शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शहरात ५०० हून अधिक नागरिक राहताहेत धोकेदायक इमारतींमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा येथे सोमवारी रात्री तीन मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळली, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा येथे सोमवारी रात्री तीन मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळली, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसाळ्यात अनेक धोकेदायक इमारत कोसळण्याच्या घटना या घडत असतात, जळगाव शहरातदेखील १०८ धोकेदायक इमारती असून, या इमारतींमध्ये ५०० हून अधिक नागरिक दररोजची रात्र जीव मुठीत घेऊन काढत आहेत. मनपाकडून दरवर्षी इमारत मालकांना नोटीस बजाविण्याची औपचारिकता केली जाते. मात्र, कोणतीही कार्यवाही या इमारतींबाबत होताना दिसून येत नाही.

शहरात अखेरच्या घटका मोजत असलेल्या तब्बल १०८ इमारती आहेत. दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीच्या मालकांना नोटीस बजावण्याची ‘औपचारिकता’ महापालिकेकडून पार पाडली जाते. मात्र ही काही वर्षांपासूनची नोटीस देण्याची परंपरेचा प्रशासन व इमारत मालक यांच्यावर काहीही फरक पडत नसल्याने याठिकाणी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण मनपा नेहमी नोटीस देते, आणि इमारत मालक त्या नोटिसीकडे नेहमी दुर्लक्ष करत असतो. शहरातील तब्बल १०८ पडक्या इमारती कनिष्ठ अभियंत्यांनी सर्वेक्षण करून धोकादायक ठरविल्या आहेत. यातील इमारतींमध्ये आजही काही कुटुंबे जीव मुठीत घेऊन वावरत आहेत.

दंडात्मक शिक्षेची तरतूद

दरवर्षी महापालिका मालकांना ‘महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम २६५ (अ) अन्वये नोटीस बजावते. मात्र काहीच उपयोग होत नाही. १९५० मधील तरतुदीनुसार नोटीस दिल्यानंतर होणाऱ्या जीवित किंवा वित्तहानीस इमारत मालक जबाबदार असतो. त्यात दंडात्मक शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत मनपाकडून अशाप्रकारे कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

मनपा प्रशासनही इमारत पडण्याचा प्रतीक्षेत

पाचोरा येथे सोमवारी रात्री अचानक तीन मजली इमारत कोसळली, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे जिल्हाभरातील धोकेदायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जळगाव शहरात १०८ इमारती धोकेदायक ठरविण्यात आल्या आहेत. याठिकाणचे रहिवासी ही इमारत सोडायला तयार नाही व मनपा प्रशासन याबाबत कारवाई करायला तयार नाही. मनपा प्रशासन याबाबत कारवाई करण्यासाठी मोठ्या घटनेची वाट पाहत आहे का? असा प्रश्न निर्माण केला जात आहे.

शिवाजीनगरात कोसळले घर

यंदा सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील शिवाजीनगर भागातील एक घरदेखील कोसळले, या घरात सुदैवाने कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शहरात अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनपाने केवळ नोटिसांचा फार्स न दाखवता कार्यवाही करण्याची गरज आहे.