शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर येथील मुक्ताई साखर कारखान्याने दिला २० रुपये वाढीव भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 19:10 IST

मुक्ताईनगर , जि.जळगाव : मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लि., या साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उसाचा ...

ठळक मुद्देऊस पुरवठादारांना मिळणार आता एकूण १८०० रुपये प्रति मेट्रिक टन भावकारखान्याने प्रतिदिन तीन हजार ३०० मेट्रिक टन ऊस गाळपाचा गाठला उच्चांक१८०० रुपये प्रति मेट्रिक टन एकरकमी दर ऊसपुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणे सुरू

मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लि., या साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उसाचा एफ.आर.पी.प्रमाणे प्रति मेट्रिक टन १७८० आणि २० रुपये वाढ असे एकूण १८०० रुपये प्रति मेट्रिक टन एक रकमी दर ऊसपुरवठादार शेतकºयांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे, तर कारखान्याने प्रतिदिन तीन हजार ३०० मेट्रिक टन असे उच्चांकी गाळप गाठले आहे.२९ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामात आतापर्यंत ७७१३० मे.टन ऊस गाळप झाले आहे. ६१३०० क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे व आज ९.४५ टक्के साखर उतारा मिळत असून, सरासरी साखर उतारा ८.३८ आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचा १२ मेगाव्हॅट सहवीजनिर्मीती प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. या प्रकल्पातून २५ लाख ३६ हजार ८०० युनिट वीज कंपनीला निर्यात करण्यात आलेली आहे.गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी कारखाना व्यवस्थापनामार्फत चालू हंगामात देय असलेला उसाचा एफ.आर.पी. दर रुपये १७८० प्रति मे.टन आहे, त्यामध्ये प्रति मे. टन २० रुपये वाढ करुन १८०० रुपये प्रति मे.टन एक रकमी दर देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे कारखान्याने १५ नोव्हेंबरपर्यंत आलेल्या उसाचे १८०० रुपये प्रति मे.टनाप्रमाणे ऊस बील संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले आहे व यापुढील ऊस बील एफ.आर.पी. धोरणानुसार वेळोवेळी कारखाना मुदतीत अदा करेल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी दिली.कारखान्यामध्ये आवश्यक ती मशिनरी दुरुस्ती व आधुनिकीकरण करून घेतले. यामुळे चालू हंगामात कारखाना ३२०० ते ३३०० मे.टन प्रति दिन गाळप करीत आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पसुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू आहे. याप्रमाणे गाळप होत राहिल्यास कारखाना ऊर्जितावस्थेत येऊन ऊस उत्पादकांना जास्तीत-जास्त ऊस दर देणे सोईचे होणार आहे. कारखान्याची अशीच वाटचाल सुरू राहण्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी ऊस लागवड करून जवळील वाहतुकीचा ऊस उपलब्ध झाल्यास शेतकºयांना अधिक ऊस दराचा मोबदला देणे सोईचे होईल, असे कारखान्याच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी कळविले आहे.२५०९ मेट्रिक टन क्षमतेच्या या करखान्यात अत्याधुनिकीकरण करून ५ रोजी कारखान्याने उच्चांकी ३३५० मे.टन ऊस गाळप केले असून, ३००० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. त्याबद्दल कारखाना व्यवस्थापनाकडून अधिकारी व कर्मचाºयांचे अभिनंदन करण्यात आले, अशी माहिती जनरल मॅनेजर अमृत देवरे यांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMuktainagarमुक्ताईनगर