शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

दोन मुलांच्या आईने कुमारी सांगून केले तरुणाशी लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:47 IST

जळगाव : कुमारी असल्याचे सांगून दोन मुलांच्या आईने पाचोरा तालुक्यातील तरुणासोबत लग्न केले. त्याच्याकडून एक लाख रुपये रोकड आणि ...

जळगाव : कुमारी असल्याचे सांगून दोन मुलांच्या आईने पाचोरा तालुक्यातील तरुणासोबत लग्न केले. त्याच्याकडून एक लाख रुपये रोकड आणि १५ हजारांचे दागिने उकळले. हा प्रकार ३० जानेवारी २०१९ रोजी घडला. यात पतीने फसवणूक झाल्याची फिर्याद औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी अमोल रमेश देठेसह दोन महिलांविरुद्ध १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी दोन दलाल महिलांना अटक झाली आहे.पाचोरा तालुक्यातील श्रीराम विरभान पाटील यांच्या तक्रारीनुसार, त्यांची लग्न करण्याची इच्छा असल्यामुळे ते मुलीच्या शोधात होते. दरम्यान, त्यांची औरंगाबादेतील अमोल रमेश देठे याच्याशी ओळख झाली. त्याला लग्नाबाबत सांगितले असता त्याने एका मुलीचे स्थळ असल्याचे पाटील यांना सांगितले. त्यानुसार, पाटील हे औरंगाबादेत आले. तेव्हा देठे आणि एका महिलेने सविता (नाव बदललेले आहे) हिची पाटीलसोबत ओळख करून दिली. पाटीलला सविता पसंद पडल्यानंतर त्यांचे लग्न ठरले. तेव्हा अनिताने कुमारी असल्याचे पाटील यांना सांगितले होते.सविताची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याचे सांगून देठे आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेने पाटीलकडून एक लाख रुपये रोकड आणि अंदाजे पंधरा हजार रुपयांचे दागिने करून घेतले. तेच दागिने सविताला लग्नात घातले होते. त्यानंतर ३० जानेवारी २०१९ रोजी त्यांचा जळगाव येथे विवाह झाला होता. त्यानंतर आईची प्रकृती बिघडल्याचे सांगून सविता ही श्रीराम याला औरंगाबादला घेऊन आली. लघुशंकेचे नाव सागून ती गेली नंतर परत आलीच नाही. मात्र नंतर ती हरविली नसून स्वत:हून पळून गेली व तिला दोन मुले असल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव