शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

मराठा आरक्षण लोकसभा, विधानसभेत सुटणारा विषय नाही - गिरीश महाजन 

By सुनील पाटील | Updated: September 2, 2023 18:24 IST

आरक्षण घालवल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली.

जळगाव : मराठा आरक्षण देण्यासाठी खूप तांत्रिक बाजू आहेत. लोकसभा किंवा विधानसभेत सुटणारा हा विषय राहिलेला नाही. सर्व बाजू समजून घेऊन तोडगा काढू. आम्ही उच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवले, मात्र मागच्या अडीच वर्षात लक्ष दिलं गेले नाही. त्यामुळे हे आरक्षण घालवल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली.

जालन्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मागील चार,पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते. त्यांनी पाणी देखील घेतलं नव्हतं, त्यामुळे त्यांची प्रकृती खराब होत चालली होती. रास्त मागणीसाठी एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ नये सरकार म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. म्हणूनच पोलीस त्यांना घ्यायला गेले होते. मात्र त्या ठिकाणी दगडफेक झाली. जनतेचा रोष इतका होता की त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. परंतु तो इतका बेछुटपणे केला की त्याचे समर्थन कोणी करु शकत नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही यावर बोलले आहेत. मुलांसा शाळेत जायचं आहे. महिलांना प्रवास करायचा आहे. त्यामुळे एस.टी.बसेसची जाळपोळ व सरकारी मालमत्तेचे नुकसान करु नये असे आवाहन महाजन यांनी केले. या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे.

उध्दव ठाकरेंच्या काळात अनेक घटनाउद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात अशा अनेक घटना घडल्या, मात्र त्यांनी त्यांची साधी विचारपूस केली नाही किंवा राजीनामा दिला नाही. कोरोनात लोक मरत असताना ठाकरे घराच्या बाहेर निघाले नाहीत. विरोधक आता त्या गावी जाऊन पुतणा मावशीचं प्रेम दाखवत असल्याची टिका मंत्री गिरीश महाजन यांनी केली. नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार ही अफवा आहे. असा कुठलाही विषय नसल्याचे महाजन म्हणाले.

टॅग्स :JalgaonजळगावGirish Mahajanगिरीश महाजन