शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

चटई कामगारांवर काळाचा घाला; सुसाट ऑईल टँकरची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

By सागर दुबे | Updated: March 26, 2023 19:17 IST

नशिराबाद गावाजवळील घटना ; अपघातग्रस्त वाहने घेतली ताब्यात

जळगाव : जळगावकडून भुसावळकडे निघालेल्या चटई कामगारांच्या दुचाकीला सुसाट ऑईल टँकरने जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील दोन्ही कामगारांचा जागीच मृत्यू झाला. संदिप मानसिंग शिरसाम (२८), वसंत मुन्ना वरखेडे (२८, दोन्ही रा. धामण्या, जि. बैतूल, मध्यप्रदेश) असे दोन्ही मृत कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. तर दोन्ही अपघातग्रस्त वाहने सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

संदीप शिरसाम आणि वसंत वरखेडे हे दोन्ही मित्र मुळचे धामण्या येथील रहिवासी होते. दोन्ही जळगावातील वेगवेगळ्या ठिकाणी चटई कंपनीमध्ये कामाला होते. त्यामुळे ते सद्या पंढरपूर नगरमध्ये राहत होते. रविवारी दुपारी दोघेही त्यांच्या ताब्यातील एम.पी.४८.एम.आर.५३९७ क्रमांकाच्या दुचाकीने जळगावकडून भुसावळच्या दिशेने जात होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावातील उड्डाणपूलाजवळून जात असताना त्यांच्या दुचाकीला भुसावळकडून जळगावच्या दिशेने जाणा-या सुसाट वेगातील ऑईलच्या टँकरने (एमएच.०४.डीएस.२२१७) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील संदीप आणि वसंत यांना डोक्याला व हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.ग्रामस्थांसह पोलिसांची घटनास्थळी धाव...महामार्गावर अपघातानंतर ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेवून अपघाताची नशिराबाद पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिम मोरे, सहाय्यक फौजदार अलियार खान, अतूल महाजन, रूपेश साळवे आणि तुषार पाटील यांच्यासह इतर पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून दोन्ही तरूणांचे मृतदेह शववाहिकेतून जिल्हा रूग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. पोलिसांनी दोघांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. तसेच संदीप याच्या कंपनीतील कर्मचारीही रूग्णालयात दुपारी दाखल झाले होते. तर दोन दिवस कंपनीला सुट्टी होती तर रविवारी त्याची नाईट ड्युटी होती, असे त्यांनी सांगितले होते.चिमुकल्यांचे कोवळ्या वयातच पितृछत्र हरपलेमयत संदीप शिरसाम याच्या पश्चात आई, वडील पत्नी, दोन वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी, दोन भाऊ, दोन विवाहित बहीणी, तर वसंत याच्या पश्चात आई-वडील, पत्नी दोन वर्षाची मुलगी, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. दोन्ही तरुणाच्या चिमुकल्यांचे कोवळ्या वयातच पितृछत्र हरपले आहे. जळगावातील नातेवाईकांच्या माध्यमातून अपघाताची माहिती मयताच्या कुटुंबियांना देण्यात आली असून दोघांचे कुटुंबिय मध्यप्रदेशातील बैतूल येथून दुपारी जळगावकडे येण्यासाठी निघाले होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू