शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मुक्ताईनगर तालुक्यात ५९८ ब्रास वाळू सोडली वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 21:23 IST

महिन्यात धडक कारवाई करीत कुºहा, रिगाव व कोºहाळा या तीन गावांमधून जप्त केलेली एकूण ५९८ ब्रास वाळू वाºयावर सोडत बेजबाबदारपणाचा कळस महसूल प्रशासनाने दाखवला असून, त्यातील मोठ्या प्रमाणावर वाळू ही वाळूमाफिया व अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देमहसूल प्रशासनाचा बेजबाबदारपणाचा कळसपोलीस पाटलांना गोवण्याचा केला जातोय प्रयत्नपोलीस पाटील म्हणतात, कामाच्या ओझ्यामुळे वाळू सांभाळणे होतेय जिकिरीचे

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : जून महिन्यात धडक कारवाई करीत कुºहा, रिगाव व कोºहाळा या तीन गावांमधून जप्त केलेली एकूण ५९८ ब्रास वाळू वाºयावर सोडत बेजबाबदारपणाचा कळस महसूल प्रशासनाने दाखवला असून, त्यातील मोठ्या प्रमाणावर वाळू ही वाळूमाफिया व अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची बाब उघडकीस आली आहे.१४ जून २०१८ रोजी तत्कालीन तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्यासह पोलीस पाटील यांच्या पथकाने धडक मोहीम राबवत मुक्ताईनगर तालुक्यात विविध ठिकाणी वाळू साठे जप्त केले होते. त्याचे पंचनामेदेखील केले होते. यात एकट्या कुºहा गावात २९८ ब्रास वाळू जप्त केली होती, तर रिगाव येथे १५० व कोºहाळा गावी १५० ब्रास वाळू महसूल प्रशासनाने जप्त केली होती. त्यानंतर मात्र महसूल प्रशासनाने या जप्त केलेल्या वाळू साठ्यांना वाºयावर सोडलेले दिसून येत आहे.गेल्या पाच महिन्यांपासूनही वाळू जप्तीच्या पंचनाम्यानंतर संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. असे असताना मात्र कोणतीही कारवाई न करता नियोजनशून्य कारभारदेखील महसूल प्रशासनाचा दिसून आला. वाळू जप्त केल्यानंतर संबंधित गावचे पोलीस पाटलांकडे जप्त केलेली वाळू ही देखरेखीसाठी वर्ग करण्यात आली. मात्र पोलीस पाटील यांच्याकडे असलेली कामे बघता विविध ठिकाणी गंज करून ठेवलेली वाळू पोलीस पाटील कशी सांभाळू शकेल? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहे. केवळ कुºहा गावाचा विचार केला असता १९ ठिकाणांवरून २९८ ब्रास वाळू ही जप्त करण्यात आली होती. गावात व गावाच्या परिसरात असलेले १९ गंज एक पोलीस पाटील सांभाळणार कसे व त्याचे संरक्षण करणार कसे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.विशेष म्हणजे कुºह्याचे पोलीस पाटील विजय पाटील यांच्यावर वाळूमाफियांनी मध्यंतरीच्या काळात दगडफेकदेखील केलेली होती. कोणतेही पोलीस संरक्षण अथवा महसूल प्रशासनाचे पथक संरक्षणासाठी उभे नसताना एकट्या पोलीस पाटलांवर ही जबाबदारी टाकणे म्हणजेच उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार निदर्शनास येत असल्याची टीका होत आहे.रिगाव येथे १५० ब्रास वाळू ही जप्त करण्यात आली असून, जप्त केलेले वाळूचे साठे विविध ठिकाणी आहेत. त्यामुळे पोलीस पाटलांना हे गंज सांभाळणे कठीण जात आहे. रिगावचे पोलीस पाटील युवराज बगडे यांनी यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे. कोºहाळा या गावी १५० ब्रास वाळू जप्त तत्कालीन महसूल पथकाने केली होती. मात्र पोलीस पाटील राम पाटील यांच्याकडे अतिरिक्त कारभार असल्याने व पोलीस पाटलाकडे गणपती उत्सव, विविध उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था व पोलीस प्रशासनाची कामे पोलीस पाटील विविध ठिकाणी असलेले सांभाळणार कसे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यातच कोºहाळा शिवारात वाघाचे वास्तव्य असल्याने वाघाच्या वास्तव्याच्या ठिकाणी रात्री-अपरात्री या वाळूचे संरक्षण कसे करावे, हा मोठा प्रश्न पडलेला आहे.