शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

मंत्री, आमदारांनो, जळगावला याल तर हाती पडतील पुस्तकं; ‘हारतुरे’ हद्दपार, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 19:16 IST

सतत हाती पडत गेलेल्या हारतुरे आणि पुष्पगुच्छांमुळे वैतागलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या प्रथेविरोधात नाराजी व्यक्त केली होती.

कुंदन पाटील

जळगाव: सतत हाती पडत गेलेल्या हारतुरे आणि पुष्पगुच्छांमुळे वैतागलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या प्रथेविरोधात नाराजी व्यक्त केली तेव्हा त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने ‘हारतुरे’ व ‘पुष्पगुच्छ’ देऊन स्वागत करण्याची प्रथा मोडीत काढली आहे. यापुढे शासकीय कार्यक्रमात प्रत्येक मान्यवरांचे स्वागत पुस्तकं देऊनच करायचे, असा आदेश बुधवारी काढला आणि त्याची अंमलबजावणी सुरु झाली की नाही, याची पडताळणीही त्यांनी गुरुवारी केली.

तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाचोरा दौऱ्यावर होते. हेलिपॅडवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने व आमदारांच्यावतीने त्यांचे हारतुरे, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यापापाठोपाठ विविध ठिकाणी त्यांचे स्वागतही झाले. स्वागताला पुन्हा हारतुरे देण्यात आले. कार्यक्रमस्थळीही तोच प्रवास कायम होता. तेव्हा वैतागलेल्या शिंदे व पवार यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे स्वागतासाठी असणाऱ्या या प्रथेविषयी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर लगेचच जिल्हाधिकाऱ्यांनी शासकी कार्यक्रमात हारतुरे, पुष्पगुच्छांऐवजी पुस्तकं भेट देण्याचा निर्णय घेतला. तसे आदेश सर्वच यंत्रणांना दिले.

हारतुऱ्यांच्या खर्चात पुस्तकांची खरेदीजिल्हाधिकारी प्रसाद यांनी यशदा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसकरवी उपयुक्त पुस्तकांची यादी उपलब्ध केली आहे. ती ऐच्छिक आहे. तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे नोडल ऑफिसर म्हणून नेमले आहे. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकरवी उपयुक्त पुस्तकांना उपलब्ध करुन यापुढे ती भेट देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच मान्यवरांसह विविध संस्थाकडून उपलब्ध होणारी पुस्तकं जिल्हा ग्रंथालयाने  ग्रामीण भागातील वाचनालय, अभ्यास केंद्र आणि विद्यार्थ्यांना मोफत पुरविली जाणार आहे. त्यात शाहू, फुले, आंबेडकर ग्रामअभ्यासिका,युपीएससी, एमपीएससी, सार्वजनिक प्रशासन, भारतीय इतिहासाच्या पुस्तकांचा समावेश आहे.ही पुस्तके जिल्ह्यातील अभ्यासकेंद्रे आणि ग्रंथालयांनाभेट देण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे,  कार्यक्रमानंतर हारतुरे, पुष्पगुच्छ फेकावी लागतात. त्यामुळे खर्चही वाया जातो. त्यामुळे हा खर्च सार्थकी लागावा आणि ‘पुस्तकं माणसाला रद्दी होण्यापासून वाचवितात’ हा विचार रुजत जावा, यादृष्टीने हा निर्णय घेतला आहे. - आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी. 

टॅग्स :Jalgaonजळगाव