शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

ST अपघात: आपुले मरण पाहिले म्या डोळा... मृत्यूच जणू करीत होता पाठलाग... अविनाशने ठेवले स्टेटस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 08:40 IST

अविनाश परदेशी हा मुलगी पाहण्यासाठी इंदूर येथे गेला होता. स्थळ पाहून तो परत येत होता.  

संजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर (जि. जळगाव) : इंदूरहून निघालेली अमळनेर आगाराची ही नवी बस घाट लागण्यापूर्वी एका ठिकाणी प्रवाशांच्या विश्रांतीसाठी थांबली होती. बस थांबली असली तरी, मृत्यू मात्र बसचा जणू पाठलागच करीत होता की काय, अशी शंका यावी. कारण निंबाजी पाटील व अरवा बोहरी या दोघांनीही आपण दोन-तीन तासांत घरी पोहोचत असल्याचा शेवटचा फोन केला होता, तर अविनाश परदेशी याने वे टू पाडळसरे, असे स्टेटस ठेवले होते. नंतर मात्र अपघाताचा निरोप आल्याने परिवारावर जणू दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

अविनाश परदेशी हा मुलगी पाहण्यासाठी इंदूर येथे गेला होता. स्थळ पाहून तो परत येत होता.  त्याने मोबाईलवरील  व्हाॅट्स ॲपवर वे  टू पाडळसरे, असे स्टेटस ठेवले होते. त्याचे नातेवाईक मित्रही वाट पाहत होते. मुलगी पसंद पडली की नाही, हे ऐकण्याची सर्वांना उत्सुकता लागली होती. पण, अविनाश हा पाडळसरे येथे आलाच नाही.

आपुले मरण पाहिले म्या डोळा...

इंदूर येथे दोन-चार दिवस मुलाकडे राहून परतणाऱ्या पती निंबाजी पाटील यांची पत्नी आणि मुले वाट पाहत होते. वाटेत बालाघाटनजीक त्यांची बस नर्मदा नदीत कोसळली. निंबाजी पाटील यांच्याकडे असलेल्या आधारकार्डावरून त्यांची ओळख पटली. निंबाजी यांच्याकडे पत्नी कमलबाई यांचेही आधारकार्ड आढळले... आणि मग अपघातात निंबाजी यांना पत्नीसह जलसमाधी मिळाल्याची वार्ता पसरली... ती पिळोद्यापर्यंत पोहोचली....गावातील लोक पाटील यांच्या घराजवळ जमा झाले.... नातेवाइकांचे फोन येऊ लागले....आणि कमलाबाई घरात असल्याची खात्री अनेकांनी करून घेतली... पण त्याआधी बराचवेळ कमलाबाई यांना या घटनेची माहिती देण्यात आली नव्हती. पण शेवटी घरासमोर जमलेली गर्दी पाहून त्या काय ते समजल्या आणि हंबरडा फोडला.

अरवा बोहरा जात होत्या माहेरी अमळनेरला

मूर्तिजापूर (जि. अकोला) येथील अरवा मुर्ताझा बोहरा (२७) या मूर्तिजापूरवरून इंदूर येथील आजारी मावशीला भेटायला गेल्या होत्या. १८ जुलै रोजी इंदूरवरून आपल्या माहेरी अमळनेर येथे जाण्यासाठी अपघातग्रस्त बसमधून प्रवास करीत होत्या; परंतु बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अरवा बोहरा यांचा विवाह मूर्तिजापूर येथील हुसैनी हार्डवेअरचे मालक हुसैन उर्फ अख्तर अकबर अली सैफी यांचा मुलगा मुर्ताझा हुसैन सैफी यांच्या सोबत २०१८ मध्ये झाला. अरवा यांचे माहेर अमळनेर असल्याने त्या इंदूरवरून एकट्याच अमळनेरसाठी प्रवास करीत होत्या. एक दिवस माहेरी थांबून १९ जुलै रोजी त्या मूर्तिजापूर येथे परत येणार होत्या. परंतु नियतीला ते मान्य झाले नाही. त्यांच्यावर मधेच काळाने झडप घातली. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूची वार्ता मूर्तिजापूर येथे समजताच सर्वत्र शोककळा पसरली.

अमळनेर येथे चालक-वाहकाच्या मृत्यूने हळहळ

अमळनेर आगारातील बसचालक चंद्रकांत एकनाथ पाटील हे रा. ढे कू रोड अमळनेर येथे परिवारासह वास्तव्यास होते. सात ते आठ वर्षांपूर्वी ते अमळनेर आगारात रुजू झाला होते. त्यापूर्वी ते शहादा आगारात नोकरीला होते. त्यांचे वडील ग्रामीण रुग्णालयात चालक होते. ते सेवानिवृत्त झाले असून त्यांचा भाऊदेखील एसटीमध्ये नोकरीला आहे. चंद्रकांत यांना आठ वर्षांची मुलगी असून ती इयत्ता तिसरीला तर चार वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या मृत्यूने परिसर व एसटी कर्मचाऱ्यात हळहळ व्यक्त होत होती.

प्रकाश श्रावण चौधरी (रा. शारदा कॉलनी) या वाहकाचा या अपघातात मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मुलगा मोठा २२ वर्षांचा बारावी व आयटीआय झाला आहे. मुलगी १७ वर्षांची असून ११ वीला आहे. प्रकाश यांचा भाऊ केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकात आहे.

१२ मृतदेह काढले बाहेर : वाहक प्रकाश चाैधरी (४०), चालक चंद्रकांत पाटील (४५), अविनाश परदेशी (अमळनेर), निंबाजी पाटील (६०, अमळेनर), अरवा बोहरा (२७, अमळनेर), राजू तुळशीराम (३५, राजस्थान), जगन्नाथ जोशी (६८, राजस्थान), चेतनराम जागीड (जयपूर), सैफउद्दीन बोहरा (इंदूर), विकास बेहरे (३३, धुळे), कल्पना विकास पाटील (५७, धुळे), रुख्मिणीबाई नारायणलाल जोशी (राजस्थान).

या अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीला तातडीने चौकशी करण्यास सांगितले आहे. अपघातातील सर्व मृतदेह धामणोत येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून, अजूनही शोधमोहीम सुरू आहे. - शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, राज्य एसटी महामंडळ

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेर