शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:52 IST

ज्ञानाद्वारे आमच्या जीवनात बदल घडावा आणि स्वत:ला त्यासाठी पात्र बनवायला हवे. सामाजिक रूपातही जरी आपण दिसायला मानवी पुतळ्यासारखे मानव ...

ज्ञानाद्वारे आमच्या जीवनात बदल घडावा आणि स्वत:ला त्यासाठी पात्र बनवायला हवे. सामाजिक रूपातही जरी आपण दिसायला मानवी पुतळ्यासारखे मानव आहोत. आगपेटीच्या खूप काड्या असतील तर त्यापासून आपण काय काय करू शकतो, एका काडीने आपण दिवा लावू शकतो आणि त्याच काडीने आपण घरही जाळू शकतो. दिसायला त्यात सगळ्या काड्याच आहेत, पण कार्य काय करत आहोत? फरक पडतो तो हेतूचा. आपण सर्वांनी स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करायचे आहे. कोणासाठीही कसलाही विपरीत असा विचार बाळगायचा नाही. जात-पात पहायची नाही. सर्वांना या परमात्म्यानेच बनवले आहे. आपल्यासारखाच समोरच्याचाही आदर करायला शिकलो पाहिजे. याठिकाणी सेवेच्या मैदानातही किंवा कुठेही पदांशी जोडले जायचे नाही. आपण स्वत:ला दासभावनेत ठेवायचे आहे. आमच्या मनाचा जो भाव आहे तो दासभावच असायला हवा. यावर एका शायराने असेही म्हटले आहे की,गली में मकान थे। मकानों पे नाम थे ।नाम के साथ ओहदे थे।बहुत देखा कोई इन्सान न मिला ।।तेव्हा ही गोष्ट आमच्याबाबतीत घडू नये. पहायला गेले तर घरांमध्ये आपल्या जगामध्ये सगळेत काहीना काही करत आहोत. जर काही प्राप्त करत असतील तरी ती आमची उपलब्धी आहे. त्याबरोबर एक विनयशीलता आणि विनम्रतेची भावनाही असावी की, आम्ही जे काही आहोत ते ईश्वर कृपेमुळेच आहोत.आमची जेवढी म्हणून उर्जा आहे तिचा सदुपयोग व्हावा. कोणतीही दौलत आमच्या झोळीमध्ये असेल त्याद्वारे आपण कोणाचे नुकसान करू नये. आगपेटीच्या काडीप्रमाणे बनू नये ज्यामुळे घर जळेल. तेव्हा जर आपण मनुष्य देह घेऊन या जगामध्ये आलो आहोत तर मग या गोष्टीचे सतत स्मरण असायला हवे की, आम्हाला खऱ्या अर्थाने मनुष्य बनायचे आहे.अनेक महात्मा लोकांनी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या आपल्या जीवनात उतरवायच्या आहेत. त्याचबरोबर केवळ आपल्यापर्यंत सीमित न ठेवता हा ज्ञानरूपी प्रकाश जेवढ्यांना देता येईल. त्यांनाही ही उर्जा आणि प्रेरणा द्यायची आहे. पण ही प्रेरणा कशी द्यायची? जिथे गरज आहे तिथे बोलायचेही आहे. परंतु त्या अगोदर आपल्या बुद्धीमध्ये, विचारांमध्ये व्यवहारांमध्ये अंगीकार करून, गोड वाणीद्वारे कोणाचे मन न दुखवता. केवळ अश्रू पुसत आणि शक्य तितके आपण इतरांच्या जीवनाला दिलासा देण्याचा प्रयत्न करु या...संकलन - राजकुमार वाणी, ज्ञानप्रचारक, संत निरंकारी मंडळ, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव