शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

थोर गुरू परंपरा असणारा  मातंग समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 17:16 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘बारा बलुतेदार’ या सदरात लिहिताहेत अ‍ॅड.माधव भोकरीकर...

सकल जगताला आपल्या भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाने दीपवून टाकणाऱ्या, भगवान श्रीकृष्णाचे गुरू कोण? हा प्रश्न आपल्यापैकी कोणाला पडत नसेल. त्यावेळी गुरुगृही जायचे, ते गुरुची ज्ञानसाधना किती आहे हे पाहून, हीच आपली संस्कृती आणि परंपरा आहे. उज्जैनी वनात एक सांदीपनी नावाचे ऋषी परिवारासह राहत असत. चार वेद ग्रहण केलेले, पचविलेले, अहंकारविरहित असे हे ऋषी. अरण्यात शिंदीच्या झाडावरील पनाळ्या ते आपल्या मंत्रोच्चाराने झाडावर न चढता तोडत असत. त्यामुळे त्यांचे नाव शिंदीपाल पडले होते.भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे थोरले बंधू बलराम तसेच त्यांचा मित्र सुदामा यांना सांदीपनी ऋषीकडून अनुग्रह प्राप्त झाला आहे. ते त्यांचे गुरू आहेत ही भावना. श्रीकृष्ण, बलराम, सुदामा हे सांदीपनी ऋषीकडे आश्रमात चौसष्ट दिवस होते. या काळात त्यांनी सर्व विद्या आपल्या गुरूंकडून अवगत केल्या. 'तुला रे भगवंता काय शिकवायचे?' असे म्हणणारे सांदीपनी ऋषी, हे आपले गुरुचे कर्तव्य मात्र चोख बजावत होते.दक्षिणेत मंदिरेशिवशक्तीच्या दहावा अवतारापैकी नववा अवतार, शंकर पार्वतीने मातंग-मातंगी म्हणून घेतला. मातंगी महादेवाची कश्ती असून सर्व देवदेवताची वरदायिनी आहे. मातंगी देवीला संतती व संपती राखणारी देवी म्हणून पुजले जाते. दक्षिण भारतात मातंगीस मांगम्मा असेही म्हणतात. तिरुपती बालाजी, चेन्नई येथे देवीची मंदिरे आहेत. आंध्र, गुजरात, तामिळनाडू या प्रांतामध्ये मातंगी मंदिरे आहेत. महालक्ष्मी तुळजापूरची देवी ही मातंगाचीच आई आहे, ही भावना आहे.जो तो आपल्या कर्माने श्रेष्ठ अथवा कनिष्ठआपल्या कोणाच्याही मनात जातींबद्दलच्या श्रेष्ठत्वाबद्दल अथवा कनिष्ठतेबद्दल प्रश्न निर्माण झाले किंवा केले गेले, तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे, 'परमेश्वराने कोणालाही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ म्हणून जन्माला घातले नाही. जो तो आपल्या कर्माने 'श्रेष्ठ अथवा कनिष्ठ' होतो आणि ठरतो. आपल्याला श्रेष्ठ व्हायचे का कनिष्ठ व्हायचे, हे आपण आपलेच ठरवावे आणि त्याप्रमाणे आपले कर्म करावे.' आपले वाडवडील चिरंतन सत्य सांगून गेले आहेत की, ऋषींचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये.सुरुवातीला अत्यंत छोटी, क्षुद्र वाटणारी व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने अत्यंत श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचते. त्यावेळी तिचे पूर्वीचे, जन्मजात असलेले लघू रूप आपल्याला विसरावे लागते, ते तिच्या कर्तृत्वाने! आपल्या समाजाचा एक भाग असलेला, प्राचीन गुरुकुलाची परंपरा असलेला, हा मातंग समाज, या अवस्थेत का, कसा आणि कोणामुळे, कोणत्या चुकीमुळे आला, याचा विचार केवळ त्याच समाजाने नाही, तर आपण सर्वांनीच करायला हवा. ती कारणे समजली म्हणजे आपल्या कर्तृत्वाला पायबंद कशामुळे बसू शकतो, आपली प्रगतीची घसरण का होते हे आपल्याला समजू शकेल; त्यावर उपाययोजना करता येईल. समाजाची जशी गरज असते, त्यानुसार समाज ती गरज भागवत असतो. बारा बलुतेदार आणि बारा अलुतेदार, हा त्याचाच परिपाक! समाजाचा गाडा सुरळीत चालावा यासाठी जी विविध कर्तव्ये तत्कालीन समाजधुरिणांनी नेमून दिली, त्यांच्या व्यवसायावरून व कर्तव्यावरून, ही गेल्या काही काळात दिसत असलेली जातीव्यवस्था निर्माण झाली. आज याचे पूर्वीइतके स्वरूप उरले नाही, हे आपल्या शिक्षणाने, समजुतीने!गावाचे रक्षण करणाºया जमातीतील जी मंडळी होती, त्यातील हा 'मातंग समाज'! हिंदू धर्मातील मूळचा रांगडा, आक्रमक, प्रामाणिक असलेला हा समाज, गावचा संरक्षणकर्ता होता.गावाचे संरक्षण करायचे तर स्वाभाविकपणे, गावात शिरण्याच्या वाटेवर यांचा पहारा तथा वस्ती असायची. यांच्यातील परंपरेने आलेला हा गुण शिवाजी महाराजांनी ओळखला, म्हणून त्यांच्या काळात त्यांनी काही ठिकाणी गडांचे, घरांचे, चौक्यांचे पहारे ताठ किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी, ही या समाजाकडे सोपविली होती. महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या शिलेदाराची घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाºया मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले, बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यात यांचा उल्लेख आढळतो.स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी त्यांना अडचणीच्या ठरलेल्या लोकांना, समाजाला वैयक्तिकपणे अथवा सामूहिकपणे कोणत्यातरी मार्गाने त्रास देण्याची योजना केली होती. त्यात त्यांनी रामोशी, मातंग अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरविले. त्यांना गावातून तडीपार केले.त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले. तेव्हा या समाजातील लोकांनी इंग्रजांच्या विरोधात गावागावातून संघर्ष केला. या समाजातील उस्ताद लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीत अनेक क्रांतीकारकांना आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण दिले होते. अनेक शूरवीर या तालमीतून तयार झाले होते. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके हे यांच्याच तालमीतले! (पूर्वार्ध)-अ‍ॅड.माधव भोकरीकर

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव