शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मातृ दिन विशेष- पती निधनानंतर कष्टाचा 'विडा उचलत बेबाबाईने चढवली लेकरांच्या आयुष्याला 'पाना’ची लाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:25 IST

मुलांच्या शिक्षणासाठी बेबाबाईने मोठ्या खस्ता खाल्ल्या.

ठळक मुद्देशिंदीत  ‘पानमंदिर ते घर एक मंदिर, अशी महती मातेचीकुटुंब चांगले स्थिरस्थावर झाले आहे.

संजय हिरे खेडगाव, ता.भडगाव :  पानविडा, विड्याचे पान व एकूणच पानठेला चालविणे याआधी पुरुषप्रधान संस्कृतीत महिलासांठी हे क्षेत्र निषिद्ध मानले गेले. अशा स्थितीत शिंदीतील बेबाबाई मगन सोनार (बाविस्कर) यांनी मात्र पतीनिधनानंतर त्यांचेच उपजीविकेचे साधन असलेली पानटपरी त्यांच्या मागे ३५ वर्षापासून चालवत, रंगणा-या पानविड्यासम आपल्या आयुष्यांचे पान सजविले आहे. पानमंदिरातून मुलाबाळांचे घर एक मंदिर केले आहे.

स्टॅण्डवर टाकली पानटपरीमूळचे तापीकाठच्या बामगावचे हे कुंटुंब शिंदी, ता.भडगाव या बेबाबाईच्या माहेरीच वास्तव्यास आले. सोनार म्हटले म्हणजे सोनारकी आली परंतु परिस्थिती मोलमजुरीची. यामुळे हा व्यवसाय दूरच, चाचभर शेती नाही. शिंदीतील प्रसिध्द तमाशा कलावंत धोंडू-कोंडू यांच्या लोकनाट्य मंडळात जुन्या टमटम नामक मोटारगाडीचे मगन सोनार हे चालक झाले. गाडीचे हँण्डल मारुन मारुन त्यांना दमा जडला म्हणून शिंदी स्टँण्डवर उत्पन्नाचे साधन म्हणून पानटपरी टाकली. पुढे त्यांचे निधन झाले. जबाबदारी बेबाबाई यांच्यावर आली. लहान-लहान दोन मुले, दोन मुली. गावात भाऊ-भावजयी होतेच. शिवाय माहेरच्या माणसांनी भावाप्रमाणे साथ, हिंमत दिली. पानटपरीचा व्यवसायच पुढे चालविण्याचे ठरले. सकाळी शेतावर मजुरी जाण्याआधी व संध्याकाळी शेतमजुरीवरुन आल्या म्हणजे बेबाबाई पानटपरी चालवत. पाच पैसे पानविडा होता. एका दिवशी दोनशे पान खपत. पानाच्या मोबदल्यात गावातून ज्वारी, गहू आदी गव्हाई मिळे. बेबाबाई शेतमजुरीला जात तेव्हा दोन्ही मुली, मुले पानटपरी चालवत. यावरच घरसंसार, दोन मुलींचे विवाह केले. लोटन व  योगेश या दोन मुलांचे शिक्षण केले. मुलांना कुठे कमी पडू दिले नाही. अगदी १०० रुपयाची घरातील ज्वारी विकली पण लहान्याला सहलीला पाठविले, अशी कहाणी आहे. आज मोठा ऑर्डनन्स फॅक्टरीत, तर लहान योगेश खासगी कंपनीत नोकरीला आहेत. गावी चांगले घर बांधले आहे. कुटुंब चांगले स्थिरस्थावर झाले आहे. मुलांना काडीमात्र व्यसन नाही. आईच्या कष्टाची जाणीव ठेवत तिला जपतात. याहून घरापेक्षा मंदिर दुसरे कोणते असू शकते?

बेबाबाईला माहेरची ओढ मुले आईला आपल्याकडे बोलावतात पण बेबाबाईला माहेरची ओढ स्वस्थ बसू देत नाही. लॉकडाऊनमुळे बंद असली तरी आजही त्या वयाच्या पंच्च्याहत्तरीत पानटपरी चालवतात. न घाबरता रात्री उशिरापर्यंत थांबून असता. पानविडा सध्या काहीसा मागे पडलाय म्हणून त्या जोडीने गोळ्या, बिस्कीट व कुरकुरे विकतात. गावातील कै.अभिमन पाटील, कोंडुरामजी, शिवराम दादा, हिराबाई पाटील यांनी त्यावेळेस चांगली साथ दिली, अशी माहेरच्या माणसांच्या मनाच्या श्रीमंतीचा त्या कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात.

                   लेकरांसाठी घेतलेल्या कष्टाला तोड नाहीमुलांच्या शिक्षणासाठी बेबाबाईने मोठ्या खस्ता खाल्ल्या. गावातील पिठाच्या गिरणीत खाली पडलेल्या पिठावर, ज्वारी-बाजरीचा घाटा, फागच्या पानांची भाजी, लाल अडगर ज्वारी यावर दिवस काढले. जात्यावर कुणाचे घरचे दळण कर, कांडण, धान्य सोय-साय कर, कुणाच्या शेतात गहू आदी शेतमालाचा सरा (शेतमाल काढून मागे शिल्लक राहिलेले) कर असा घरसंसार चालवला. एकूणच कहाणी ऐकून डोळ्यातून धारा लागतील, असे मुलांच्या भल्यासाठी तिने कष्ट उपसले.

   

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेBhadgaon भडगाव