शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 13:00 IST

ग्रामस्थांचे हाल

ठळक मुद्देआठ दिवसात समस्या मार्गी लावण्याचे आश्वासननागरिक मोठ्या संख्येने सहभागी

जळगाव : कुसुंबा येथील तुळसाईनगर भागात गेल्या चार महिन्यांपासून आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी सकाळी दहा वाजता कुसुंबा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी सरपंच देविदास पाटील यांनी आठ दिवसात वेळेवर पाणी पुरवठा सुुरु होणार असल्याचे लेखी आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले.तुळसाईनगरात आठ ते दहा दिवसाआड पुरवठा होत असल्याने या भागातील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी ७ जुलै रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात ४० ते ५० महिला व पुरुषही सहभागी झाल्या होत्या. जो पर्यंत पाण्याची समस्या सोडविण्यात येणार नाही, तो पर्यंत या ठिकाणाहून मोर्चा मागे घेणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला होता. यावर सरपंच देविदास पाटील यांनी या रहिवाशांशी चर्चा केली व आठ दिवसांत पाण्याची समस्या सोडवून ग्रामपंचायतीतर्फे वेळेवर पाणी पुरवठा करणार असल्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिल्यावर संतप्त महिलांनी आपला मोर्चा मागे घेतला. या मोर्चात मनीषा खैरनार, रंजनाबाई सोनवणे,सुरेखा पाटील, विनोद पाटील, गोपीचंद पाटील आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव