शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

मियाँ, रोते क्यो, तो बोले सुरतही वैसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 16:51 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात प्रा.अनिल सोनार यांचा विशेष लेख ‘मियाँ रोते क्यो?’

‘मियाँ, रोते क्यो, तो बोले सुरतही वैसी’ हा मराठीत रूढ झालेला हिंदी वाक्प्रचार. खरे म्हणजे उर्दू भाषेच्या जन्माबरोबरच जन्माला आलेला असावा. पण माङया दुष्टबुद्धी, निकटस्नेही, नानाच्या मते, तो माङया जन्माच्या नंतर विसेक वर्षानी माङयाकडे बघून लोकांनी मराठीत जन्माला घातला असावा आणि नंतर तो इतर भाषा भगिनींनी, धर्मातरित करून घेऊन भाषांतरीत केला असावा. एखादा माणूस दिसतो बावळट. म्हणजे तो असतो हो बावळट असा नानाचा ठाम समज आहे आणि तो माङयामुळे आहे असे त्याचे ठाम मत आहे. अर्थात यात थोडेफार तथ्य आहे. जरा पांढरी, खुरटी दाढी वाढवून, गावातल्या प्रत्येक कार्यक्रमाला पहिल्या रांगेत जाऊन बसलो आणि लगेच ‘लेखन डिसेंट्री’ लागल्यासारखे मिळेल त्या ‘पेपरा’वर ते रोज ‘रिकामे’ करू लागलो की, लोक आपल्याला विचारवंत वगैरे समजायला लागतात हे खरे आहे. पण नानाला हे मान्य नाही. तो म्हणतो, ‘लेका, तू कसला विचारवंत?’ खाल्लेलं नीट पचवावं लागतं, त्यावर सखोल चिंतन मनन करावं लागतं. तू तर रात्री भाषण ऐकलंस की सकाळी ‘पेपरावर’ दिसतोस. मी काही चांगलं करू शकतो यावर नानाचा विश्वासच नाही. त्याची सगळी मते ‘मिया की सुरत’वर आधारित. मी त्याला म्हटलं, नाना, मी फेरारी कार घेतली. यावर तो फिस्स करून हसत म्हणाला, छोटय़ाशा खोलीत शिकवण्या घेणा:याने, शिक्षण महर्षी झाल्याचे स्वप्न पाहू नये आणि लेका फेरारी कारमध्ये बसून तो काय फाईवस्टार हॉटेलसमोर भीक मागायला बसणार आहेस? ‘भीùùù क? अरे स्वत:च्या बंगल्यात, स्वत:साठी ‘बार’ डिझाईन केलाय मी , आहेस कुठे? यावर नाना कुत्सीतपणे हसत म्हणाला, त्यातसुद्धा लेका तू प्रत्येक बाटलीत हातभट्टीचीच दारू भरून ठेवशील. त्यापेक्षा असं कर ना, तुङया त्या सोकॉल्ड अलिशान बंगल्यात ‘बार’च्या जागी भिलाटीचाच सेट लावना म्हणजे तुला सगळे सवयीचे वाटेल. जोवर नायक म्हटला की, तो देखणा, बलदंड देहाचाच असणार. समुपदेशक म्हटला की, तो तेज:पुंज चेह:याचाच असणार. असली समीकरणं नानाच्या डोक्यात बसली आहेत. तोवर कर्तृत्ववान महिला पंतप्रधान ‘गुंगी गुडिया’ म्हणून हिणवली जाणार आणि दिसायला सामान्य असणा:या समाजसेवकाचा ‘वाकडय़ा तोंडाचा गांधी’ असाच उल्लेख होणार. जोवर ‘मिया की सुरत’वरूनच त्याच्या सिरतचाही अंदाज बांधण्यात येईल, तोवर ‘वेष असावा बावळा, परी अंतरी नाना कळा’ असलेली मंडळी समाजाला गंडवतच राहणार आणि नाना सारखं माङयावर फिस्सकन हसतच राहणार. कारण-- ‘जुनी घेतली मी ‘फेरारी’ वगैरे मुळी कर्ज न करता, उधारी वगैरे मला न पुसता नाना म्हणाला, जिंकला असेल हा जुगारी वगैरे अरे, हा पिवुनी ‘फेरारी’त आला उगा शोधिल्या की गटारी वगैरे ‘पेगा’वरी ‘मोल’ करा रे याचे आणि टॅक्स घ्या ‘अबकारी’ वगैरे तिथे तर दुपारी नशा येत नाही नसे बारबाला दुपारी वगैरे मी चिडून म्हटलं, ‘नान्या मी तुला ठार करीन’ तर तो निर्लज्जपणे म्हणतो कसा- ‘सुगंधी असावी खुनाची सुपारी खुन्याला न यावी शिसारी वगैरे’ नानाला कोणी सांगावं, की बाबा रे, दुमरुखलेल्या चेह:याचा म्हणून ज्यांचा सदैव उपहास करण्यात आला. त्या कवी केशवसुतांनी म्हणून ठेवले आहे की, माङया कवीला रसिक वाचतील तेव्हा कोणीही विचारणार नाही की ‘कवी तो होता कसा आननी’