शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गव्हाचा भरपूर साठा, मात्र ज्वारीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 21:39 IST

अतिपावसाचा परिणाम : शासकीय गोदामांमध्ये गहू, तांदूळ पुरेसा उपलब्ध

जळगाव : आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने यंदा धान्य, कडधान्याची सर्वांनाच चिंता आहे, असे असले तरी शासकीय गोदामांमध्ये पुरेसा गहू, तांदूळ उपलब्ध असल्याने त्याची चिंता नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ज्वारी काळी पडल्याने ती खरेदी केली जाणार नसल्याने ज्वारीची चणचण भासणार असल्याचे संकेत दिले जात आहे.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे कापूस, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात एकट्या जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात ७ लाख ३ हजार ७८७ हेक्टरवर नुकसान झाले आहे. राज्यभरातही असे सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसानीचे चित्र आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला असून उत्पादन खर्चही कसा निघेल, या चिंतेत तो आहे. बळीराजासोबतच नोकरदार, व्यावसायिक सर्वांनाच महागाई भडकण्याची चिंता आहे. यात मुख्यत्वे करून धान्याची व कडधान्याची चिंता आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढण्यासह धान्याची उपलब्धता कशी असेल, याचा सर्वच विचार करीत आहे. या पार्श्वभूमीवर धान्य साठ्याचा आढावा घेतला तर यामध्ये भारतीय अन्न महामंडळाकडून सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी पुरेसा पुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे.साठ्याची चिंता नाहीभारतीय अन्न महामंडळाच्या मनमाड येथील केंद्रावरून जळगाव जिल्ह्याला सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी धान्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये सदर केंद्रावर पुरेसा गहू व तांदळाचा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. भारतीय अन्न महामंडळाकडे देशभरातून धान्याचा साठा येत असतो. त्यामुळे मध्यप्रदेश, राजस्थान व इतर ठिकाणाहून आलेला गेल्या वर्षाचा गव्हाचा साठा असल्याची माहिती मिळाली.दरमहा एक लाख क्विंटल गहू तर ५५ हजार क्विंटल तांदळाची आवश्यकताजळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने डिसेंबर महिन्यासाठी एकूण ९९ हजार ६५९ क्विंटल गव्हाची तर ५४ हजार २३७ हजार क्विंटल तांदळाची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार हे नियतन उपलब्ध होणार असून दरमहा सरासरी एवढाच साठा जिल्ह्यासाठी आवश्यक असतो. त्यानुसार सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ हा साठा भारतीय अन्न महामंडळाकडून उपलब्ध होऊ शकणार आहे. यात विशेष म्हणजे रब्बी हंगामात गव्हाची अद्याप लागवड होणे बाकी असून रब्बीचे क्षेत्र वाढणार असल्याने यंदाही गहू मोठ्या प्रमाणात येऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव