शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

गहाणवटीचा ऐवज- डोके (५)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:46 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात साहित्यिक प्रा.अनिल सोनार यांचा विशेष लेख गहाणवटीचा ऐवज- डोके.

हिंदी चित्रपटसृष्टीला उर्फ बॉलीवूडला बंगाली, मराठी इत्यादी चित्रपटसृष्टीहून कमअस्सल का मानली जाते, काही कळत नाही. वास्तविक एका सुसंकृत, सज्जन माणसात जे जे गुण असतात, ते सर्व या सृष्टीतल्या लोकांमध्ये असतातच. नुसते असतात असे नाही तर अगदी खच्चून भरलेले असतात. उदाहरणार्थ देवभोळेपणा, ईश्वरावरच असीम श्रद्धा.सिनेमावाल्यांचा कामाचा भारदेवदेवतांवरच असतो,मोलकरणी ‘सीता’ बाय,तर नोकर ‘रामू’ काका असतोयामुळे होते काय की ओठांना सतत देवदेवतांचे स्मरण राहाते. आता प्रामाणिकपणा या गुणाबद्दल बघू. प्रामाणिकपणात नट्या आघाडीवर असतात. त्यांच्या सौंदर्याचं रहस्य कशात आहे हे त्या कधीच दडवून ठेवत नाहीत. त्यावरून कळतं की-अभिनेत्रींच्या सौंदर्याचं जन्म रहस्य विविध साबणांमध्ये असतं,म्हणून तर साबणांच्या जागी त्यांच्या आईवडिलांचं नाव नसतंअर्थात हा त्यांचा प्रामाणिकपणाही गोंधळात टाकणारा असतो. सिनेसृष्टी म्हणजे जाहिरातींवर उभी असलेली इमारत. तिथे-जाहिरातींच्या कसबावरबैलसुध्दा राहातो गाभणसौंदर्य रहस्य म्हणून सांगतेप्रत्येक नटी वेगळाच साबण.यामुळे गडबड अशी होते की, सौंदर्योत्सुक तरुणी ते सगळेच साबण खरेदी करून आणतात आणि वापरतातही. पण होते असे की, प्रत्येक साबण बहुदा असा विचार करतो की, ‘तो साबण तिला सुंदर करेलच, मग मी कशाला.’ या भानगडीत त्या तरुणींचे सुंदर व्हायचे राहूनच जाते.खरं बोलणं, सत्यवादी असणं, हा एरवीही तसा दुर्मिळच गुण, पण या सृष्टीत तो सढळपणे आढळतो. एक अभिनेत्री समोरून येताना दिसताच मी माझ्या सिनेपत्रकार मित्राला म्हणालो, ‘ती बघ सत्यवादी नसणारी खोटारडी अभिनेत्री’ त्यावर हसून माझा मित्र म्हणाला, ‘ती पूर्णपणे खोटं बोलणारी नाहीये.ऐक-ती अभिनेत्री खरंसुद्धाबोलून जाते अधून-मधून,मी विचारलं, ‘विवाहित’?ती म्हणाली, ‘अधून-मधून’ती तरी काय करणार बिचारी. माझ्या या अति उत्साही पत्रकार मित्रासारखे नट्यांच्या संदर्भात कायम उत्सुक असणारे पत्रकार काय विचारतील आणि काय लिहितील, सांगता येत नाही. माझा हा पत्रकार मित्रच घ्या-नटीबद्दल उत्साह दाखवणार नाहीमग तो पत्रकार कसला,तिच्या लग्नाच्या बातमीबरोबरचपुत्रप्राप्तीबद्दलही लिहून बसलाजिद्द हाही मोठा गुण इथल्या मंडळींमध्ये असतो. एकेकाळी प्रदीपकुमार, भारतभूषण इत्यादी ठोकळेबाज मख्य चेहऱ्यांनीही एका मागोमाग एक चित्रपट गाजवले होते. इकडे महंमद रफी गायचा, तिकडे भारत भूषणचा ‘बैजू’ हीट व्हायचा. जमाना बदलला तरी आपल्या चेहºयाला अभिनयाचा स्पर्शही होऊ न देणारे हिरो आजही आहेत. फरक आहे तो या नव्यांच्या जिद्दीत. त्यांच्या अभिनयाला उंची गाठून देण्याच्या क्तृप्त्यात कसे ते बघावं.नटाने आपल्या अभिनयालाशेवटी उंचावर नेलेच.डोंगरावर युनिट नेऊनशिखरावर शुटींग केले.निर्जिव अभिनय म्हणणाºयांनात्याने चोख उत्तर दिले.निर्जिव चेहरा तसाच ठेवूनमरण दृष्य ‘जिवंत’ केले.-प्रा.अनिल सोनार