शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गिरणा, मन्याड परिसरात पावसाची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST

एकीकडे कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने ग्रासले असल्याने शेतकरी त्यामधून कसाबसा सुटका करीत आहे. थोड्याफार प्रमाणात समाधान वाटत असताना आता पावसाने ...

एकीकडे कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने ग्रासले असल्याने शेतकरी त्यामधून कसाबसा सुटका करीत आहे. थोड्याफार प्रमाणात समाधान वाटत असताना आता पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांच्या संकटात अजून भर पडली आहे. कोरोनाच्या महाभयंकर रोगामुळे शासनाने कडक लॉकडाऊन लावला होता. त्यात शेतकऱ्यांच्या पिकांना बाजारभाव, तर मिळालाच नव्हता व शेतातील खर्चदेखील पुरेसा निघाला नव्हता.

शेतकरी शेवटी कर्जबाजारीकडे जात होता. आता पावसाळा सुरू होऊन एक ते सव्वा महिना झाला. त्यात १-२ पाऊस सुरुवातीला पडले; पण त्यानंतर पावसाने दांडीच मारल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला असून, अजून परत दुबार पेरणीचे संकट निर्माण होते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली असून, अजून जर का पाऊस झाला नाही तर दुबार संकट निर्माण होईल. शेतकऱ्यांनी घेतलेली महागडी बियाणे वाया जातील, एवढे मात्र निश्चित.

आता सध्या विहिरींनादेखील पाहिजे तसे पाणी नाही व दुसरीकडे मन्याड धरणातदेखील अजून आवक नाही. त्यामुळे जिकडे-तिकडे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून थोड्याफार प्रमाणात शेतकरी सावरत असताना आतातरी पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील संकट दूर करून कोरोनाची भर या पावसाने जोरदार हजेरी लावून दूर करावी, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत.