शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानानंतरही नसबंदीला पुरुषांचा प्रतिसाद मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 22:25 IST

लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजनउपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची तरतूद करूनही तालुक्यात पुरुष नसबंदीला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे,

ठळक मुद्देजामनेर शहरासह तालुक्यातील चित्र५० महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

(सय्यद लियाकत/मोहन सारस्वत)जामनेर : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजनउपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची तरतूद करूनही तालुक्यात पुरुष नसबंदीला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे, तर दुसरीकडे ५० महिलांवर कुटुंंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी गैरसमजुतीने पुरुष नसबंदीसाठी धजावत नाहीत. पुरुषांची ही मानसिकता बदलून ते नसबंदीसाठी पुढे यावेत म्हणून शासनाने १ हजार ४०० रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आह.े कौटुंबिक व सामाजिक दबावातून म्हणावा तसा पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेस तालुक्यात प्रतिसाद मिळालेला नाही. वर्षभरात तालुक्यात एकाही पुरुषाने नसबंदीची शस्त्रक्रिया केली नाही, तर दुसरीकडे महिलांच्या शस्त्रक्रियेसाठी आरोग्य विभागाला २२०० शस्त्रक्रियेची उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र कोरोना महामारीमुळे आठ महिन्यामध्ये ५० महिला कुटुंंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी पुढे आल्या आहेत. शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना ६०० रुपयांपर्यंत शासनाकडून अनुदान दिले जाते. यामध्ये दारिद्र्य रेषेखालील, अनुसूचित जाती जमातीमधील महिलांना ६०० रुपये तर इतर महिलांना २५० रुपयांचे अनुदान देण्यात येते. आरोग्य विभागाच्या अहवालावरून वर्षभरात तालुक्यातील जामनेर उपजिल्हा रुग्णालय, पहूर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २२०० उद्दिष्टांपैकी आठ महिन्यात कोरोना माहामारीमुळे ५० महिलांवर उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे यांनी दिली.दरम्यान, खरे तर पुरुष नसबंदी ही चांगली व कमी वेळेत विना त्रास देणारी शस्त्रक्रिया आहे. याबाबत कोणताही गैरसमज मनात न ठेवता पुरूषांनी नसबंदीसाठी पुढे यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी नागरिकांना केले आहे.तीन वर्षात सात पुरुषांनी केली नसबंदीपुरुष नसबंदीबाबत समज-गैरसमजामुळे तालुक्यात गेल्या तीन वर्षात फक्त सात पुरुषांनी नसबंदी केली आहे. मात्र पुरुष नसबंदी या विषयाबाबत आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत. लोकशिक्षण करून ते गैरसमज दूर करावेत, असेही कुणाला वाटत नाही. पूर्वी तांबीबाबतही खूप जाहिरात होत असे. अगदी सरकारी बक्षिसेही दिली जात. मूल नको असेल तर तांबी बसवा, जेव्हा हवे असेल तेव्हा तांबी काढा, बाकी मुद्दे जनतेपर्यंत नीटपणे पोचवले जात नाहीत. पुरुष नसबंदीही अशीच साधीसोपी असावी, असा अनेकांचा समज करून दिला जातो. म्हणूनच याबाबतीतल्या सर्व उलटसुलट मुद्यांची जाणीव करून देणाऱ्या लोकशिक्षणाची गरज आहे.

टॅग्स :FamilyपरिवारJamnerजामनेर