शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अमळनेरात सोमवारच्या जनता कर्फ्यूस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 19:10 IST

सोमवारच्या ‘बंद’ला सर्व व्यापारी बांधव आणि लहान मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिल्याने बंद यशस्वी झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसर्व दुकानदारांनी दिला प्रतिसाद, मात्र ‘नो व्हेइकल डे’ ठरला नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शहरात याआधी रविवारच्या ‘जनता कर्फ्यू’ला व्यापारी संघटनांचा विरोध झाला असताना सोमवारच्या ‘बंद’ला सर्व व्यापारी बांधव आणि लहान मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिल्याने बंद यशस्वी झाल्याचे दिसून आले. मात्र ‘नो व्हेइकल डे’ला कोणीच गांभीर्याने न घेतल्याने हा उपक्रम कागदावरच राहिला.

नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल चौधरी व मगन चौधरी या दोघांवर पालिकेच्या अतिक्रमण पथकातील राधेश्याम अग्रवाल व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली. या ‘बंद’मध्ये केवळ मेडिकल दुकाने, कृषी विक्रेते, दुग्ध व्यावसायिक, दवाखाने आदींना ‘बंद’मधून वगळण्यात आल्याने ही दुकाने सुरळीत सुरू होती. मात्र किराणा, कापड दुकान, जनरल स्टोअर्स, हॉटेल व्यावसायिक, भाजी व फळ विक्रेतेसह इतर दुकाने सकाळपासून रात्रीपर्यंत बंदच होती. यामुळे बाजारपेठेत रस्त्यावर बऱ्यापैकी शुकशुकाट होता.

दरम्यान व्यापारी व व्यावसायिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता सोमवारचा जनता कर्फ्यू नियमित राहू शकेल, अशी शक्यता असून सोमवारच्या ‘बंद’ला मात्र भाजीपाला अडते, किरकोळ विक्रेते, यासह काही दुकानदारांचा मात्र विरोधच आहे. याशिवाय अमळनेर शहर व्यापारी महासंघाचादेखील या ‘बंद’ला विरोध आहे.

‘नो व्हेइकल डे’लाच आरटीओ कॅम्प कसा?

अमळनेर नगरपरिषदेने शासन निर्देशानुसार ‘माझी वसुंधरा’ या अभियानातंर्गत गेल्या तीन आठवड्यापासून शहरात दर सोमवारी ‘नो व्हेइकल’ डे जाहीर केला आहे. या उपक्रमास जनतेनेच पाहिजे तेवढे गांभीर्याने न घेतल्याने दर सोमवार ‘व्हेइकल डे’च ठरत आहे. या सोमवारी प्रशासनाने जनता कर्फ्यूदेखील जाहीर केल्याने आता तरी ‘बंद’मुळे नागरिक एक दिवस आपली वाहने पार्क करून ‘नो व्हेइकल डे’ यशस्वी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. खरे पाहता नो व्हेइकल व जनता कर्फ्यू असे उपक्रम राबविताना प्रशासनाचादेखील एकमेकांशी ताळमेळ नसावा, असे दिसते. कारण एकीकडे ‘नो व्हेइकल डे’ असताना दुसरीकडे शहरातील विश्रामगृहात आरटीओ कॅम्प ठेवण्यात आला होता. तसेच ग्रा. पं. निवडणुकीची माघारीची अंतिम मुदत असल्याने ग्रामीण मंडळी मोठ्या प्रमाणात शहरात आली होती. त्यामुळे या दिवशी जनता कर्फ्यू कसा? असा सवाल जनतेने उपस्थित केला.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरcorona virusकोरोना वायरस बातम्या