शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावातील अतिक्रमण, रस्ते प्रश्नावर पालिकेची सभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:20 IST

पालिकेत कर्मचारी मनमानी करीत असल्याचा सत्ताधारी व विरोधकांचा आरोप

ठळक मुद्देमेहुणबारे जवळील पाणीपुरवठा योजना हस्तांतरीत करु नये. पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था म्हणून ती कायम ठेवावी यावर सभागृहाचे एकमत झाले. शहरात वर्दळीच्या ठिकाणी डिजिटल फलक काढतांना भेदभाव केला जातो. हा प्रकार चुकीचा असल्याचेही सभेत सांगण्यात आले.तुंबलेल्या गटारी, साचलेला कचरा यासह अस्वच्छतेबाबत आरोग्य विभागातील कर्मचारी उदासिन असल्याची तक्रार सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी केली. समस्या आरोग्य विभागाला कळवून देखील दखल घेतली जात नाही. कर्मचारी मनमानी करतात, असा आरोप सविता जाधव, आनंद खरात, रामचंद्र वेळोवेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न भावनिक केला जातो. या प्रश्नांची फाईल मध्यंतरी सापडली, असे सांगण्यात आले. तरीही पुतळा उभारला जात नाही. महाराजांचा पुतळा हा अस्मितेचा विषय असून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी विरोधक व सत्ताधाºयांनी एकजुटीने केल

चाळीसगाव, जि.जळगाव : शहरात अतिक्रमणाची समस्या दिवसागणिक गंभीर होत असून, त्याचे लांबत चाललेले शेपूट नदीपात्रापर्यंत पोहचले आहे. यावर अतिक्रमण विरोधी पथक काय करते, असा थेट प्रश्न करीत विरोधकांनी शनिवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह दणाणून सोडले. खरजई रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असतांना ठेकेदाराला पेमेंट का अदा करण्यात आले? या प्रश्नावरही चर्चेला तोंड फुटले. पालिकेत कर्मचारी मनमानी करीत असल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधकांनी केला.एकूण १९ विषयांबाबत नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा ११ वाजता सुरु झाली. शहर विकास आघाडीचे गटनेते राजीव देशमुख, भाजपाचे गटनेते राजेंद्र चौधरी, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर उपस्थित होते. उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, शिवसेनेचे नगरसेवक शामलाल कुमावत, शविआचे सूर्यकांत ठाकूर हे अनुपस्थित होते.सभेच्या सुरुवातीलाच मे महिन्यात काम झालेल्या दयानंद कॉर्नर ते खरजई नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत नगरसेविका रंजना सोनवणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. रस्त्यावर एका महिन्यात पहिल्याच पावसात खड्डे पडले. यासाठी ५५ लाख रुपये खर्ची पडले असतांना ठेकेदाराला कामाचा दर्जा न तपासताच काही रक्कम दिली गेली.यावरही शविआचे गटनेते राजीव देशमुख, सुरेश स्वार, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, आनंदा कोळी यांनी जोरदार आक्षेप घेतला.ठेकेदारास पुढील पेमेंट देऊ नये, अशी सुचनाही करण्यात आली.अतिक्रमणावर रोखशहरात सर्वत्र अतिक्रमण वाढत आहे. पालिकेने यासाठी अतिक्रमण विरोधी पथकाची निर्मितीही केली होती. मात्र तरीही आतिक्रमण होणे थांबलेले नाही. नदीपात्रात अवैध धंदे चालकांनी केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दाही चांगलाच गाजला.अतिक्रमण हे पावसाळ्यापूर्वी काढणे आवश्यक होते. परंतू यावर कार्यवाही झाली नाही. असा मुद्दा राजीव देशमुख यांनी उपस्थित केला.अतिक्रमण विरोधी मोहीम पावसाळ्यानंतर तीव्रपणे राबविण्यात येईल, असे नगराध्यक्षा आशालता चव्हाण व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सभागृहाला सांगितले.खासदार व आमदार निधीतून शहरात झालेली रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट झाली आहेत, असा आरोप विरोधकांनी केला. कापड मिल व रेल्वे बोगद्याखालील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ही जबाबदारी कोणाची, असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला. नदीपात्रातील मस्तानी अम्मा टेकडी परिसराचा पर्यटनांतर्गत विकास करावयाचा असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी. त्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागास ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे म्हणणे विरोधी गटाने मांडले.