शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

मराठी ‘अभिमानगीत’ सहाच कडव्यांचे, विधानभवनात उठलेल्या गदारोळाला ‘राजकीय किनार’ असल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 12:51 IST

सत्य दाखवितो ‘रुपगंधा’

ठळक मुद्देमुळ कविता २४ ओळींची, १९९९ मध्ये तिस-या आवृत्तीचे प्रकाशन'रुपगंधा' भटांची पहिलीच निर्मिती

जिजाबराव वाघ/ ऑनलाईन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव,  दि.2 - ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’... मायबोली मराठीची महती सांगणारे हे अभिमान गीत सहाच कडव्यांचे असून यावरुन विधानभवनात उठलेल्या गदारोळाला ‘राजकीय किनार’ असल्याचे स्पष्ट होते. कविवर्य सुरेश भट यांच्या ‘रुपगंधा’ काव्यसंग्राहातील ही कविता आहे. विशेष म्हणजे चौथ्थाच नव्हे तर रुपगंधाच्या तिस-या आवृत्तीतही २४ ओळींचे सहाच कडवे आहेत.२७ रोजी मराठी राजाभाषा दिनी विधान भवनाच्या प्रांगणात सामूहिकरित्या हे अभिमान गीत गायले गेले. यानंतर 'पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी' हे चार ओळींचे सातवे कडवे वगळल्याचे सांगून विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधत आरोपांची राळ उडवून दिली. वस्तूत: मुळ कविता ही सहाच कडव्यांची असून सातवे कडवे वगळण्याचा प्रश्नच येत नसल्याचा बचाव सरकारने केला. सरकारचे हे म्हणणे पुर्णपणे बरोबर आहे. संगीतकार कौशल इनामदार यांनी सांगितल्यानुसार 'सातवे कडवे एका कार्यक्रमात सुरेश भट' यांनी म्हटल्याचे ठळकपणे अधोरेखित होते.राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मराठी अनुवादावरुन विरोधकांनी सरकारले घेरले होते. पाठोपाठ अभिमान गीतावरुनही लक्ष्य केले गेले. त्यामुळे सरकारची 'मराठी विरोधी' प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न विरोधकांडून होत असल्याचा सूर आहे.'रुपगंधा' भटांची पहिलीच निर्मितीकविश्रेष्ठ सुरेश भट यांचा रुपगंधा हा पहिलावहिला काव्यसंग्रह. त्याचे प्रकाशन १९६१ म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर एका वषार्ने झाले. त्यामुळेच मायबोलीच्या अस्मितेला सलाम म्हणून कविवर्य सुरेश भटांनी हे कविता लिहिली असावी, असा कयास बांधता येतो. ज्या सातव्या कडव्यावरुन वाद झाला. ते 'आपल्याच घरात हाल सोसते मराठी' या मायबोलीच्या नंतर होत असलेल्या गळचेपीच्या उव्दिग्न भावनेतून सुचल्या असाव्यात. असे मानायलाही जागा आहे.तिस-या आवृत्तीत २४ ओळींचे सहा कडवेरुपगंधा काव्यसंग्रहास राज्यशासनाचा व्दितीय पुरस्कार मिळाला होता. प्रथम पुरस्कार कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना तर सुरेश भट आणि दिलीप पुरुषोत्त चित्रे यांना विभागून व्दितीय पुरस्कार दिला गेला. ३० वर्षांनी म्हणजेच १९९१ मध्ये रुपगंधाची दुसरी आवृत्ती निघाली. त्यानंतर अवघ्या आठच वर्षात १९९९मध्ये तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. याचं आवृत्तीत एकुण ७२ कविता असून ४८ क्रमांकावर(पृष्ठ क्र.५८) 'मायबोली' ही अभिमान गीत असणारी कविता आहे. चार ओळीचे सहाच कडवे असून २४ ओळी कवितेत आहे. यातील बहुतांशी कवितांना गेयता आहे. काही रचना मुक्तछंदातीलही आहेत. रुपगंधा मध्येच सुरेश भट यांच्यातील बीजांकुरीत होणा-या कलंदर गझलकाराचे मनोज्ञ दर्शन देखील होते. संग्रहाची सुरुवात 'रुपगंधा' तर शेवट 'स्मरण' कवितेने झाला आहे. संग्रहाच्या एकुण चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.जनता तारी तया कोण मारी..!'काव्यरसिकांशी चार शब्द' या मनोगतात 'तो १९६१चा सुरेश भट वेगळा आणि हा १९९९चा सुरेश भट वेगळा..!' असे भटांनी म्हटले आहे. 'जनता तारी तया कोण मारी' अशा ओळींनी मनोगतचा शेवट केला आहे. त्यामुळे कालौघातच सातवे कडवे सुरेश भटांना सुचले असावे. हे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांचे म्हणणे संयुक्तिक आहे. हे कडवे स्वत: भट यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते. रुपगंधातील अभिमान गीतात त्याचा समावेश केला नव्हता. असेही तावडे यांनी सांगितले आहेच.

टॅग्स :Jalgaonजळगावmarathiमराठी