महसूल पणाच्या बेजबाबदारपणामुळे ५९८ म्हणजे जवळपास सहाशे ब्रास वाळूपैकी बहुतांशी वाळू ही वाळू माफियांकडून रात्री-अपरात्री पळवण्यात येत आहे. यासंदर्भात पोलीस पाटील यांनी आठ ते दहा वेळेस जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी अर्ज पाठवून संबंधित वाळूचा विल्हेवाट लावण्याचा आग्रह धरला आहे. मात्र आठ ते दहा वेळेस पत्रव्यवहार करूनदेखील त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मध्यंतरी उपजिल्हाधिकाºयांचे पथक येऊन जप्त केलेल्या वाळूचा लिलाव करणे कामी पाहणी व पंचनामा केला. मात्र पाहणी केल्यानंतर तीन हजार ७० रुपये प्रति ब्रासप्रमाणे भाव लिलावासाठी जाहीर केल्याने कोणीही वाळू घेण्यास पुढे धजावले नाही. बाजारभावापेक्षा उपजिल्हाधिकाºयांनी दिलेला हा भाव अधिक असल्याने ही वाळू पडून आहे. पण त्यातील बरीचशी वाळू ही काही बांधकामासाठी वापरून घेतलेली आहे, तर काही वाळूमाफियांनी पळवून नेलेली आहे. विशेष म्हणजे काही वाळूमालकांनी आपल्याकडे असलेली रॉयल्टीदेखील महसूल प्रशासनाला सादर केलेली आहे. मात्र गेल्या पाच महिन्यात ती रॉयल्टी खरी का खोटी, याची शहानिशा अजूनदेखील महसूल प्रशासन करू शकले नाही.प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा कळस म्हणजे पाच महिन्यांपासून वाळू ही बेवारस स्थितीत केवळ तीन पोलीस पाटलांवर जबाबदारी टाकून स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा हा एक प्रकार आहे. वाळू पंचनामा झाल्यानंतर ५९८ पैकी मी भरल्यास त्याची जबाबदारी कोणाची, हा खरा प्रश्न आहे. महसूल प्रशासन पोलीस पाटलांवर ही जबाबदारी टाकून स्वत: झटकण्याचा प्रकार करू शकते. मात्र पोलीस पाटील विविध ठिकाणी असलेल्या रात्री-अपरात्री व तेही पाच पाच महिने वाळू कसे सांभाळेल, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. गंभीर बाब म्हणजे वाळू चोरीस जात असल्याची बाब संबंधित पोलीस पाटलांकडून तहसीलदार व महसूल प्रशासनाकडे निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांकडे गुन्हे दाखल करा, असे तोंडी आदेश पोलीस पाटलांना दिले जातात. मात्र पोलिसांकडे गेल्यावर त्यांच्या तक्रारीला पोलीस विभागदेखील महत्त्व देत नसल्याचे गेल्या पाच महिन्यात सिद्ध झाले आहे.वाळूसंदर्भात कारवाई सुरू आहे. लवकरच पुन्हा एक पथक पाठवून वाळूची किंमत ठरवण्यात येईल व त्यानुसार वाळूचा लिलाव करण्यात येईल. चोरीस गेली असेल तर तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून अहवाल मागवला जाईल.-नीलेश पाटील, नायब तहसीलदार, मुक्ताईनगरगेल्या पाच महिन्यांपासून वाळूची निगराणी केली जात आहे. माझ्याकडे असलेली विविध कामे, गावातील कायदा व सुव्यवस्था यासोबतच विविध उत्सव, सण यामुळे आणि रात्री अपरात्री वाळूची देखरेख करणे हे गैरसोयीचे आहे. त्यातच सोबत कोणतेही संरक्षण नसल्याने वाळू रात्री-अपरात्री चोरीस जाऊ शकते.-विजय पाटील, पोलीस पाटील, कुºहा, ता.मुक्ताईनगर

टॅग्स :sandवाळूMuktainagarमुक्ताईनगर