शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गहाणवटीचा ऐवज- डोके (५)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:46 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात साहित्यिक प्रा.अनिल सोनार यांचा विशेष लेख गहाणवटीचा ऐवज- डोके.

हिंदी चित्रपटसृष्टीला उर्फ बॉलीवूडला बंगाली, मराठी इत्यादी चित्रपटसृष्टीहून कमअस्सल का मानली जाते, काही कळत नाही. वास्तविक एका सुसंकृत, सज्जन माणसात जे जे गुण असतात, ते सर्व या सृष्टीतल्या लोकांमध्ये असतातच. नुसते असतात असे नाही तर अगदी खच्चून भरलेले असतात. उदाहरणार्थ देवभोळेपणा, ईश्वरावरच असीम श्रद्धा.सिनेमावाल्यांचा कामाचा भारदेवदेवतांवरच असतो,मोलकरणी ‘सीता’ बाय,तर नोकर ‘रामू’ काका असतोयामुळे होते काय की ओठांना सतत देवदेवतांचे स्मरण राहाते. आता प्रामाणिकपणा या गुणाबद्दल बघू. प्रामाणिकपणात नट्या आघाडीवर असतात. त्यांच्या सौंदर्याचं रहस्य कशात आहे हे त्या कधीच दडवून ठेवत नाहीत. त्यावरून कळतं की-अभिनेत्रींच्या सौंदर्याचं जन्म रहस्य विविध साबणांमध्ये असतं,म्हणून तर साबणांच्या जागी त्यांच्या आईवडिलांचं नाव नसतंअर्थात हा त्यांचा प्रामाणिकपणाही गोंधळात टाकणारा असतो. सिनेसृष्टी म्हणजे जाहिरातींवर उभी असलेली इमारत. तिथे-जाहिरातींच्या कसबावरबैलसुध्दा राहातो गाभणसौंदर्य रहस्य म्हणून सांगतेप्रत्येक नटी वेगळाच साबण.यामुळे गडबड अशी होते की, सौंदर्योत्सुक तरुणी ते सगळेच साबण खरेदी करून आणतात आणि वापरतातही. पण होते असे की, प्रत्येक साबण बहुदा असा विचार करतो की, ‘तो साबण तिला सुंदर करेलच, मग मी कशाला.’ या भानगडीत त्या तरुणींचे सुंदर व्हायचे राहूनच जाते.खरं बोलणं, सत्यवादी असणं, हा एरवीही तसा दुर्मिळच गुण, पण या सृष्टीत तो सढळपणे आढळतो. एक अभिनेत्री समोरून येताना दिसताच मी माझ्या सिनेपत्रकार मित्राला म्हणालो, ‘ती बघ सत्यवादी नसणारी खोटारडी अभिनेत्री’ त्यावर हसून माझा मित्र म्हणाला, ‘ती पूर्णपणे खोटं बोलणारी नाहीये.ऐक-ती अभिनेत्री खरंसुद्धाबोलून जाते अधून-मधून,मी विचारलं, ‘विवाहित’?ती म्हणाली, ‘अधून-मधून’ती तरी काय करणार बिचारी. माझ्या या अति उत्साही पत्रकार मित्रासारखे नट्यांच्या संदर्भात कायम उत्सुक असणारे पत्रकार काय विचारतील आणि काय लिहितील, सांगता येत नाही. माझा हा पत्रकार मित्रच घ्या-नटीबद्दल उत्साह दाखवणार नाहीमग तो पत्रकार कसला,तिच्या लग्नाच्या बातमीबरोबरचपुत्रप्राप्तीबद्दलही लिहून बसलाजिद्द हाही मोठा गुण इथल्या मंडळींमध्ये असतो. एकेकाळी प्रदीपकुमार, भारतभूषण इत्यादी ठोकळेबाज मख्य चेहऱ्यांनीही एका मागोमाग एक चित्रपट गाजवले होते. इकडे महंमद रफी गायचा, तिकडे भारत भूषणचा ‘बैजू’ हीट व्हायचा. जमाना बदलला तरी आपल्या चेहºयाला अभिनयाचा स्पर्शही होऊ न देणारे हिरो आजही आहेत. फरक आहे तो या नव्यांच्या जिद्दीत. त्यांच्या अभिनयाला उंची गाठून देण्याच्या क्तृप्त्यात कसे ते बघावं.नटाने आपल्या अभिनयालाशेवटी उंचावर नेलेच.डोंगरावर युनिट नेऊनशिखरावर शुटींग केले.निर्जिव अभिनय म्हणणाºयांनात्याने चोख उत्तर दिले.निर्जिव चेहरा तसाच ठेवूनमरण दृष्य ‘जिवंत’ केले.-प्रा.अनिल सोनार