शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

गहाणवटीचा ऐवज- डोके (५)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:46 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात साहित्यिक प्रा.अनिल सोनार यांचा विशेष लेख गहाणवटीचा ऐवज- डोके.

हिंदी चित्रपटसृष्टीला उर्फ बॉलीवूडला बंगाली, मराठी इत्यादी चित्रपटसृष्टीहून कमअस्सल का मानली जाते, काही कळत नाही. वास्तविक एका सुसंकृत, सज्जन माणसात जे जे गुण असतात, ते सर्व या सृष्टीतल्या लोकांमध्ये असतातच. नुसते असतात असे नाही तर अगदी खच्चून भरलेले असतात. उदाहरणार्थ देवभोळेपणा, ईश्वरावरच असीम श्रद्धा.सिनेमावाल्यांचा कामाचा भारदेवदेवतांवरच असतो,मोलकरणी ‘सीता’ बाय,तर नोकर ‘रामू’ काका असतोयामुळे होते काय की ओठांना सतत देवदेवतांचे स्मरण राहाते. आता प्रामाणिकपणा या गुणाबद्दल बघू. प्रामाणिकपणात नट्या आघाडीवर असतात. त्यांच्या सौंदर्याचं रहस्य कशात आहे हे त्या कधीच दडवून ठेवत नाहीत. त्यावरून कळतं की-अभिनेत्रींच्या सौंदर्याचं जन्म रहस्य विविध साबणांमध्ये असतं,म्हणून तर साबणांच्या जागी त्यांच्या आईवडिलांचं नाव नसतंअर्थात हा त्यांचा प्रामाणिकपणाही गोंधळात टाकणारा असतो. सिनेसृष्टी म्हणजे जाहिरातींवर उभी असलेली इमारत. तिथे-जाहिरातींच्या कसबावरबैलसुध्दा राहातो गाभणसौंदर्य रहस्य म्हणून सांगतेप्रत्येक नटी वेगळाच साबण.यामुळे गडबड अशी होते की, सौंदर्योत्सुक तरुणी ते सगळेच साबण खरेदी करून आणतात आणि वापरतातही. पण होते असे की, प्रत्येक साबण बहुदा असा विचार करतो की, ‘तो साबण तिला सुंदर करेलच, मग मी कशाला.’ या भानगडीत त्या तरुणींचे सुंदर व्हायचे राहूनच जाते.खरं बोलणं, सत्यवादी असणं, हा एरवीही तसा दुर्मिळच गुण, पण या सृष्टीत तो सढळपणे आढळतो. एक अभिनेत्री समोरून येताना दिसताच मी माझ्या सिनेपत्रकार मित्राला म्हणालो, ‘ती बघ सत्यवादी नसणारी खोटारडी अभिनेत्री’ त्यावर हसून माझा मित्र म्हणाला, ‘ती पूर्णपणे खोटं बोलणारी नाहीये.ऐक-ती अभिनेत्री खरंसुद्धाबोलून जाते अधून-मधून,मी विचारलं, ‘विवाहित’?ती म्हणाली, ‘अधून-मधून’ती तरी काय करणार बिचारी. माझ्या या अति उत्साही पत्रकार मित्रासारखे नट्यांच्या संदर्भात कायम उत्सुक असणारे पत्रकार काय विचारतील आणि काय लिहितील, सांगता येत नाही. माझा हा पत्रकार मित्रच घ्या-नटीबद्दल उत्साह दाखवणार नाहीमग तो पत्रकार कसला,तिच्या लग्नाच्या बातमीबरोबरचपुत्रप्राप्तीबद्दलही लिहून बसलाजिद्द हाही मोठा गुण इथल्या मंडळींमध्ये असतो. एकेकाळी प्रदीपकुमार, भारतभूषण इत्यादी ठोकळेबाज मख्य चेहऱ्यांनीही एका मागोमाग एक चित्रपट गाजवले होते. इकडे महंमद रफी गायचा, तिकडे भारत भूषणचा ‘बैजू’ हीट व्हायचा. जमाना बदलला तरी आपल्या चेहºयाला अभिनयाचा स्पर्शही होऊ न देणारे हिरो आजही आहेत. फरक आहे तो या नव्यांच्या जिद्दीत. त्यांच्या अभिनयाला उंची गाठून देण्याच्या क्तृप्त्यात कसे ते बघावं.नटाने आपल्या अभिनयालाशेवटी उंचावर नेलेच.डोंगरावर युनिट नेऊनशिखरावर शुटींग केले.निर्जिव अभिनय म्हणणाºयांनात्याने चोख उत्तर दिले.निर्जिव चेहरा तसाच ठेवूनमरण दृष्य ‘जिवंत’ केले.-प्रा.अनिल सोनार