शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चटई कामगारांवर काळाचा घाला; सुसाट ऑईल टँकरची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

By सागर दुबे | Updated: March 26, 2023 19:17 IST

नशिराबाद गावाजवळील घटना ; अपघातग्रस्त वाहने घेतली ताब्यात

जळगाव : जळगावकडून भुसावळकडे निघालेल्या चटई कामगारांच्या दुचाकीला सुसाट ऑईल टँकरने जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील दोन्ही कामगारांचा जागीच मृत्यू झाला. संदिप मानसिंग शिरसाम (२८), वसंत मुन्ना वरखेडे (२८, दोन्ही रा. धामण्या, जि. बैतूल, मध्यप्रदेश) असे दोन्ही मृत कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. तर दोन्ही अपघातग्रस्त वाहने सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

संदीप शिरसाम आणि वसंत वरखेडे हे दोन्ही मित्र मुळचे धामण्या येथील रहिवासी होते. दोन्ही जळगावातील वेगवेगळ्या ठिकाणी चटई कंपनीमध्ये कामाला होते. त्यामुळे ते सद्या पंढरपूर नगरमध्ये राहत होते. रविवारी दुपारी दोघेही त्यांच्या ताब्यातील एम.पी.४८.एम.आर.५३९७ क्रमांकाच्या दुचाकीने जळगावकडून भुसावळच्या दिशेने जात होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावातील उड्डाणपूलाजवळून जात असताना त्यांच्या दुचाकीला भुसावळकडून जळगावच्या दिशेने जाणा-या सुसाट वेगातील ऑईलच्या टँकरने (एमएच.०४.डीएस.२२१७) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील संदीप आणि वसंत यांना डोक्याला व हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.ग्रामस्थांसह पोलिसांची घटनास्थळी धाव...महामार्गावर अपघातानंतर ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेवून अपघाताची नशिराबाद पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिम मोरे, सहाय्यक फौजदार अलियार खान, अतूल महाजन, रूपेश साळवे आणि तुषार पाटील यांच्यासह इतर पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून दोन्ही तरूणांचे मृतदेह शववाहिकेतून जिल्हा रूग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. पोलिसांनी दोघांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. तसेच संदीप याच्या कंपनीतील कर्मचारीही रूग्णालयात दुपारी दाखल झाले होते. तर दोन दिवस कंपनीला सुट्टी होती तर रविवारी त्याची नाईट ड्युटी होती, असे त्यांनी सांगितले होते.चिमुकल्यांचे कोवळ्या वयातच पितृछत्र हरपलेमयत संदीप शिरसाम याच्या पश्चात आई, वडील पत्नी, दोन वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी, दोन भाऊ, दोन विवाहित बहीणी, तर वसंत याच्या पश्चात आई-वडील, पत्नी दोन वर्षाची मुलगी, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. दोन्ही तरुणाच्या चिमुकल्यांचे कोवळ्या वयातच पितृछत्र हरपले आहे. जळगावातील नातेवाईकांच्या माध्यमातून अपघाताची माहिती मयताच्या कुटुंबियांना देण्यात आली असून दोघांचे कुटुंबिय मध्यप्रदेशातील बैतूल येथून दुपारी जळगावकडे येण्यासाठी निघाले होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू