शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अनुदानानंतरही नसबंदीला पुरुषांचा प्रतिसाद मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 22:25 IST

लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजनउपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची तरतूद करूनही तालुक्यात पुरुष नसबंदीला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे,

ठळक मुद्देजामनेर शहरासह तालुक्यातील चित्र५० महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

(सय्यद लियाकत/मोहन सारस्वत)जामनेर : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजनउपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची तरतूद करूनही तालुक्यात पुरुष नसबंदीला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे, तर दुसरीकडे ५० महिलांवर कुटुंंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी गैरसमजुतीने पुरुष नसबंदीसाठी धजावत नाहीत. पुरुषांची ही मानसिकता बदलून ते नसबंदीसाठी पुढे यावेत म्हणून शासनाने १ हजार ४०० रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आह.े कौटुंबिक व सामाजिक दबावातून म्हणावा तसा पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेस तालुक्यात प्रतिसाद मिळालेला नाही. वर्षभरात तालुक्यात एकाही पुरुषाने नसबंदीची शस्त्रक्रिया केली नाही, तर दुसरीकडे महिलांच्या शस्त्रक्रियेसाठी आरोग्य विभागाला २२०० शस्त्रक्रियेची उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र कोरोना महामारीमुळे आठ महिन्यामध्ये ५० महिला कुटुंंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी पुढे आल्या आहेत. शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना ६०० रुपयांपर्यंत शासनाकडून अनुदान दिले जाते. यामध्ये दारिद्र्य रेषेखालील, अनुसूचित जाती जमातीमधील महिलांना ६०० रुपये तर इतर महिलांना २५० रुपयांचे अनुदान देण्यात येते. आरोग्य विभागाच्या अहवालावरून वर्षभरात तालुक्यातील जामनेर उपजिल्हा रुग्णालय, पहूर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २२०० उद्दिष्टांपैकी आठ महिन्यात कोरोना माहामारीमुळे ५० महिलांवर उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे यांनी दिली.दरम्यान, खरे तर पुरुष नसबंदी ही चांगली व कमी वेळेत विना त्रास देणारी शस्त्रक्रिया आहे. याबाबत कोणताही गैरसमज मनात न ठेवता पुरूषांनी नसबंदीसाठी पुढे यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी नागरिकांना केले आहे.तीन वर्षात सात पुरुषांनी केली नसबंदीपुरुष नसबंदीबाबत समज-गैरसमजामुळे तालुक्यात गेल्या तीन वर्षात फक्त सात पुरुषांनी नसबंदी केली आहे. मात्र पुरुष नसबंदी या विषयाबाबत आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत. लोकशिक्षण करून ते गैरसमज दूर करावेत, असेही कुणाला वाटत नाही. पूर्वी तांबीबाबतही खूप जाहिरात होत असे. अगदी सरकारी बक्षिसेही दिली जात. मूल नको असेल तर तांबी बसवा, जेव्हा हवे असेल तेव्हा तांबी काढा, बाकी मुद्दे जनतेपर्यंत नीटपणे पोचवले जात नाहीत. पुरुष नसबंदीही अशीच साधीसोपी असावी, असा अनेकांचा समज करून दिला जातो. म्हणूनच याबाबतीतल्या सर्व उलटसुलट मुद्यांची जाणीव करून देणाऱ्या लोकशिक्षणाची गरज आहे.

टॅग्स :FamilyपरिवारJamnerजामनेर