शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

भविष्यालाच बनवा जीवनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 22:37 IST

आनंदास कमी करणाऱ्या गोष्टींचा आपण विचारच करीत नाही

जीवनात आनंद कसा येईल, याकडे आपण सर्व लक्ष देतो, मात्र आनंदास कमी करणाऱ्या गोष्टींचा आपण विचारच करीत नाही, यासाठी एक छोटी कृती तुम्हास सांगते - आपण स्वत:ला प्रश्न विचारावा की, अशी कोणती गोष्ट आहे की, जी माझ्या आनंदला प्रभावित करते किंवा माझ्यापासून हिरावून नेते ? किंवा अशी कोणती परिस्थिती आहे की ज्यात मी खुश राहू शकत नाही ? या प्रश्नांच्या उत्तरामध्ये व्यक्तिसापेक्ष बदल होतील, त्यात सर्वांमध्ये समान असणारी बाब प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे भूतकाळातील काही कटू अनुभव अजूनही आपणाकडे साठवून ठेवलेले आहेत.आपण कुठे ना कुठे आपल्या भूतकाळातील घडलेल्या घटनांना पकडून ठेवलेले आहे. या गोष्टी जीवनातील आपल्या आनंदाला प्रभावित करीत असतात. याबाबतीत सत्यता ही असते की, ज्या वेळेस मी भूतकाळाला सोडून दिलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मी त्या घटना किंवा प्रसंगी वर्तमानात आणू शकत नाही, किंवा त्या दुरुस्त करु शकत नाही, तेव्हा मी पुन्हा आनंद कसा निर्माण करु शकणार? बहुतांश व्यक्तिंची हीच समस्या आहे की त्या भूतकाळातील चिंतनाने त्यांचे भविष्य अंधारात ढकलतात. तेव्हा भविष्यास जीवनाचा आधार बनवा.आम्ही भूतकाळाला पकडून ठेवतो. त्याला विसरले पाहिजे. जी गोष्ट होऊन गेली तिला जाऊ दे, तिला वर्तमानात बनवू नका, परंतु भविष्यासाठी नवीन योजना बनवा. भूतकाळातील कटू, वाईट स्मृतींना कुरवाळून आपल्या उज्ज्वल भविष्याबद्दल नवा विचार करणे हे एकाच वेळेस शक्य नसते. तुमच्या विचारात भूतकाळातील कटू स्मृतींची चिंता असताना वर्तमानकाळात शांती, आनंद कसे येऊ शकतील?तसेच आपले मन होणाºया गोष्टीत सुध्दा रंजक होते. कारण कुठला ना कुठला आनंद भविष्यकाळात शोधत असतो. आपण हे मान्य केले असते की, आपल्याकडे एखादी वस्तू असेल तर आनंद मिळेल तेव्हा माझे सर्व लक्ष याकडे असते की अमूक घडले तर मला आनंद मिळेल. याबाबतीत सत्यता ही की, या विचारा सोबत दुसराही विचार येतोच की, जर असे झाले नाही तर.... ही एक भितीसुध्दा मनात असते.जेव्हा आमचा आनंद आम्ही अमूक एखाद्या गोष्टीवरून ठरवित असतो तेव्हा भीती सोबत येतेच. कारण, जिथे परावलंबित्व असते तेथे भितीची भावना असेलच. जर असे झाले नाही तर काय? ते निघून गेले तर काय ? असे विचार मनात येतात. त्यामुळे मानवी मन अशांत होते.- ब्रह्मकुमारी शिवानी दीदी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव