सध्याचा साठवण क्षमतेतच शंभर टक्के भरले. मात्र उंची वाढण्याचे काम ९५ टक्के झाले आहे पण केवळ पाच टक्के काम नऊ वर्षापासून रखडल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्यास अडचणी येतात. पाणी ओसंडून वाहत आहे. या धरणावर नशिराबादची पाणीपुरवठा योजना अवलंबून असून शेतीसाठीही याचा चांगला लाभ होणार आहे.अतिरिक्त भूसंपादन अद्याप झालेले नाही, अशी सबब सांगण्यात येते. भूसंपादनासाठी सुमारे २४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास सन २०१५मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मग काम रखडले कसे? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत दखल घ्यावी व धरणाच्या उंची वाढीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या धरणाच्या सांडव्याच्या भिंतीचे २५ टक्के काम बाकी आहे. कारण उंची वाढीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त भूसंपादनाचे काम बाकी असल्याचे समजते. सन २०१०मध्ये वेग वर्धित सिंचन योजनेत या कामाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर निधी उपलब्ध झाल्याने कामास सुरुवात झाली. त्यामुळे या धरणाची सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे मात्र त्यानंतर अवघे पाच टक्के काम रखडले आहे. हे पूर्ण झाले तर पाणीसाठ्यात वाढ होणार असून त्यामुळे तेथील गावकऱ्यांना लाभ होणार आहे.जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील व सहकारी शेतकरी हे वारंवार उंची वाढीसंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र अनेकदा तक्रार करूनही अद्याप पाच टक्के उंचीचे काम रखडले असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.खोदकामामुळे जलसाठ्यात वाढमहामार्ग चौपदरीकरण व रेल्वे लाईनच्या कामासाठी याच धरणातून खोदण्याचे काम करण्यात आले त्यामुळे सुमारे एक ते दोन लाख घनमीटर धरणाची पाणी साठवण क्षमता वाढली आहे मात्र यंदा संततधार पाऊस व धानवड पिंपळे इथून झालेल्या धरणातील विसगार्मुळे मुर्दापूर धरण शंभर टक्के भरले असून ओसंडून वाहत आहे.

टॅग्स :riverनदीJalgaonजळगाव