शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावातील अतिक्रमण, रस्ते प्रश्नावर पालिकेची सभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:20 IST

पालिकेत कर्मचारी मनमानी करीत असल्याचा सत्ताधारी व विरोधकांचा आरोप

ठळक मुद्देमेहुणबारे जवळील पाणीपुरवठा योजना हस्तांतरीत करु नये. पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था म्हणून ती कायम ठेवावी यावर सभागृहाचे एकमत झाले. शहरात वर्दळीच्या ठिकाणी डिजिटल फलक काढतांना भेदभाव केला जातो. हा प्रकार चुकीचा असल्याचेही सभेत सांगण्यात आले.तुंबलेल्या गटारी, साचलेला कचरा यासह अस्वच्छतेबाबत आरोग्य विभागातील कर्मचारी उदासिन असल्याची तक्रार सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी केली. समस्या आरोग्य विभागाला कळवून देखील दखल घेतली जात नाही. कर्मचारी मनमानी करतात, असा आरोप सविता जाधव, आनंद खरात, रामचंद्र वेळोवेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न भावनिक केला जातो. या प्रश्नांची फाईल मध्यंतरी सापडली, असे सांगण्यात आले. तरीही पुतळा उभारला जात नाही. महाराजांचा पुतळा हा अस्मितेचा विषय असून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी विरोधक व सत्ताधाºयांनी एकजुटीने केल

चाळीसगाव, जि.जळगाव : शहरात अतिक्रमणाची समस्या दिवसागणिक गंभीर होत असून, त्याचे लांबत चाललेले शेपूट नदीपात्रापर्यंत पोहचले आहे. यावर अतिक्रमण विरोधी पथक काय करते, असा थेट प्रश्न करीत विरोधकांनी शनिवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह दणाणून सोडले. खरजई रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असतांना ठेकेदाराला पेमेंट का अदा करण्यात आले? या प्रश्नावरही चर्चेला तोंड फुटले. पालिकेत कर्मचारी मनमानी करीत असल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधकांनी केला.एकूण १९ विषयांबाबत नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा ११ वाजता सुरु झाली. शहर विकास आघाडीचे गटनेते राजीव देशमुख, भाजपाचे गटनेते राजेंद्र चौधरी, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर उपस्थित होते. उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, शिवसेनेचे नगरसेवक शामलाल कुमावत, शविआचे सूर्यकांत ठाकूर हे अनुपस्थित होते.सभेच्या सुरुवातीलाच मे महिन्यात काम झालेल्या दयानंद कॉर्नर ते खरजई नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत नगरसेविका रंजना सोनवणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. रस्त्यावर एका महिन्यात पहिल्याच पावसात खड्डे पडले. यासाठी ५५ लाख रुपये खर्ची पडले असतांना ठेकेदाराला कामाचा दर्जा न तपासताच काही रक्कम दिली गेली.यावरही शविआचे गटनेते राजीव देशमुख, सुरेश स्वार, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, आनंदा कोळी यांनी जोरदार आक्षेप घेतला.ठेकेदारास पुढील पेमेंट देऊ नये, अशी सुचनाही करण्यात आली.अतिक्रमणावर रोखशहरात सर्वत्र अतिक्रमण वाढत आहे. पालिकेने यासाठी अतिक्रमण विरोधी पथकाची निर्मितीही केली होती. मात्र तरीही आतिक्रमण होणे थांबलेले नाही. नदीपात्रात अवैध धंदे चालकांनी केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दाही चांगलाच गाजला.अतिक्रमण हे पावसाळ्यापूर्वी काढणे आवश्यक होते. परंतू यावर कार्यवाही झाली नाही. असा मुद्दा राजीव देशमुख यांनी उपस्थित केला.अतिक्रमण विरोधी मोहीम पावसाळ्यानंतर तीव्रपणे राबविण्यात येईल, असे नगराध्यक्षा आशालता चव्हाण व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सभागृहाला सांगितले.खासदार व आमदार निधीतून शहरात झालेली रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट झाली आहेत, असा आरोप विरोधकांनी केला. कापड मिल व रेल्वे बोगद्याखालील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ही जबाबदारी कोणाची, असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला. नदीपात्रातील मस्तानी अम्मा टेकडी परिसराचा पर्यटनांतर्गत विकास करावयाचा असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी. त्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागास ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे म्हणणे विरोधी गटाने मांडले.