शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

चाळीसगावातील अतिक्रमण, रस्ते प्रश्नावर पालिकेची सभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:20 IST

पालिकेत कर्मचारी मनमानी करीत असल्याचा सत्ताधारी व विरोधकांचा आरोप

ठळक मुद्देमेहुणबारे जवळील पाणीपुरवठा योजना हस्तांतरीत करु नये. पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था म्हणून ती कायम ठेवावी यावर सभागृहाचे एकमत झाले. शहरात वर्दळीच्या ठिकाणी डिजिटल फलक काढतांना भेदभाव केला जातो. हा प्रकार चुकीचा असल्याचेही सभेत सांगण्यात आले.तुंबलेल्या गटारी, साचलेला कचरा यासह अस्वच्छतेबाबत आरोग्य विभागातील कर्मचारी उदासिन असल्याची तक्रार सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी केली. समस्या आरोग्य विभागाला कळवून देखील दखल घेतली जात नाही. कर्मचारी मनमानी करतात, असा आरोप सविता जाधव, आनंद खरात, रामचंद्र वेळोवेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न भावनिक केला जातो. या प्रश्नांची फाईल मध्यंतरी सापडली, असे सांगण्यात आले. तरीही पुतळा उभारला जात नाही. महाराजांचा पुतळा हा अस्मितेचा विषय असून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी विरोधक व सत्ताधाºयांनी एकजुटीने केल

चाळीसगाव, जि.जळगाव : शहरात अतिक्रमणाची समस्या दिवसागणिक गंभीर होत असून, त्याचे लांबत चाललेले शेपूट नदीपात्रापर्यंत पोहचले आहे. यावर अतिक्रमण विरोधी पथक काय करते, असा थेट प्रश्न करीत विरोधकांनी शनिवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह दणाणून सोडले. खरजई रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असतांना ठेकेदाराला पेमेंट का अदा करण्यात आले? या प्रश्नावरही चर्चेला तोंड फुटले. पालिकेत कर्मचारी मनमानी करीत असल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधकांनी केला.एकूण १९ विषयांबाबत नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा ११ वाजता सुरु झाली. शहर विकास आघाडीचे गटनेते राजीव देशमुख, भाजपाचे गटनेते राजेंद्र चौधरी, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर उपस्थित होते. उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, शिवसेनेचे नगरसेवक शामलाल कुमावत, शविआचे सूर्यकांत ठाकूर हे अनुपस्थित होते.सभेच्या सुरुवातीलाच मे महिन्यात काम झालेल्या दयानंद कॉर्नर ते खरजई नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत नगरसेविका रंजना सोनवणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. रस्त्यावर एका महिन्यात पहिल्याच पावसात खड्डे पडले. यासाठी ५५ लाख रुपये खर्ची पडले असतांना ठेकेदाराला कामाचा दर्जा न तपासताच काही रक्कम दिली गेली.यावरही शविआचे गटनेते राजीव देशमुख, सुरेश स्वार, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, आनंदा कोळी यांनी जोरदार आक्षेप घेतला.ठेकेदारास पुढील पेमेंट देऊ नये, अशी सुचनाही करण्यात आली.अतिक्रमणावर रोखशहरात सर्वत्र अतिक्रमण वाढत आहे. पालिकेने यासाठी अतिक्रमण विरोधी पथकाची निर्मितीही केली होती. मात्र तरीही आतिक्रमण होणे थांबलेले नाही. नदीपात्रात अवैध धंदे चालकांनी केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दाही चांगलाच गाजला.अतिक्रमण हे पावसाळ्यापूर्वी काढणे आवश्यक होते. परंतू यावर कार्यवाही झाली नाही. असा मुद्दा राजीव देशमुख यांनी उपस्थित केला.अतिक्रमण विरोधी मोहीम पावसाळ्यानंतर तीव्रपणे राबविण्यात येईल, असे नगराध्यक्षा आशालता चव्हाण व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सभागृहाला सांगितले.खासदार व आमदार निधीतून शहरात झालेली रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट झाली आहेत, असा आरोप विरोधकांनी केला. कापड मिल व रेल्वे बोगद्याखालील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ही जबाबदारी कोणाची, असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला. नदीपात्रातील मस्तानी अम्मा टेकडी परिसराचा पर्यटनांतर्गत विकास करावयाचा असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी. त्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागास ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे म्हणणे विरोधी गटाने मांडले.