शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:52 IST

ज्ञानाद्वारे आमच्या जीवनात बदल घडावा आणि स्वत:ला त्यासाठी पात्र बनवायला हवे. सामाजिक रूपातही जरी आपण दिसायला मानवी पुतळ्यासारखे मानव ...

ज्ञानाद्वारे आमच्या जीवनात बदल घडावा आणि स्वत:ला त्यासाठी पात्र बनवायला हवे. सामाजिक रूपातही जरी आपण दिसायला मानवी पुतळ्यासारखे मानव आहोत. आगपेटीच्या खूप काड्या असतील तर त्यापासून आपण काय काय करू शकतो, एका काडीने आपण दिवा लावू शकतो आणि त्याच काडीने आपण घरही जाळू शकतो. दिसायला त्यात सगळ्या काड्याच आहेत, पण कार्य काय करत आहोत? फरक पडतो तो हेतूचा. आपण सर्वांनी स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करायचे आहे. कोणासाठीही कसलाही विपरीत असा विचार बाळगायचा नाही. जात-पात पहायची नाही. सर्वांना या परमात्म्यानेच बनवले आहे. आपल्यासारखाच समोरच्याचाही आदर करायला शिकलो पाहिजे. याठिकाणी सेवेच्या मैदानातही किंवा कुठेही पदांशी जोडले जायचे नाही. आपण स्वत:ला दासभावनेत ठेवायचे आहे. आमच्या मनाचा जो भाव आहे तो दासभावच असायला हवा. यावर एका शायराने असेही म्हटले आहे की,गली में मकान थे। मकानों पे नाम थे ।नाम के साथ ओहदे थे।बहुत देखा कोई इन्सान न मिला ।।तेव्हा ही गोष्ट आमच्याबाबतीत घडू नये. पहायला गेले तर घरांमध्ये आपल्या जगामध्ये सगळेत काहीना काही करत आहोत. जर काही प्राप्त करत असतील तरी ती आमची उपलब्धी आहे. त्याबरोबर एक विनयशीलता आणि विनम्रतेची भावनाही असावी की, आम्ही जे काही आहोत ते ईश्वर कृपेमुळेच आहोत.आमची जेवढी म्हणून उर्जा आहे तिचा सदुपयोग व्हावा. कोणतीही दौलत आमच्या झोळीमध्ये असेल त्याद्वारे आपण कोणाचे नुकसान करू नये. आगपेटीच्या काडीप्रमाणे बनू नये ज्यामुळे घर जळेल. तेव्हा जर आपण मनुष्य देह घेऊन या जगामध्ये आलो आहोत तर मग या गोष्टीचे सतत स्मरण असायला हवे की, आम्हाला खऱ्या अर्थाने मनुष्य बनायचे आहे.अनेक महात्मा लोकांनी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या आपल्या जीवनात उतरवायच्या आहेत. त्याचबरोबर केवळ आपल्यापर्यंत सीमित न ठेवता हा ज्ञानरूपी प्रकाश जेवढ्यांना देता येईल. त्यांनाही ही उर्जा आणि प्रेरणा द्यायची आहे. पण ही प्रेरणा कशी द्यायची? जिथे गरज आहे तिथे बोलायचेही आहे. परंतु त्या अगोदर आपल्या बुद्धीमध्ये, विचारांमध्ये व्यवहारांमध्ये अंगीकार करून, गोड वाणीद्वारे कोणाचे मन न दुखवता. केवळ अश्रू पुसत आणि शक्य तितके आपण इतरांच्या जीवनाला दिलासा देण्याचा प्रयत्न करु या...संकलन - राजकुमार वाणी, ज्ञानप्रचारक, संत निरंकारी मंडळ, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव