शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

अमळनेरात सोमवारच्या जनता कर्फ्यूस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 19:10 IST

सोमवारच्या ‘बंद’ला सर्व व्यापारी बांधव आणि लहान मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिल्याने बंद यशस्वी झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसर्व दुकानदारांनी दिला प्रतिसाद, मात्र ‘नो व्हेइकल डे’ ठरला नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शहरात याआधी रविवारच्या ‘जनता कर्फ्यू’ला व्यापारी संघटनांचा विरोध झाला असताना सोमवारच्या ‘बंद’ला सर्व व्यापारी बांधव आणि लहान मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिल्याने बंद यशस्वी झाल्याचे दिसून आले. मात्र ‘नो व्हेइकल डे’ला कोणीच गांभीर्याने न घेतल्याने हा उपक्रम कागदावरच राहिला.

नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल चौधरी व मगन चौधरी या दोघांवर पालिकेच्या अतिक्रमण पथकातील राधेश्याम अग्रवाल व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली. या ‘बंद’मध्ये केवळ मेडिकल दुकाने, कृषी विक्रेते, दुग्ध व्यावसायिक, दवाखाने आदींना ‘बंद’मधून वगळण्यात आल्याने ही दुकाने सुरळीत सुरू होती. मात्र किराणा, कापड दुकान, जनरल स्टोअर्स, हॉटेल व्यावसायिक, भाजी व फळ विक्रेतेसह इतर दुकाने सकाळपासून रात्रीपर्यंत बंदच होती. यामुळे बाजारपेठेत रस्त्यावर बऱ्यापैकी शुकशुकाट होता.

दरम्यान व्यापारी व व्यावसायिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता सोमवारचा जनता कर्फ्यू नियमित राहू शकेल, अशी शक्यता असून सोमवारच्या ‘बंद’ला मात्र भाजीपाला अडते, किरकोळ विक्रेते, यासह काही दुकानदारांचा मात्र विरोधच आहे. याशिवाय अमळनेर शहर व्यापारी महासंघाचादेखील या ‘बंद’ला विरोध आहे.

‘नो व्हेइकल डे’लाच आरटीओ कॅम्प कसा?

अमळनेर नगरपरिषदेने शासन निर्देशानुसार ‘माझी वसुंधरा’ या अभियानातंर्गत गेल्या तीन आठवड्यापासून शहरात दर सोमवारी ‘नो व्हेइकल’ डे जाहीर केला आहे. या उपक्रमास जनतेनेच पाहिजे तेवढे गांभीर्याने न घेतल्याने दर सोमवार ‘व्हेइकल डे’च ठरत आहे. या सोमवारी प्रशासनाने जनता कर्फ्यूदेखील जाहीर केल्याने आता तरी ‘बंद’मुळे नागरिक एक दिवस आपली वाहने पार्क करून ‘नो व्हेइकल डे’ यशस्वी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. खरे पाहता नो व्हेइकल व जनता कर्फ्यू असे उपक्रम राबविताना प्रशासनाचादेखील एकमेकांशी ताळमेळ नसावा, असे दिसते. कारण एकीकडे ‘नो व्हेइकल डे’ असताना दुसरीकडे शहरातील विश्रामगृहात आरटीओ कॅम्प ठेवण्यात आला होता. तसेच ग्रा. पं. निवडणुकीची माघारीची अंतिम मुदत असल्याने ग्रामीण मंडळी मोठ्या प्रमाणात शहरात आली होती. त्यामुळे या दिवशी जनता कर्फ्यू कसा? असा सवाल जनतेने उपस्थित केला.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरcorona virusकोरोना वायरस बातम्या