शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणच्या संघर्षाला यश आले. मात्र, त्यानंतर आलेले ठाकरे सरकार सुप्रीम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणच्या संघर्षाला यश आले. मात्र, त्यानंतर आलेले ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरले. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप शिव संग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी गुरुवारी अजिंठा विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच २ सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला असून त्यानंतर राज्यभरात मराठा समाज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारादेखील आमदार मेटे यांनी दिला आहे.

अंदाज समिती दौऱ्याच्या निमित्ताने आमदार विनायक मेटे जळगावात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत शिव संग्राम संघटनेची भूमिका मांडली. त्यांच्यासोबत संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे उपस्थित होते. यावेळी मेटे म्हणाले की, ५ मे रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आता तीन महिने उलटले, पण ठाकरे सरकारने न्यायालयाने सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न देखील केले नाहीत. उलटपक्षी केंद्र सरकारने १०२ च्या दुरुस्तीमध्ये आणखी सुधारणा करून राज्याचे अधिकार वाढवून दिला. निदान राज्य शासन मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सोयीसुविधा देऊन दिलासा देण्याची अपेक्षा होती. मात्र, ती देखील फोल ठरली आहे.

राज्य सरकार पाण्यात बसलेली म्हैस

मराठा आरक्षणाच्याबाबतीत कुठलाही निर्णय न घेणारे ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या म्हशीला आता उठविण्यासाठी शिव संग्राम संघटनेसह मराठा समाजाची बैठक झाली आहे. त्यानुसार ठाकरे सरकारला २ सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. तोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास २ सप्टेंबरला राज्यभर धरणे आंदोलन त्यानंतर मेळावे व मोर्चे काढण्यात येतील तर गणपती विसर्जनानंतर मुंबईत मराठा समाज उपोषणाला बसणार असून आरक्षण मिळाल्याशिवाय हे उपोषण थांबणार नसल्याचा इशारादेखील आमदार मेटे यांनी दिला. मराठा समाजाच्या बैठकीत आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत असलेल्या अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करण्याचा तसेच तत्काळ आरक्षणासाठी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करणारे ठराव करण्यात आले. मात्र, त्याकडेदेखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोपही मेटे यांनी केला.