शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

गिरणा, मन्याड परिसरात पावसाची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST

एकीकडे कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने ग्रासले असल्याने शेतकरी त्यामधून कसाबसा सुटका करीत आहे. थोड्याफार प्रमाणात समाधान वाटत असताना आता पावसाने ...

एकीकडे कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने ग्रासले असल्याने शेतकरी त्यामधून कसाबसा सुटका करीत आहे. थोड्याफार प्रमाणात समाधान वाटत असताना आता पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांच्या संकटात अजून भर पडली आहे. कोरोनाच्या महाभयंकर रोगामुळे शासनाने कडक लॉकडाऊन लावला होता. त्यात शेतकऱ्यांच्या पिकांना बाजारभाव, तर मिळालाच नव्हता व शेतातील खर्चदेखील पुरेसा निघाला नव्हता.

शेतकरी शेवटी कर्जबाजारीकडे जात होता. आता पावसाळा सुरू होऊन एक ते सव्वा महिना झाला. त्यात १-२ पाऊस सुरुवातीला पडले; पण त्यानंतर पावसाने दांडीच मारल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला असून, अजून परत दुबार पेरणीचे संकट निर्माण होते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली असून, अजून जर का पाऊस झाला नाही तर दुबार संकट निर्माण होईल. शेतकऱ्यांनी घेतलेली महागडी बियाणे वाया जातील, एवढे मात्र निश्चित.

आता सध्या विहिरींनादेखील पाहिजे तसे पाणी नाही व दुसरीकडे मन्याड धरणातदेखील अजून आवक नाही. त्यामुळे जिकडे-तिकडे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून थोड्याफार प्रमाणात शेतकरी सावरत असताना आतातरी पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील संकट दूर करून कोरोनाची भर या पावसाने जोरदार हजेरी लावून दूर करावी, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत.