शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तब्बल ६ हजार ५०० रूग्ण घरूनच घेत आहेत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा प्रशासनाने कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणची सूट दिली असून, संबंधित रुग्णांना चौदा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा प्रशासनाने कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणची सूट दिली असून, संबंधित रुग्णांना चौदा दिवस कोणाचाही संपर्कात न येण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र अनेक रुग्ण हे सातव्या व आठव्या दिवशीच घराबाहेर पडत असून या रुग्णांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या ही पहिल्या लाटेच्या तुलनेत दिवसाला सरासरी ५०० ते ७०० रुग्णांनी संख्या वाढत जात आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या लाटेत कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिला होता. ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत किंवा संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह आला मात्र त्या रुग्णाला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांना जिल्हा प्रशासनाने घरीच उपचार घेण्याची सूट दिली आहे. यासाठी रुग्णांना प्रशासनाने काही नियमावली देखील आखून दिली होती मात्र या नियमांचा पूर्णपणे भंग संबंधित रुग्णांकडून होत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी न होता वाढतच जात आहे.

गृह विलगीकरणतील रुग्ण ठरू शकतात सुपर स्प्रेडर ?

१. जिल्ह्यात अनेक रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत, मात्र त्यापैकी अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाही किंवा त्या रुग्णांना सौम्य लक्षणे असतात. यामुळे हे रुग्ण घरातच राहून काही दिवस औषधोपचार घेऊन, कोरोनावर मात करतात. मात्र या रुग्णांना १४ दिवस घरीच थांबणे बंधनकारक आहे. मात्र, हे रुग्ण आपल्याला काहीच झालं नाही म्हणून पाचव्या दिवसापासून बिनदिक्कत बाहेर फिरतात.

२. यामुळे या रुग्णांना जरी त्रास होत नसेल तरी त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते. तसेच संपर्कात आलेल्या रुग्णांना कमी लक्षणे असतीलच असे होत नाही. हे चित्र केवळ जळगाव शहरा पुरतेच नसून संपूर्ण जिल्ह्यात हीच परिस्थिती निर्माण होत आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

३. गृह विलगीकरणासोबतच एखाद्या रुग्णाने आरटीपीसीआरची चाचणी केल्यानंतर देखील या चाचणीचा अहवाल काही दिवसानंतर जाहीर केला जातो. मात्र अहवाल येईपर्यंत अनेक रुग्ण हे बाहेर फिरतात यामुळे देखील संसर्ग वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून संसर्ग वाढू नये म्हणून काही उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अशा दुर्लक्ष पणामुळे संसर्ग कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे गृह विलगीकरणतील रुग्ण हे कोरोनाचे सुपर स्प्रे डर ठरण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत एकही कारवाई नाही

गृह विलगीकरणाच्या नियमाचे उल्लंघन करणार्या रुग्णांवर देखरेख करण्यासाठी मनपा व जिल्हा प्रशासनाकडून काही पथके नेमण्यात आली आहेत. मात्र या पथकाद्वारे आतापर्यंत शहरात किंवा जिल्हाभरात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

११ हजार १९३ रुग्णांपैकी ६ हजार ५०५ रुग्ण घरीच घेत आहेत उपचार

जिल्ह्यात सद्यस्थितीत ११ हजार १९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ६ हजार ५०५ रुग्ण हे घरीच राहून उपचार घेत आहेत. म्हणजेच एकूण ॲक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत निम्मे रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण हे घरीच राहून उपचार घेत आहेत. शासकीय कोविड केअर सेंटर मध्ये केवळ एक हजार रुग्ण उपचार घेत आहेत. गृह विलगीकरणाचा पर्याय हा जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेवरील काहीअंशी ताण कमी करणारा असला, तरी रुग्णांच्या बेजबाबदारपणामुळे हाच पर्याय आता जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.