शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

मराठा आरक्षण लोकसभा, विधानसभेत सुटणारा विषय नाही - गिरीश महाजन 

By सुनील पाटील | Updated: September 2, 2023 18:24 IST

आरक्षण घालवल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली.

जळगाव : मराठा आरक्षण देण्यासाठी खूप तांत्रिक बाजू आहेत. लोकसभा किंवा विधानसभेत सुटणारा हा विषय राहिलेला नाही. सर्व बाजू समजून घेऊन तोडगा काढू. आम्ही उच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवले, मात्र मागच्या अडीच वर्षात लक्ष दिलं गेले नाही. त्यामुळे हे आरक्षण घालवल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली.

जालन्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मागील चार,पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते. त्यांनी पाणी देखील घेतलं नव्हतं, त्यामुळे त्यांची प्रकृती खराब होत चालली होती. रास्त मागणीसाठी एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ नये सरकार म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. म्हणूनच पोलीस त्यांना घ्यायला गेले होते. मात्र त्या ठिकाणी दगडफेक झाली. जनतेचा रोष इतका होता की त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. परंतु तो इतका बेछुटपणे केला की त्याचे समर्थन कोणी करु शकत नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही यावर बोलले आहेत. मुलांसा शाळेत जायचं आहे. महिलांना प्रवास करायचा आहे. त्यामुळे एस.टी.बसेसची जाळपोळ व सरकारी मालमत्तेचे नुकसान करु नये असे आवाहन महाजन यांनी केले. या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे.

उध्दव ठाकरेंच्या काळात अनेक घटनाउद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात अशा अनेक घटना घडल्या, मात्र त्यांनी त्यांची साधी विचारपूस केली नाही किंवा राजीनामा दिला नाही. कोरोनात लोक मरत असताना ठाकरे घराच्या बाहेर निघाले नाहीत. विरोधक आता त्या गावी जाऊन पुतणा मावशीचं प्रेम दाखवत असल्याची टिका मंत्री गिरीश महाजन यांनी केली. नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार ही अफवा आहे. असा कुठलाही विषय नसल्याचे महाजन म्हणाले.

टॅग्स :JalgaonजळगावGirish Mahajanगिरीश महाजन