शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मुंबई विमानसेवेची तिकीट विक्री सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:36 IST

जळगाव : कोरोनामुळे १० जुलैपासून तात्पुरती स्थगित असलेली जळगाव -मुंबई विमानसेवा २४ आॅगस्ट पासून पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी ...

जळगाव : कोरोनामुळे १० जुलैपासून तात्पुरती स्थगित असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा २४ आॅगस्ट पासून पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी विमान कंपनीतर्फे नुकतीच तिकिट विक्रीला सुरुवात करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे अगोदरच्या तीन महिने बंद असलेली जळगावची विमानसेवा १ जूनपासून पुन्हा सुरू झाली होती. मात्र, जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे विमान कंपनीतर्फे खबरदारी म्हणून जळगावची विमानसेवा १० जुलैपासून स्थगित करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे चार महिन्यात दोन वेळा सेवा स्थगित करण्याची वेळ विमान कंपनीवर आली. लॉकडाऊनच्या कालावधीतही विमानसेवा सुरू झाली असली तरी जळगाव विमानतळावरून फक्त २० टक्केच प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे.यामुळे विमान कंपनीचे आठ कोटींच्या घरात नुकसान झाले. यात मुंबई विमान तळावर विमान उतरविण्यासाठी जागा नसल्यामुळे आठवड्यातून फक्त एकदाच मुंबईची सेवा सुरू होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असल्याचेही विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, आता पुन्हा विमानसेवा सुरू करण्यासाठी कंपनीतर्फे तिकीट विक्रीला सुरुवात करण्यात आली असून प्रवाशांना आॅनलाईन किंवा विमान तळावर जाऊनही तिकीट खरेदी करता येणार आहे.मुंबईची सेवा दररोज सुरू करण्यासाठी प्रयत्नकोरोनामुळे राज्य सरकारने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावरून फक्त २५ विमान कंपन्यांनाच विमान उतरविण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये जळगावला विमान सेवा देणाऱ्या कंपनीचादेखील समावेश असून या कंपनीला सध्या आठवड्यातून एकदाच विमान उतरविण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे मुंबईची विमानसेवा दररोज सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहितीही विमान कंपनीतर्फे देण्यात आली.कोरोनामुळे स्थगित असलेली जळगाव ते मुंबई विमानसेवा २४ आॅगस्टपासून पुन्हा सुरू करीत आहोत. यासाठी तिकीट विक्रीला सुरूवात करण्यात आली आहे. शक्य झाले तर १० आॅगस्टपासूनच विमानसेवा सुरू करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.-नैमिष जोशी, वितरण व्यवस्थापक, ट्रू जेट एअरलाईन्स.

टॅग्स :airplaneविमानJalgaonजळगाव