शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्हा युवक कॉँग्रेसची आदर्श निवडणूक प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 12:50 IST

- चंद्रशेखर जोशीसंघटनात्मक निवडणुका म्हटल्या म्हणजे राजकीय पक्षांची डोकेदुखी. त्यातच गटबाजीचे ग्रहण हे प्रत्येक राजकीय पक्षात असतेच. त्यामुळे ज्याचे संघटनेवर व केंद्र राज्यातील संघटनेवर प्राबल्य त्याची सरशी हे ठरलेले. राजकीय संघटनांना विविध पदांवर नियुक्त्या देणे सोपे. कारण काही काळ वाद, टीका टिप्पणी झाली की सारे काही शांत होते. निवडणुकीची प्रक्रिया ...

- चंद्रशेखर जोशीसंघटनात्मक निवडणुका म्हटल्या म्हणजे राजकीय पक्षांची डोकेदुखी. त्यातच गटबाजीचे ग्रहण हे प्रत्येक राजकीय पक्षात असतेच. त्यामुळे ज्याचे संघटनेवर व केंद्र राज्यातील संघटनेवर प्राबल्य त्याची सरशी हे ठरलेले. राजकीय संघटनांना विविध पदांवर नियुक्त्या देणे सोपे. कारण काही काळ वाद, टीका टिप्पणी झाली की सारे काही शांत होते. निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यापेक्षा राजकीय पक्ष निवड करून मोकळे होणे याच पद्धतीचा अवलंब बऱ्याच वेळेस करत असतात. पण जेव्हा एखादा पक्ष आपल्या संघटनेत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करून त्याची प्रामाणिकपणे अमंलबजावणी करतो, ती एक आदर्श निवडणूक पद्धती ठरते. कॉँग्रेस पक्षावर विरोधक चहुबाजूंनी चुका करत असतात. सत्तेबाहेर असताना या पक्षाने नुकतीच एक निवडणूक प्रक्रिया राबविली. राज्यापासून तर जिल्हा पातळीपर्यंत यासाठी निरीक्षक नेमून निवडणूक घेतली. ही निवडणूक युवक कॉँग्रेस अंतर्गत झाली. नेहमीप्रमाणे अगोदर युवक सदस्यांची नोंदणी झाली, त्यांना सभासदत्व दिले गेले व नंतर तालुका अध्यक्षांपासून तर जिल्हाध्यक्षपदांची निवडणूक घेण्यात आली. जळगाव जिल्ह्यात युवक कॉँग्रेसची निवड प्रक्रिया नुकतीच झाली. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत प्रा. हितेश सुभाष पाटील यांनी कॉँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. ललिता पाटील यांचे चिरंजीव व जळगाव लोकसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष पराग पाटील यांचा अवघ्या ३० मतांनी पराभव केला. प्रा.पाटील यांना एकूण १०३८ मिळाली. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर फारसा प्रभाव प्रा. पाटील यांचा नाही. त्या तुलनेत त्यांचे प्रतिस्पर्धी पराग पाटील यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. असे असताना प्रा. हितेश पाटील यांनी कार्यपद्धती निश्चित करून निवडणूक लढविली. जिल्ह्यात युवकांचे जाळे निर्माण करून पक्षाचा विचार त्यांनी पोहोचविला व विजश्री मिळविली. पक्षाकडून एकदम निवड होऊन पदाधिकारी लादण्यापेक्षा निवडणूक प्रक्रिया राबवून निवड होणे हे केव्हाही योग्य. लोकशाही पद्धतीने होणारी ही निवड आदर्श तर आहेच पण युवकांनाही एक दिशा देणारी ही पद्धती म्हणावी लागेल. 

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव