शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
3
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
4
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
5
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
7
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
8
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
9
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
12
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
13
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
14
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
15
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
16
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
17
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
18
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
19
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
20
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ५०० हून अधिक नागरिक राहताहेत धोकेदायक इमारतींमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा येथे सोमवारी रात्री तीन मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळली, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा येथे सोमवारी रात्री तीन मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळली, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसाळ्यात अनेक धोकेदायक इमारत कोसळण्याच्या घटना या घडत असतात, जळगाव शहरातदेखील १०८ धोकेदायक इमारती असून, या इमारतींमध्ये ५०० हून अधिक नागरिक दररोजची रात्र जीव मुठीत घेऊन काढत आहेत. मनपाकडून दरवर्षी इमारत मालकांना नोटीस बजाविण्याची औपचारिकता केली जाते. मात्र, कोणतीही कार्यवाही या इमारतींबाबत होताना दिसून येत नाही.

शहरात अखेरच्या घटका मोजत असलेल्या तब्बल १०८ इमारती आहेत. दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीच्या मालकांना नोटीस बजावण्याची ‘औपचारिकता’ महापालिकेकडून पार पाडली जाते. मात्र ही काही वर्षांपासूनची नोटीस देण्याची परंपरेचा प्रशासन व इमारत मालक यांच्यावर काहीही फरक पडत नसल्याने याठिकाणी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण मनपा नेहमी नोटीस देते, आणि इमारत मालक त्या नोटिसीकडे नेहमी दुर्लक्ष करत असतो. शहरातील तब्बल १०८ पडक्या इमारती कनिष्ठ अभियंत्यांनी सर्वेक्षण करून धोकादायक ठरविल्या आहेत. यातील इमारतींमध्ये आजही काही कुटुंबे जीव मुठीत घेऊन वावरत आहेत.

दंडात्मक शिक्षेची तरतूद

दरवर्षी महापालिका मालकांना ‘महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम २६५ (अ) अन्वये नोटीस बजावते. मात्र काहीच उपयोग होत नाही. १९५० मधील तरतुदीनुसार नोटीस दिल्यानंतर होणाऱ्या जीवित किंवा वित्तहानीस इमारत मालक जबाबदार असतो. त्यात दंडात्मक शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत मनपाकडून अशाप्रकारे कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

मनपा प्रशासनही इमारत पडण्याचा प्रतीक्षेत

पाचोरा येथे सोमवारी रात्री अचानक तीन मजली इमारत कोसळली, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे जिल्हाभरातील धोकेदायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जळगाव शहरात १०८ इमारती धोकेदायक ठरविण्यात आल्या आहेत. याठिकाणचे रहिवासी ही इमारत सोडायला तयार नाही व मनपा प्रशासन याबाबत कारवाई करायला तयार नाही. मनपा प्रशासन याबाबत कारवाई करण्यासाठी मोठ्या घटनेची वाट पाहत आहे का? असा प्रश्न निर्माण केला जात आहे.

शिवाजीनगरात कोसळले घर

यंदा सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील शिवाजीनगर भागातील एक घरदेखील कोसळले, या घरात सुदैवाने कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शहरात अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनपाने केवळ नोटिसांचा फार्स न दाखवता कार्यवाही करण्याची गरज आहे.