शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मराठा आरक्षण लोकसभा, विधानसभेत सुटणारा विषय नाही - गिरीश महाजन 

By सुनील पाटील | Updated: September 2, 2023 18:24 IST

आरक्षण घालवल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली.

जळगाव : मराठा आरक्षण देण्यासाठी खूप तांत्रिक बाजू आहेत. लोकसभा किंवा विधानसभेत सुटणारा हा विषय राहिलेला नाही. सर्व बाजू समजून घेऊन तोडगा काढू. आम्ही उच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवले, मात्र मागच्या अडीच वर्षात लक्ष दिलं गेले नाही. त्यामुळे हे आरक्षण घालवल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली.

जालन्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मागील चार,पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते. त्यांनी पाणी देखील घेतलं नव्हतं, त्यामुळे त्यांची प्रकृती खराब होत चालली होती. रास्त मागणीसाठी एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ नये सरकार म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. म्हणूनच पोलीस त्यांना घ्यायला गेले होते. मात्र त्या ठिकाणी दगडफेक झाली. जनतेचा रोष इतका होता की त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. परंतु तो इतका बेछुटपणे केला की त्याचे समर्थन कोणी करु शकत नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही यावर बोलले आहेत. मुलांसा शाळेत जायचं आहे. महिलांना प्रवास करायचा आहे. त्यामुळे एस.टी.बसेसची जाळपोळ व सरकारी मालमत्तेचे नुकसान करु नये असे आवाहन महाजन यांनी केले. या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे.

उध्दव ठाकरेंच्या काळात अनेक घटनाउद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात अशा अनेक घटना घडल्या, मात्र त्यांनी त्यांची साधी विचारपूस केली नाही किंवा राजीनामा दिला नाही. कोरोनात लोक मरत असताना ठाकरे घराच्या बाहेर निघाले नाहीत. विरोधक आता त्या गावी जाऊन पुतणा मावशीचं प्रेम दाखवत असल्याची टिका मंत्री गिरीश महाजन यांनी केली. नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार ही अफवा आहे. असा कुठलाही विषय नसल्याचे महाजन म्हणाले.

टॅग्स :JalgaonजळगावGirish Mahajanगिरीश महाजन