शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांनतर मेहरुण तलाव ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:53 IST

सुखद चित्र । कुपनलिकांसह पिकांनाही लाभ

जळगाव : शहराचे वैभव आणि मानबिंदू असलेल्या मेहरुण तलावासाठी भगीरथ ठरत असलेल्या ब्रिटीशकालीन अंबरझरा तलावातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्यासह सतत सुरु असलेल्या पावसामुळे मेहरुण तलाव १०० टक्के भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. सहा वर्षांनतर पुन्हा एकदा मेहरुण तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने शहरवासीयांना हा सुखद चित्र अनुभवता येत आहे. तलाव यंदा पूर्ण भरल्याने शहरातील कुपनलिकांनाही मोठा आधार होणार असून आतापासूनच पिकांनाही लाभ होत आहे.मेहरुण तलाव हा पूर्वीपासूनच शहरवासीयांचे खास आकर्षण केंद्र असून त्याचे जतन करण्यासाठी पर्यावरणप्रेमीही हातभार लावत आहेत. मात्र गेल्या काही वर्षात या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम वाढल्याने मेहरुण तलावाच्या स्त्रोतावर मोठा परिणाम झाला आहे. पावसाळ््यात मेहरुण तलावामध्ये लांडोरखोरीसह आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असे मात्र बांधकाम वाढल्याने हे स्त्रोत इतरत्र वळले आहे. परिणामी मेहरुण तलावामध्ये पाण्याचे प्रमाण कमी-कमी होत आहे. परिणामी महरुण तलाव गेल्या काही वर्षांपासून पूर्ण भरत नव्हता.मात्र यंदा मेहरुण तलावाला ब्रिटीशकालीन अंबरझरा तलावाचा मोठा आधार झाला. या वर्षी उन्हाळ््यात वृक्ष संवर्धन समितीच्यावतीने पुढाकार घेण्यात येऊन अंबरझरा तलावापासून मेहरुण तलावापर्यंत चार कि.मी. लांबी व १५ फूट खोलीची चारी तयार केली. त्यामुळे पुन्हा अंबरझऱ्यातील खळखळाट मेहरुण तलावाकडे वळला. तंत्रशुद्ध चाºया तयार झाल्याने तीन आठवड्यांपूर्वी ८० टक्के भरलेल्या मेहरुण तलावाचा साठा आता १०० टक्क्यांवर पोहचला आहे.सिमेंटचेकॅनॉल तयार करणारअंबरझरापासून ते मेहरुण तलावापर्यंत सध्या चाºया तयार केल्या असल्या तरी पुढील वर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडून निधी मिळवून या ठिकाणी सिमेंटचे कॅनॉल तयार करून त्यावर चार-पाच ठिकाणी छोटे पूल तयार करण्याचे प्रयत्न राहणार असल्याचे तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व्ही.डी. पाटील यांनी सांगितले.मेहरुण तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे या तलावात पाणी असल्यास शहरातील कुपनलिकांनाही वर्षभर पाणी राहते. यंदा तलाव भरल्याने कुपनलिकांची चिंता मिटली आहे. सोबतच तलावाची साठवण क्षमता वाढल्याने पाणी आजूबाजूच्या शेतात जात नसल्याने पिकांचेही नुकसान होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुपनलिकांना आधार होण्यासह पिकांचे नुकसान टळत असल्याने दुहेरी लाभ होत असल्याचे सुखद चित्र आहे.पक्षांचा अधिवास वाढणारतलावात पाणी कमी आल्याने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच तलाव आटत असे. मात्र यंदा तलाव पूर्ण भरल्याने मार्च अखेरपर्यंत पाणी राहू शकणार आहे. त्यामुळे येथे बाहेरून येणाºया पक्षांनाही आधार होऊन त्यांचा अधिवास वाढू शकेल, असा विश्वास पक्षीमित्रांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने कृत्रिम अंडी टाकून मासे वाढीसाठी प्रयत्न केल्यास पक्षांना खाद्य मिळेल व विविध जातीचे पक्षी तलावाकडे वळतील, असेही सूचविले जात आहे.सांडपाणी रोखावेमेहरुण तलावात येणारे सांडपाणी अद्यापही बंद झालेले नाही. त्यामुळे तलावातील पाणी निळे दिसत नाही तर ते दुषीत असल्याची खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव