शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

कमळाच्या फुलांनी हरताळा तलाव बनला नयनरम्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST

हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथील तलावात गेल्या १० वर्षांपासून तलावाचे पाणी आटले असताना कमळ पूर्ण नेस्तनाबूत झाले ...

हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथील तलावात गेल्या १० वर्षांपासून तलावाचे पाणी आटले असताना कमळ पूर्ण नेस्तनाबूत झाले होते. मात्र, गेल्या वर्षापासून येथे निसर्गाच्या कृपेमुळे जलसाठा शिल्लक राहत असल्याने कमळ फुलांनी तलावात पुन्हा डोके वर काढत हरताळे तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. तलावात दोन खळे एवढ्या भागात दोन ठिकाणी कमळाची फुले उमलली आहेत.

२० वर्षांपूर्वी संपूर्ण तलाव कमळाच्या फुलांनी व्यापला होता. संपूर्ण १७५ हेक्टर ५६ आर. जलसाठा असलेल्या तलावात कमळ शेती करण्यात येत होती. काही ठेकेदारांनी त्यावर चांगलाच डल्ला मारत कमाई केली. परप्रांतात येथून कमळाच्या वाट्या आयशर, छोटा हत्ती आदी वाहनांतून भरून पाठवण्यात येत होत्या; परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये कमी पावसामुळे तलावात पाणी साचत नव्हते आणि त्यातही कमळ संपूर्ण नष्ट झाले होते; परंतु आता येथील बेहर बेटमध्ये बांधण्यात आलेल्या साई मंदिर परिसरात कमळाने पुन्हा डोकं वर करीत जवळपास दोन खड्ड्यांत आपला अधिवास सुरू केला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांनादेखील कमळाच्या फुलाचे सौंदर्य पाहून भुरळ पडत आहे. पूर्वी येथे कमळ असताना २००३ मध्ये श्रावणबाळ समाधी मंदिर जीर्णोद्धार करण्याच्या वेळेस करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी या तलावाचे नामकरणदेखील लक्ष्मीसागर असे केले होते.

ग्रामस्थांना मात्र येथे कमळ नकोच

कमळाची फुले आकर्षक व मोहक वाटत असली तरी ठरावीक मर्यादेपुरते ठीक आहे. मात्र, संपूर्ण तलावात ते वाढल्यास त्याचा धोका मात्र या तलावाला आहे. त्यातून कोणतेच उत्पन्न गावकऱ्यांना मिळत नाही. पूर्वी कमळावर अनेकांनी खूप पैसा कमावला. कमळ शेतीमुळे मत्स्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येते. केवळ देखावा म्हणून विशिष्ट भागात त्याची वाढ ठीक आहे; परंतु संपूर्ण तलावभर कमळ उगवायला नको. त्यामुळे तलावाचे सर्व पाणी दूषित होऊन निरुपयोगी ठरत असल्यामुळे असे मंदिर सेवेकरी मधुकर भगत, गजानन ठाकूर, माजी सरपंच जयेश कार्ले, जितेंद्र वाघ व अन्य ग्रामस्थांचे मत आहे.

तलावात बोटिंगसाठी कमळाव्यतिरिक्त पाणीसाठा जिवंत असला पाहिजे. पर्यटनाला चालना मिळेल. तलाव सुशोभीकरण यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे मागच्या वेळेस प्रस्ताव पाठवलेला होता. मात्र, कोणतीही दखल घेतली गेली नाही. पर्यटकांसाठी आकर्षण ठरते; पण कमळ मर्यादेतच असले पाहिजे.

-भागवत धबाडे, तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, मुक्ताईनगर

मोजक्याच जागी कमळ उगवले पाहिजे. कारण मासेमारी करताना अडचणी निर्माण होतात, पाणीही दूषित होते. पूर्ण तलावात कमळ वाढू देऊ नये. मासेमारीवरच गावाची उपजीविका अवलंबून आहे. तलावाचा फायदा गावकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे.

-समाधान कोळी, मासेमारी मजूर