शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

अमळनेरात सोमवारच्या जनता कर्फ्यूस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 19:10 IST

सोमवारच्या ‘बंद’ला सर्व व्यापारी बांधव आणि लहान मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिल्याने बंद यशस्वी झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसर्व दुकानदारांनी दिला प्रतिसाद, मात्र ‘नो व्हेइकल डे’ ठरला नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शहरात याआधी रविवारच्या ‘जनता कर्फ्यू’ला व्यापारी संघटनांचा विरोध झाला असताना सोमवारच्या ‘बंद’ला सर्व व्यापारी बांधव आणि लहान मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिल्याने बंद यशस्वी झाल्याचे दिसून आले. मात्र ‘नो व्हेइकल डे’ला कोणीच गांभीर्याने न घेतल्याने हा उपक्रम कागदावरच राहिला.

नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल चौधरी व मगन चौधरी या दोघांवर पालिकेच्या अतिक्रमण पथकातील राधेश्याम अग्रवाल व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली. या ‘बंद’मध्ये केवळ मेडिकल दुकाने, कृषी विक्रेते, दुग्ध व्यावसायिक, दवाखाने आदींना ‘बंद’मधून वगळण्यात आल्याने ही दुकाने सुरळीत सुरू होती. मात्र किराणा, कापड दुकान, जनरल स्टोअर्स, हॉटेल व्यावसायिक, भाजी व फळ विक्रेतेसह इतर दुकाने सकाळपासून रात्रीपर्यंत बंदच होती. यामुळे बाजारपेठेत रस्त्यावर बऱ्यापैकी शुकशुकाट होता.

दरम्यान व्यापारी व व्यावसायिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता सोमवारचा जनता कर्फ्यू नियमित राहू शकेल, अशी शक्यता असून सोमवारच्या ‘बंद’ला मात्र भाजीपाला अडते, किरकोळ विक्रेते, यासह काही दुकानदारांचा मात्र विरोधच आहे. याशिवाय अमळनेर शहर व्यापारी महासंघाचादेखील या ‘बंद’ला विरोध आहे.

‘नो व्हेइकल डे’लाच आरटीओ कॅम्प कसा?

अमळनेर नगरपरिषदेने शासन निर्देशानुसार ‘माझी वसुंधरा’ या अभियानातंर्गत गेल्या तीन आठवड्यापासून शहरात दर सोमवारी ‘नो व्हेइकल’ डे जाहीर केला आहे. या उपक्रमास जनतेनेच पाहिजे तेवढे गांभीर्याने न घेतल्याने दर सोमवार ‘व्हेइकल डे’च ठरत आहे. या सोमवारी प्रशासनाने जनता कर्फ्यूदेखील जाहीर केल्याने आता तरी ‘बंद’मुळे नागरिक एक दिवस आपली वाहने पार्क करून ‘नो व्हेइकल डे’ यशस्वी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. खरे पाहता नो व्हेइकल व जनता कर्फ्यू असे उपक्रम राबविताना प्रशासनाचादेखील एकमेकांशी ताळमेळ नसावा, असे दिसते. कारण एकीकडे ‘नो व्हेइकल डे’ असताना दुसरीकडे शहरातील विश्रामगृहात आरटीओ कॅम्प ठेवण्यात आला होता. तसेच ग्रा. पं. निवडणुकीची माघारीची अंतिम मुदत असल्याने ग्रामीण मंडळी मोठ्या प्रमाणात शहरात आली होती. त्यामुळे या दिवशी जनता कर्फ्यू कसा? असा सवाल जनतेने उपस्थित केला.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरcorona virusकोरोना वायरस बातम्या