शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी म्हणून आता तीन जिल्ह्यात मिशन ‘एनईपी’ 

By अमित महाबळ | Updated: January 3, 2024 19:31 IST

६२ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे

अमित महाबळ, जळगाव: पदवीस्तरावर येत्या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने दि. ९ व १० जानेवारी २०२४ रोजी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ६२ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात विद्यापीठाशी संलग्न प्राचार्य, प्राधिकरणाचे सदस्य, संस्थाचालक यांच्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विद्यापीठात कार्यशाळा घेण्यात आली होती. त्याचवेळी विद्यार्थी, पालक यांच्यापर्यंत या धोरणाची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळा घेण्यात येतील, असे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी जाहीर केले होते. जळगाव जिल्ह्यातील ३४, धुळे जिल्ह्यातील १९ आणि नंदुरबार जिल्ह्यातील ९ महाविद्यालयात दि.९ व १० जानेवारी रोजी दोन सत्रांमध्ये या कार्यशाळा होणार आहेत. ज्या महाविद्यालयात या कार्यशाळा होणार आहेत. त्या महाविद्यालयाच्या परिसरातील इतर महाविद्यालयांना देखील आयोजक महाविद्यालयांच्या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या वतीने या कार्यशाळा होत असल्याची माहिती कक्षाचे संचालक प्रा. समीर नारखेडे यांनी दिली.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांची बैठक बुधवार दि. ३ जानेवारी रोजी विद्यापीठात घेण्यात आली. या बैठकीत कुलगुरूंनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, अधिष्ठाता प्राचार्य एस. एस. राजपूत, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. जगदीश पाटील हे उपस्थित होते.

कार्यशाळा महत्त्वाची कारण...

या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाने २१ तज्ज्ञांची टीम तयार केली असून, आयोजक महाविद्यालयांमध्ये जावून हे तज्ज्ञ पदवी स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण कशा पद्धतीने लागू होणार आहे, ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रम कसा असणार आहे यामधील मेजर आणि मायनर विषय म्हणजे काय आदी बाबत सविस्तर माहिती देऊन शंकांचे निरसन करणार आहेत. एका कार्यशाळेत १५० ते २० विद्यार्थी अपेक्षित आहेत. जवळपास १५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत दोन दिवसात हे धोरण पोहचविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

कार्यशाळेला कोण अपेक्षित...

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमधील १२ वी प्रवेशित विद्यार्थी, पदवी अंतिम वर्षातील विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना या कार्यशाळेसाठी पाचारण करण्यात आले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी