शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

माळपिंप्रीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 20:20 IST

बारा लाखाचे कर्ज व शेतातील पिकांची बिकट स्थिती अशा दुहेरी चिंतेत असलेल्या जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील भगवान आत्माराम पाटील (३७) या तरुण शेतकºयाने शुक्रवारी सकाळी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली.

ठळक मुद्देमाळपिंप्री येथील शेतातच घेतले विष१२ लाखांचे होते डोक्यावर कर्जजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू

जळगाव : बारा लाखाचे कर्ज व शेतातील पिकांची बिकट स्थिती अशा दुहेरी चिंतेत असलेल्या जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील भगवान आत्माराम पाटील (३७) या तरुण शेतकºयाने शुक्रवारी सकाळी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली.भगवान पाटील व त्यांच्या दोन भावांची माळपिंप्री शिवारात शेती असून ते सर्वजण शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी सकाळी भगवान पाटील व त्यांचे भाऊ विनोद पाटील हे शेतात गेलेले होते. शेतात दोघेही जेवण करीत असताना भगवान पाटील यांनी शौचास जाऊन येतो असे सांगून तेथून गेले. बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने त्यांना पाहण्यासाठी विनोद पाटील गेले असता भगवान पाटील विहीरजवळ उलटी करीत असल्याचे आढळून आले. त्या वेळी त्यांना दुपारी साडे बारा वाजेदरम्यान जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दुपारी चार वाजेच्या सुमारास भगवान पाटील यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याJalgaonजळगाव