शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जळगावात २५ कोटींच्या कामांचा ठरला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 15:55 IST

मनपा प्रशासनाला शहरातील मूलभूत सुविधांच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या बहुप्रतीक्षित २५ कोटी रुपयांच्या कामांचा मुहूर्र्त अखेर ठरला आहे.

ठळक मुद्देजळगावकरांना मिळणार लवकरच दिलासाशुक्रवारपासून १३ कोटींंच्या कामांना होणार प्रारंभ७ कोटीतून स्मशानभूमीत गॅस दाहिनी

जळगाव : मनपा प्रशासनाला शहरातील मूलभूत सुविधांच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या बहुप्रतीक्षित २५ कोटी रुपयांच्या कामांचा मुहूर्र्त अखेर ठरला आहे. शुक्रवारपासून २५ कोटींपैकी मंजूर असलेल्या १८ कोटीतून १३ कोटींच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस शहरात आले असता, त्यांनी शहर विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र, या निधीतून कुठलेही काम मार्गी लागले नव्हते. तसेच मनपा निवडणुकीमध्ये देखील २५ कोटींच्या निधीचा मुद्दा गाजला होता. अखेर उशिरा का होईना २५ कोटींच्या निधीतून कामांना सुरुवात होणार आहे.२५ कोटीच्या निधीची बांधकाम, विद्युत विभाग व पाणीपुरवठा विभागात विभागणी करण्यात आली आहे. त्यातील बांधकाम विभागाकडून १३ कोटी ५० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. १३ कोटीतून १० कोटी रुपयांच्या गटारी बांधण्यात येणार आहेत. लेंडी नाल्यासह इतर पुलांच्या बांधणीसाठी ३ कोटींची तरतूद आहे. तसेच इच्छादेवी ते डी मार्ट व कोट चौक ते गणेश कॉलनी चौकापर्यंत दुभाजक तयार करण्यात येतील. यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ५५ लाखात एसएमआयटी कॉलेजकडे जाणाऱ्या नाल्याचेही स्थलांतर करण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी अंतिम कार्यादेश देण्यात आले आहेत.उर्वरित ७ कोटी रुपयांच्या कामांचेही नियोजन मनपा प्रशासनाने केले आहे. पहिल्या महासभेत या कामांचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.७ कोटी रुपयांच्या निधीतून १० कामे निश्चित करण्यात आली असून, यामध्ये नेरीनाका स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविण्यात येणार आहे. यासाठी ८५ लाख रुपयांचे नियोजन आहे. शहरातील वाढीव भागातील पथदिव्यांसाठी व्यवस्था तसेच पोल उभारण्यासाठी ५१ लाख रुपयांची तरतूद केली आहे.शहरातील प्रमुख नाल्यांच्या संरक्षण भिंतीसाठी २ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर फुले मार्केट ते नेरी नाक्यापर्यंत दुभाजकांची उंचीदेखील वाढवली जाणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव