शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मातृदिन विशेष- आईच्या कष्टमय धाग्यांनीच मुलाला दिली  ‘खाकी वर्दी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:29 IST

आयुष्याची गाडी रुळावर आली असली तरी त्यांच्यातल्या मातृत्वाला आता संसाराचे गोकुळ करण्याची आस लागली आहे.

ठळक मुद्देअंगणवाडीसेविकाचा पतीच्या निधनानंतरचा संघर्षचाळीसगावच्या मंगला सोनवणे यांच्या जिद्दीची मंगलवात

चाळीसगाव : आठवी इयत्तेतच शाळेचं बोट सुटलं आणि पातोंड्याच्या  मंगला सोनवणे  यांची रेशीमगाठ बांधली गेली. शिलाई यंत्राच्या फिरत्या चाकावर त्यांनी संसाराचं वस्रचं शिवायला घेतलं. अंगणवाडी मदतनीस ते सेविका या ३० वर्षात त्यांच्या कष्टमय धाग्यांनी मुलाच्या अंगावर पोलीस उपनिरीक्षकपदाची खाकी वर्दी चढवली. आजही त्यांच्यातील 'आई' उसंत न घेता धावते आहे. मातृदिनी त्यांचे हे आईपण म्हणूनच झळाळून निघते.

अर्ध्यावरती डाव मोडला...'ऐका ऐका दोस्तहो, मायबापाची कहाणी, माय नारळी खोबरं... बाप नारळाची पाणी...' कवितेच्या या ओळी आई - वडिलांचं कालातीत असणारे महत्व सांगून जातात. कधी-कधी संसार कहाणीचा हा डाव अर्ध्यावर मोडतोही. मंगला सोनवणे यांच्या वाट्याला अर्ध्यावरती डाव मोडण्याचेच दुःख आले. पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुशीत तीन मुले होती. मात्र त्या खचल्या नाहीत. जिद्दीने उभ्या राहिल्या. त्यांच्यातील आई 'हिरकणी'प्रमाणे संघर्षाला तयार झाली.  मंगला सोनवणे यांना संकटांचा डोंगर सर करायचा होता.  शिवण काम करतानाच त्यांनी गावातच अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी स्वीकारली. संसाराचा गाढा ओढताना मुलांनाही शिकवले. मुलीचे हात पिवळे करीत तिचा संसारदेखील थाटून दिला. त्यांचा मोठा मुलगा सद्य:स्थितीत वाशिम जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावत आहे. दुसरा मुलगाही धुळे येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या सेवेत होता. मात्र काही वर्षापूर्वी त्याचे दुर्दैवी निधन झाले.

आई जिद्दीने उभी राहिली म्हणून...५९ वर्षीय मंगला सोनवणे यांची जणू संघर्षासोबतच जीवनगाठ बांधली गेलीय. शिवणकाम करीत असतानाच १९९२ मध्ये त्या पातोंडा अंगणवाडीत मदतनीस रुजू झाल्या. १९९७ मध्ये त्यांचे पती सुदाम सोनवणे यांचे निधन झाले. यावेळी त्यांच्या पदराखाली १६ वर्षाची मुलगी तर १४ आणि १२ वर्षाचे दोन मुले होती. 

शिक्षणवाट पुन्हा सुरू...रेशीमगाठीने अडवलेली त्यांची आठवीनंतरची शिक्षणवाट पुन्हा सुरू झाली. दहावी, बारावीची परीक्षा देऊन त्या डीएडही झाल्या. शिक्षिकेच्या नोकरीसाठी मुलाखतीही दिल्या. तथापि, यात त्यांना यश आले नाही. मुलांच्या पंखांमध्ये बळ देण्यासाठी त्या निग्रहाने परिस्थितीशी झगडत राहिल्या. गत ३० वर्षात त्यांनी एकाकी कुटुंबाला सावरले. मुलीचे लग्नदेखील त्यांनीच हिमतीने लावून दिले. आयुष्याची गाडी रुळावर आली असली तरी त्यांच्यातल्या मातृत्वाला आता संसाराचे गोकुळ करण्याची आस लागली आहे.रडायचं नाही लढायचं !आठवीत असतानाच डोक्यावर अक्षता पडल्या. पुढे त्रासही भोगला. माहेरी येऊन निर्धाराने उभी राहिली. पतीच्या निधनाचा आघात झेलला. कष्टाची लाज न बाळता लढत राहिले. मुलांनीदेखील माझ्या कष्टांची जाणीव ठेवली. माझ्यातील मातृत्वानेच मला रडायचं नाही तर लढायचं हे शिकवले. जीवनात हा मंत्र पाळला तर संकटांचा पराभव करता येतो.-मंगला सुदाम सोनवणे, अंगणवाडीसेविका, पातोंडा, ता.चाळीसगाव.

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेChalisgaonचाळीसगाव