शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

मंत्री, आमदारांनो, जळगावला याल तर हाती पडतील पुस्तकं; ‘हारतुरे’ हद्दपार, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 19:16 IST

सतत हाती पडत गेलेल्या हारतुरे आणि पुष्पगुच्छांमुळे वैतागलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या प्रथेविरोधात नाराजी व्यक्त केली होती.

कुंदन पाटील

जळगाव: सतत हाती पडत गेलेल्या हारतुरे आणि पुष्पगुच्छांमुळे वैतागलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या प्रथेविरोधात नाराजी व्यक्त केली तेव्हा त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने ‘हारतुरे’ व ‘पुष्पगुच्छ’ देऊन स्वागत करण्याची प्रथा मोडीत काढली आहे. यापुढे शासकीय कार्यक्रमात प्रत्येक मान्यवरांचे स्वागत पुस्तकं देऊनच करायचे, असा आदेश बुधवारी काढला आणि त्याची अंमलबजावणी सुरु झाली की नाही, याची पडताळणीही त्यांनी गुरुवारी केली.

तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाचोरा दौऱ्यावर होते. हेलिपॅडवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने व आमदारांच्यावतीने त्यांचे हारतुरे, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यापापाठोपाठ विविध ठिकाणी त्यांचे स्वागतही झाले. स्वागताला पुन्हा हारतुरे देण्यात आले. कार्यक्रमस्थळीही तोच प्रवास कायम होता. तेव्हा वैतागलेल्या शिंदे व पवार यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे स्वागतासाठी असणाऱ्या या प्रथेविषयी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर लगेचच जिल्हाधिकाऱ्यांनी शासकी कार्यक्रमात हारतुरे, पुष्पगुच्छांऐवजी पुस्तकं भेट देण्याचा निर्णय घेतला. तसे आदेश सर्वच यंत्रणांना दिले.

हारतुऱ्यांच्या खर्चात पुस्तकांची खरेदीजिल्हाधिकारी प्रसाद यांनी यशदा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसकरवी उपयुक्त पुस्तकांची यादी उपलब्ध केली आहे. ती ऐच्छिक आहे. तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे नोडल ऑफिसर म्हणून नेमले आहे. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकरवी उपयुक्त पुस्तकांना उपलब्ध करुन यापुढे ती भेट देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच मान्यवरांसह विविध संस्थाकडून उपलब्ध होणारी पुस्तकं जिल्हा ग्रंथालयाने  ग्रामीण भागातील वाचनालय, अभ्यास केंद्र आणि विद्यार्थ्यांना मोफत पुरविली जाणार आहे. त्यात शाहू, फुले, आंबेडकर ग्रामअभ्यासिका,युपीएससी, एमपीएससी, सार्वजनिक प्रशासन, भारतीय इतिहासाच्या पुस्तकांचा समावेश आहे.ही पुस्तके जिल्ह्यातील अभ्यासकेंद्रे आणि ग्रंथालयांनाभेट देण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे,  कार्यक्रमानंतर हारतुरे, पुष्पगुच्छ फेकावी लागतात. त्यामुळे खर्चही वाया जातो. त्यामुळे हा खर्च सार्थकी लागावा आणि ‘पुस्तकं माणसाला रद्दी होण्यापासून वाचवितात’ हा विचार रुजत जावा, यादृष्टीने हा निर्णय घेतला आहे. - आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी. 

टॅग्स :Jalgaonजळगाव