शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

भविष्यालाच बनवा जीवनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 22:37 IST

आनंदास कमी करणाऱ्या गोष्टींचा आपण विचारच करीत नाही

जीवनात आनंद कसा येईल, याकडे आपण सर्व लक्ष देतो, मात्र आनंदास कमी करणाऱ्या गोष्टींचा आपण विचारच करीत नाही, यासाठी एक छोटी कृती तुम्हास सांगते - आपण स्वत:ला प्रश्न विचारावा की, अशी कोणती गोष्ट आहे की, जी माझ्या आनंदला प्रभावित करते किंवा माझ्यापासून हिरावून नेते ? किंवा अशी कोणती परिस्थिती आहे की ज्यात मी खुश राहू शकत नाही ? या प्रश्नांच्या उत्तरामध्ये व्यक्तिसापेक्ष बदल होतील, त्यात सर्वांमध्ये समान असणारी बाब प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे भूतकाळातील काही कटू अनुभव अजूनही आपणाकडे साठवून ठेवलेले आहेत.आपण कुठे ना कुठे आपल्या भूतकाळातील घडलेल्या घटनांना पकडून ठेवलेले आहे. या गोष्टी जीवनातील आपल्या आनंदाला प्रभावित करीत असतात. याबाबतीत सत्यता ही असते की, ज्या वेळेस मी भूतकाळाला सोडून दिलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मी त्या घटना किंवा प्रसंगी वर्तमानात आणू शकत नाही, किंवा त्या दुरुस्त करु शकत नाही, तेव्हा मी पुन्हा आनंद कसा निर्माण करु शकणार? बहुतांश व्यक्तिंची हीच समस्या आहे की त्या भूतकाळातील चिंतनाने त्यांचे भविष्य अंधारात ढकलतात. तेव्हा भविष्यास जीवनाचा आधार बनवा.आम्ही भूतकाळाला पकडून ठेवतो. त्याला विसरले पाहिजे. जी गोष्ट होऊन गेली तिला जाऊ दे, तिला वर्तमानात बनवू नका, परंतु भविष्यासाठी नवीन योजना बनवा. भूतकाळातील कटू, वाईट स्मृतींना कुरवाळून आपल्या उज्ज्वल भविष्याबद्दल नवा विचार करणे हे एकाच वेळेस शक्य नसते. तुमच्या विचारात भूतकाळातील कटू स्मृतींची चिंता असताना वर्तमानकाळात शांती, आनंद कसे येऊ शकतील?तसेच आपले मन होणाºया गोष्टीत सुध्दा रंजक होते. कारण कुठला ना कुठला आनंद भविष्यकाळात शोधत असतो. आपण हे मान्य केले असते की, आपल्याकडे एखादी वस्तू असेल तर आनंद मिळेल तेव्हा माझे सर्व लक्ष याकडे असते की अमूक घडले तर मला आनंद मिळेल. याबाबतीत सत्यता ही की, या विचारा सोबत दुसराही विचार येतोच की, जर असे झाले नाही तर.... ही एक भितीसुध्दा मनात असते.जेव्हा आमचा आनंद आम्ही अमूक एखाद्या गोष्टीवरून ठरवित असतो तेव्हा भीती सोबत येतेच. कारण, जिथे परावलंबित्व असते तेथे भितीची भावना असेलच. जर असे झाले नाही तर काय? ते निघून गेले तर काय ? असे विचार मनात येतात. त्यामुळे मानवी मन अशांत होते.- ब्रह्मकुमारी शिवानी दीदी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव