शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाचा भरपूर साठा, मात्र ज्वारीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 21:39 IST

अतिपावसाचा परिणाम : शासकीय गोदामांमध्ये गहू, तांदूळ पुरेसा उपलब्ध

जळगाव : आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने यंदा धान्य, कडधान्याची सर्वांनाच चिंता आहे, असे असले तरी शासकीय गोदामांमध्ये पुरेसा गहू, तांदूळ उपलब्ध असल्याने त्याची चिंता नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ज्वारी काळी पडल्याने ती खरेदी केली जाणार नसल्याने ज्वारीची चणचण भासणार असल्याचे संकेत दिले जात आहे.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे कापूस, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात एकट्या जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात ७ लाख ३ हजार ७८७ हेक्टरवर नुकसान झाले आहे. राज्यभरातही असे सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसानीचे चित्र आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला असून उत्पादन खर्चही कसा निघेल, या चिंतेत तो आहे. बळीराजासोबतच नोकरदार, व्यावसायिक सर्वांनाच महागाई भडकण्याची चिंता आहे. यात मुख्यत्वे करून धान्याची व कडधान्याची चिंता आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढण्यासह धान्याची उपलब्धता कशी असेल, याचा सर्वच विचार करीत आहे. या पार्श्वभूमीवर धान्य साठ्याचा आढावा घेतला तर यामध्ये भारतीय अन्न महामंडळाकडून सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी पुरेसा पुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे.साठ्याची चिंता नाहीभारतीय अन्न महामंडळाच्या मनमाड येथील केंद्रावरून जळगाव जिल्ह्याला सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी धान्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये सदर केंद्रावर पुरेसा गहू व तांदळाचा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. भारतीय अन्न महामंडळाकडे देशभरातून धान्याचा साठा येत असतो. त्यामुळे मध्यप्रदेश, राजस्थान व इतर ठिकाणाहून आलेला गेल्या वर्षाचा गव्हाचा साठा असल्याची माहिती मिळाली.दरमहा एक लाख क्विंटल गहू तर ५५ हजार क्विंटल तांदळाची आवश्यकताजळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने डिसेंबर महिन्यासाठी एकूण ९९ हजार ६५९ क्विंटल गव्हाची तर ५४ हजार २३७ हजार क्विंटल तांदळाची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार हे नियतन उपलब्ध होणार असून दरमहा सरासरी एवढाच साठा जिल्ह्यासाठी आवश्यक असतो. त्यानुसार सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ हा साठा भारतीय अन्न महामंडळाकडून उपलब्ध होऊ शकणार आहे. यात विशेष म्हणजे रब्बी हंगामात गव्हाची अद्याप लागवड होणे बाकी असून रब्बीचे क्षेत्र वाढणार असल्याने यंदाही गहू मोठ्या प्रमाणात येऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव