शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आठ वर्षांपासून लाखो टन कचरा प्रक्रियेविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:13 IST

जळगाव - आव्हाणे शिवारातील मनपाच्या बंद घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी गेल्या आठ वर्षांपासून लाखो टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे. ...

जळगाव - आव्हाणे शिवारातील मनपाच्या बंद घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी गेल्या आठ वर्षांपासून लाखो टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे. विशेष म्हणजे चार कोटी रुपयांचा मक्ता देऊन या कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याचे काम वर्षभरापूर्वी देण्यात आले होते. सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, या वर्षभरात मक्तेदाराने ८० हजार घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया केली असून, एक लाख घनमीटर कचऱ्यापेक्षा जास्त कचरा प्रक्रियेविनाच पडून आहे.

मनपाचा घनकचरा प्रकल्प अनेक वर्षांपासून बंद असून, शहरातून दररोज २७० टन कचरा या ठिकाणी टाकला जातो. त्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी कुठलीही प्रक्रिया न करताच लाखो मेट्रीक टन कचरा साठला आहे. कचऱ्यामध्ये रासायनिक प्रक्रियेमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढत असून, या आगीच्या धुरामुळे परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच मनपाला घनकचरा व्यवस्थापन अंमलबजावणीसाठी ३० कोटी मंजूर झाले होते. मात्र, तीन वर्षांत या योजनेचा प्रभावी डीपीआर तयार न केल्याने या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्यास मनपा प्रशासनाला अपयश आले आहे.

सर्वच मक्तेदारांकडून काम करवून घेण्यास मनपाला अपयश

मनपा प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा प्रत्यय गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या कामांमधून येत आहे. अमृत योजना असो वा घनकचरा प्रकल्प किंवा एलईडी, सफाईचे काम असो, यासह किरकोळ रस्ते दुरुस्तीचे काम सर्वच कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मनपा प्रशासनाला अपयश आले आहे. कोणत्याही योजनेचे मुदतीत काम झालेले नाही. तसेच एलईडी, सफाई व घनकचऱ्याच्या कामासाठी मनपाने, मक्तेदाराने दोन वेळा संधी दिली असतानाही काम व्यवस्थितरीत्या झालेले नाही.

न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कचरा न जाळता त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र, घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी हा कचरा सर्रासपणे जाळला असल्याने न्यायालयाच्या आदेशाचीच पायमल्ली केली जात आहे. बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी ही प्रक्रिया केवळ नावालाच सुरू असल्याचे दिसून येते.

जैवविविधता समिती नावालाच

राष्ट्रीय हरित लवाद यांच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी महानगरपालिकेने जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्यानंतर पुन्हा समिती पुनर्गठीत करण्यात आली. मात्र, शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असतानाही ही समिती नेमके काय काम करत आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

काय आहे बायोमायनिंग

घनकचरा प्रकल्पात साठलेल्या सर्व कचऱ्यावर बायोमायनिंग स्प्रे मारला जातो. त्यामुळे सध्या असलेल्या कचऱ्याचे काही प्रमाणात आकुंचन होऊन त्यानंतर कचऱ्यातून लोखंड, काच, प्लास्टिक, कागद व कपडे यांचे वेगवेगळे संकलन केले जाणार आहे. उर्वरित निरुपयोगी कचऱ्याचा वापर खतासाठी केला जाणार आहे. मात्र, याठिकाणी प्रक्रिया झाल्यानंतर पडलेला कचरादेखील अनेक महिन्यांपासून याचठिकाणी पडून आहे.

कोट..

मक्तेदाराचे काम संशयास्पद आहे. जे काम सहा महिन्यांत पूर्ण व्हायला पाहिजे, ते काम वर्षभरात निम्मेदेखील झालेले नाही. याबाबत मनपा आयुक्तांकडे याबाबतची माहिती मागवली आहे. मक्तेदाराला याबाबत नोटीस बजावून कामाची गती वाढविण्यासोबतच काम नियमात करण्याचे आदेश दिले आहेत.

- सुनील खडके, उपमहापौर