शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

भविष्यालाच बनवा जीवनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 22:37 IST

आनंदास कमी करणाऱ्या गोष्टींचा आपण विचारच करीत नाही

जीवनात आनंद कसा येईल, याकडे आपण सर्व लक्ष देतो, मात्र आनंदास कमी करणाऱ्या गोष्टींचा आपण विचारच करीत नाही, यासाठी एक छोटी कृती तुम्हास सांगते - आपण स्वत:ला प्रश्न विचारावा की, अशी कोणती गोष्ट आहे की, जी माझ्या आनंदला प्रभावित करते किंवा माझ्यापासून हिरावून नेते ? किंवा अशी कोणती परिस्थिती आहे की ज्यात मी खुश राहू शकत नाही ? या प्रश्नांच्या उत्तरामध्ये व्यक्तिसापेक्ष बदल होतील, त्यात सर्वांमध्ये समान असणारी बाब प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे भूतकाळातील काही कटू अनुभव अजूनही आपणाकडे साठवून ठेवलेले आहेत.आपण कुठे ना कुठे आपल्या भूतकाळातील घडलेल्या घटनांना पकडून ठेवलेले आहे. या गोष्टी जीवनातील आपल्या आनंदाला प्रभावित करीत असतात. याबाबतीत सत्यता ही असते की, ज्या वेळेस मी भूतकाळाला सोडून दिलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मी त्या घटना किंवा प्रसंगी वर्तमानात आणू शकत नाही, किंवा त्या दुरुस्त करु शकत नाही, तेव्हा मी पुन्हा आनंद कसा निर्माण करु शकणार? बहुतांश व्यक्तिंची हीच समस्या आहे की त्या भूतकाळातील चिंतनाने त्यांचे भविष्य अंधारात ढकलतात. तेव्हा भविष्यास जीवनाचा आधार बनवा.आम्ही भूतकाळाला पकडून ठेवतो. त्याला विसरले पाहिजे. जी गोष्ट होऊन गेली तिला जाऊ दे, तिला वर्तमानात बनवू नका, परंतु भविष्यासाठी नवीन योजना बनवा. भूतकाळातील कटू, वाईट स्मृतींना कुरवाळून आपल्या उज्ज्वल भविष्याबद्दल नवा विचार करणे हे एकाच वेळेस शक्य नसते. तुमच्या विचारात भूतकाळातील कटू स्मृतींची चिंता असताना वर्तमानकाळात शांती, आनंद कसे येऊ शकतील?तसेच आपले मन होणाºया गोष्टीत सुध्दा रंजक होते. कारण कुठला ना कुठला आनंद भविष्यकाळात शोधत असतो. आपण हे मान्य केले असते की, आपल्याकडे एखादी वस्तू असेल तर आनंद मिळेल तेव्हा माझे सर्व लक्ष याकडे असते की अमूक घडले तर मला आनंद मिळेल. याबाबतीत सत्यता ही की, या विचारा सोबत दुसराही विचार येतोच की, जर असे झाले नाही तर.... ही एक भितीसुध्दा मनात असते.जेव्हा आमचा आनंद आम्ही अमूक एखाद्या गोष्टीवरून ठरवित असतो तेव्हा भीती सोबत येतेच. कारण, जिथे परावलंबित्व असते तेथे भितीची भावना असेलच. जर असे झाले नाही तर काय? ते निघून गेले तर काय ? असे विचार मनात येतात. त्यामुळे मानवी मन अशांत होते.- ब्रह्मकुमारी शिवानी दीदी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव