शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

वाचकांच्या मनावर ‘लोकमत’चेच अधिराज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:50 IST

मान्यवरांचे गौरवोद्गार : ४२ व्या वर्धापनदिनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

जळगाव : पाड्यापासून ते जागतिक पातळीपर्यंतची इत्यंभूत माहिती तत्परतेने वाचकांपर्यंत पोहोचविण्यासह सत्य जनतेसमोर मांडण्याचे विश्वासार्ह काम ‘लोकमत’ करीत असल्यानेच व सरकार कोणाचेही येवो, वाचकांच्या मनावर ‘लोकमत’चे अधिराज्य कायम आहे, असे गौरद्गार ‘लोकमत’ जळगाव आवृत्तीच्या ४२व्या वर्धापन दिन सोहळ््यात मान्यवरांनी काढले.महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीचा ४२ वा वर्धापन दिन सोहळा रविवार, १५ डिसेंबर रोजी औद्योगिक वसाहतमधील ‘लोकमत’ कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी हा सूर उमटला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी स्वत: उपस्थित राहून तर काहींनी भ्रमणध्वनी, दूरध्वनी व सोशल मीडियाद्वारेही शुभेच्छा दिल्या.यावेळी व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा़पी़पी.पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी सहकार राज्यमंत्री आमदार गुलाबराव पाटील, महापौर सीमा भोळे, ‘शाकाहार सदाचार’चे प्रणेते रतनलाल सी.बाफना, आमदार लता सोनवणे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जनता बॅँकेचे अध्यक्ष अनिल राव, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर रमेशदादा जैन, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले उपस्थित होते.गुुलाबी थंडीत सायंकाळी सहा वाजता ‘लोकमत’च्या हिरवळीवर या स्नेहमेळाव्यास सुरुवात झाली. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वालन करण्यात आले.‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी मान्यवरांच्याहस्ते वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात झालेले बदल, प्रगती तसेच तंत्रज्ञानामुळे झालेले परिवर्तन याची प्रातिनिधीक स्वरुपात माहिती असलेल्या विशेषांकाचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकात ‘लोकमत’च्या ४२ वर्षांच्या प्रवासाची तसेच ‘प्रिंट टू डिजिटल’ अशा प्रगतीची माहिती देण्यात आलीगुलाबी थंडीत रंगला स्नेहसोहळाखान्देशी मातीची, माणसाची शान आणि मान उंचावणाऱ्या ‘लोकमत’ने रविवारी संध्याकाळी शेकडो वाचक आणि हितचिंतकांच्या साक्षीने ४२व्या वर्षात पदार्पण केले. वर्धापनदिनानिमित्त ‘लोकमत भवनासह परिसरात आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली होती. हितचिंतक आणि वाचकांचे आगमन होत असताना सनईचे मंजुळ स्वर वातावरणात रंगत आणत होते. गुलाबी थंडी, दुधाचा गोडवा आणि वाचकांच्या प्रेमामुळे वातावरण धुंद झाले होते. रोशणाईचा लखलखाट व गुलाबी थंडी अशा आल्हाददायक वातावरणात शुभेच्छांचा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. या वेळी आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, संजय सावकारे, अनिल भाईदास पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, माजी आमदार हरिभाऊ जावळे, गुरुमुख जगवानी, संतोष चौधरी, सकल जैन संघाचे संघपती दलुभाऊ जैन, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, माजी महापौर नितीन लढ्ढा, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक डिगंबर पगार, इकरा संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. सुशील अत्रे, सी.ए. अनिल शहा, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.पंढरीनाथ चौधरी, सहायक सरकारी वकील मोहन देशपांडे, अ‍ॅड.सुरेंद्र काबरा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ‘लोकमत’चे उपसंपादक विलास बारी यांनी केले.‘लोकमत’शी जवळचे नाते-गुलाबराव पाटीलवृत्तपत्र व लोकप्रतिनिधी यांचे जवळचे नाते आहे. त्यात ‘लोकमत’शी तर अगदी घट्ट नाते आहे. कारण आमचे काही चुकले तर त्याविषयी ‘लोकमत’ बातमीच्या स्वरुपातून जशी जाणीव करून देते तसे चांगल्या कामाबद्दल कौतुकाची थापही देते, असा उल्लेख गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात आवर्जून केला.‘लोकमत’च्या बातम्यांमुळेच मला १९९९ मध्ये सर्वप्रथम उमेदवारी मिळण्यास मदत झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.पाया ढासळू न देता ‘लोकमत’ची उत्तरोत्तर प्रगती - डॉ. उल्हास पाटील‘लोकमत’ची सुरुवात व ४२ वर्षांचा प्रवास पाहता सुुरुवातीपासूनच त्याच्या प्रगतीत सातत्य आहे. ‘लोकमत’च्या विश्वासार्हतेमुळे दररोज वाचक ‘लोकमत’ची प्रतीक्षा करीत असतात. एवढी प्रगती केली तरी ‘लोकमत’ने ज्या पायावर ही झेप घेतली आहे, तो पाया ढासळू दिलेला नसल्याचे गौरोद्वगार डॉ. उल्हास पाटील यांनी काढले.सत्यतेच्या बळावरच ‘लोकमत’ लोकप्रिय - अरुणभाई गुजराथीसमाजकारण असो की राजकारण सर्व घटकांना न्याय देण्याचे काम ‘लोकमत’ करीत असून सत्यतेच्या बळावरच ‘लोकमत’ लोकप्रिय असल्याचे अरुणभाई गुजराथी यांनी नमूद केले. वृत्तपत्रातील संपादकीय महत्त्वाचे असून ‘लोकमत’चे संपादकीय पान तसेच लेखन, बातमीची शैली उत्तम असल्यानेच ‘लोकमत’ची वाचकसंख्या मोठी आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव