शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

महिनाभरापासून मृत्यूदर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या मृत्यू घटले आहेत, मात्र, थांबलेले नाहीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या मृत्यू घटले आहेत, मात्र, थांबलेले नाहीत त्यामुळे २५ ऑक्टोबरपासून २.३८ टक्के असलेला मृत्यूदर हा महिनाभरानंतरही २.३८ टक्क्यांवरच कायम आहे. हा दर एक टक्का नेण्याचे उद्देश असल्याचे मध्यंतरी आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जायचे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृतांची संख्या ही १३०२ झालेली आहे. त्यामुळे रोजचे होणारे मृत्यू थांबवणे हे यंत्रणेपुढील आव्हान कायम आहे.

रुग्ण घटले, मृतांची संख्याही घटली म्हणून निश्चींत राहणे योग्य ठरणार नाही, असे वरिष्ठ पातळीवरून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, जिल्ह्यात रुग्ण संख्या, बाधितांचे प्रमाण घटत असल्याचे पाहून चाचण्यां अचानक घटल्याने ही बाब आगामी काळात धोकेदायक ठरू शकते, असेही काही तज्ञांचे मत आहे. जळगाव शहर वगळता अन्य ग्रामीण भागात चाचण्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. रुग्णच नाही, रुग्णच येत नाही, अशी कारणेही यामागे दिली जातात. मात्र, संर्साचा फैलाव होण्यासाठी ही बाब पुरेशी ठरू शकते, कोरोनाच्या सुरूवातीला हीच बाब अतिशय धोकादायक ठरली होती. त्यामुळे मृत्यू पूर्णत: थांबवायचे असल्यास हायरिस्क लोकांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे चित्र आहे.

या तालुक्यात सर्वाधिक मृत्यू कंसात मृत्यूदर

जळगाव - ३५९ (२.३७%)

भुसावळ - १७० (४.०० %)

अमळनेर - १६३ (२.३०%)

रावेर - १०१ (४.७४ %)

चाळीसगाव -७५ (२.०९ %)

चोपडा -७४ (२.०९ %)

पाचोरा - ७३ (३.७० %)

पन्नास वर्षाखालीलही मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ५० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या रुग्णांचा समावेश होता. एकत्रित चित्र बघता १५५ रुग्ण हे पन्नास वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाचे होते, मात्र, यातील बऱ्याच रुग्णांना अन्य व्याधी असणे आणि रुग्णालयात उशिरा दाखल होणे ही मृत्यूची कारणे असल्याचे डॉक्टारांचे म्हणणे आहे.