शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

तब्बल ६ हजार ५०० रूग्ण घरूनच घेत आहेत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा प्रशासनाने कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणची सूट दिली असून, संबंधित रुग्णांना चौदा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा प्रशासनाने कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणची सूट दिली असून, संबंधित रुग्णांना चौदा दिवस कोणाचाही संपर्कात न येण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र अनेक रुग्ण हे सातव्या व आठव्या दिवशीच घराबाहेर पडत असून या रुग्णांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या ही पहिल्या लाटेच्या तुलनेत दिवसाला सरासरी ५०० ते ७०० रुग्णांनी संख्या वाढत जात आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या लाटेत कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिला होता. ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत किंवा संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह आला मात्र त्या रुग्णाला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांना जिल्हा प्रशासनाने घरीच उपचार घेण्याची सूट दिली आहे. यासाठी रुग्णांना प्रशासनाने काही नियमावली देखील आखून दिली होती मात्र या नियमांचा पूर्णपणे भंग संबंधित रुग्णांकडून होत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी न होता वाढतच जात आहे.

गृह विलगीकरणतील रुग्ण ठरू शकतात सुपर स्प्रेडर ?

१. जिल्ह्यात अनेक रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत, मात्र त्यापैकी अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाही किंवा त्या रुग्णांना सौम्य लक्षणे असतात. यामुळे हे रुग्ण घरातच राहून काही दिवस औषधोपचार घेऊन, कोरोनावर मात करतात. मात्र या रुग्णांना १४ दिवस घरीच थांबणे बंधनकारक आहे. मात्र, हे रुग्ण आपल्याला काहीच झालं नाही म्हणून पाचव्या दिवसापासून बिनदिक्कत बाहेर फिरतात.

२. यामुळे या रुग्णांना जरी त्रास होत नसेल तरी त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते. तसेच संपर्कात आलेल्या रुग्णांना कमी लक्षणे असतीलच असे होत नाही. हे चित्र केवळ जळगाव शहरा पुरतेच नसून संपूर्ण जिल्ह्यात हीच परिस्थिती निर्माण होत आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

३. गृह विलगीकरणासोबतच एखाद्या रुग्णाने आरटीपीसीआरची चाचणी केल्यानंतर देखील या चाचणीचा अहवाल काही दिवसानंतर जाहीर केला जातो. मात्र अहवाल येईपर्यंत अनेक रुग्ण हे बाहेर फिरतात यामुळे देखील संसर्ग वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून संसर्ग वाढू नये म्हणून काही उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अशा दुर्लक्ष पणामुळे संसर्ग कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे गृह विलगीकरणतील रुग्ण हे कोरोनाचे सुपर स्प्रे डर ठरण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत एकही कारवाई नाही

गृह विलगीकरणाच्या नियमाचे उल्लंघन करणार्या रुग्णांवर देखरेख करण्यासाठी मनपा व जिल्हा प्रशासनाकडून काही पथके नेमण्यात आली आहेत. मात्र या पथकाद्वारे आतापर्यंत शहरात किंवा जिल्हाभरात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

११ हजार १९३ रुग्णांपैकी ६ हजार ५०५ रुग्ण घरीच घेत आहेत उपचार

जिल्ह्यात सद्यस्थितीत ११ हजार १९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ६ हजार ५०५ रुग्ण हे घरीच राहून उपचार घेत आहेत. म्हणजेच एकूण ॲक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत निम्मे रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण हे घरीच राहून उपचार घेत आहेत. शासकीय कोविड केअर सेंटर मध्ये केवळ एक हजार रुग्ण उपचार घेत आहेत. गृह विलगीकरणाचा पर्याय हा जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेवरील काहीअंशी ताण कमी करणारा असला, तरी रुग्णांच्या बेजबाबदारपणामुळे हाच पर्याय आता जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.