शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 13:00 IST

ग्रामस्थांचे हाल

ठळक मुद्देआठ दिवसात समस्या मार्गी लावण्याचे आश्वासननागरिक मोठ्या संख्येने सहभागी

जळगाव : कुसुंबा येथील तुळसाईनगर भागात गेल्या चार महिन्यांपासून आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी सकाळी दहा वाजता कुसुंबा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी सरपंच देविदास पाटील यांनी आठ दिवसात वेळेवर पाणी पुरवठा सुुरु होणार असल्याचे लेखी आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले.तुळसाईनगरात आठ ते दहा दिवसाआड पुरवठा होत असल्याने या भागातील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी ७ जुलै रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात ४० ते ५० महिला व पुरुषही सहभागी झाल्या होत्या. जो पर्यंत पाण्याची समस्या सोडविण्यात येणार नाही, तो पर्यंत या ठिकाणाहून मोर्चा मागे घेणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला होता. यावर सरपंच देविदास पाटील यांनी या रहिवाशांशी चर्चा केली व आठ दिवसांत पाण्याची समस्या सोडवून ग्रामपंचायतीतर्फे वेळेवर पाणी पुरवठा करणार असल्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिल्यावर संतप्त महिलांनी आपला मोर्चा मागे घेतला. या मोर्चात मनीषा खैरनार, रंजनाबाई सोनवणे,सुरेखा पाटील, विनोद पाटील, गोपीचंद पाटील आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव