शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

गव्हाचा भरपूर साठा, मात्र ज्वारीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 21:39 IST

अतिपावसाचा परिणाम : शासकीय गोदामांमध्ये गहू, तांदूळ पुरेसा उपलब्ध

जळगाव : आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने यंदा धान्य, कडधान्याची सर्वांनाच चिंता आहे, असे असले तरी शासकीय गोदामांमध्ये पुरेसा गहू, तांदूळ उपलब्ध असल्याने त्याची चिंता नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ज्वारी काळी पडल्याने ती खरेदी केली जाणार नसल्याने ज्वारीची चणचण भासणार असल्याचे संकेत दिले जात आहे.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे कापूस, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात एकट्या जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात ७ लाख ३ हजार ७८७ हेक्टरवर नुकसान झाले आहे. राज्यभरातही असे सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसानीचे चित्र आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला असून उत्पादन खर्चही कसा निघेल, या चिंतेत तो आहे. बळीराजासोबतच नोकरदार, व्यावसायिक सर्वांनाच महागाई भडकण्याची चिंता आहे. यात मुख्यत्वे करून धान्याची व कडधान्याची चिंता आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढण्यासह धान्याची उपलब्धता कशी असेल, याचा सर्वच विचार करीत आहे. या पार्श्वभूमीवर धान्य साठ्याचा आढावा घेतला तर यामध्ये भारतीय अन्न महामंडळाकडून सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी पुरेसा पुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे.साठ्याची चिंता नाहीभारतीय अन्न महामंडळाच्या मनमाड येथील केंद्रावरून जळगाव जिल्ह्याला सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी धान्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये सदर केंद्रावर पुरेसा गहू व तांदळाचा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. भारतीय अन्न महामंडळाकडे देशभरातून धान्याचा साठा येत असतो. त्यामुळे मध्यप्रदेश, राजस्थान व इतर ठिकाणाहून आलेला गेल्या वर्षाचा गव्हाचा साठा असल्याची माहिती मिळाली.दरमहा एक लाख क्विंटल गहू तर ५५ हजार क्विंटल तांदळाची आवश्यकताजळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने डिसेंबर महिन्यासाठी एकूण ९९ हजार ६५९ क्विंटल गव्हाची तर ५४ हजार २३७ हजार क्विंटल तांदळाची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार हे नियतन उपलब्ध होणार असून दरमहा सरासरी एवढाच साठा जिल्ह्यासाठी आवश्यक असतो. त्यानुसार सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ हा साठा भारतीय अन्न महामंडळाकडून उपलब्ध होऊ शकणार आहे. यात विशेष म्हणजे रब्बी हंगामात गव्हाची अद्याप लागवड होणे बाकी असून रब्बीचे क्षेत्र वाढणार असल्याने यंदाही गहू मोठ्या प्रमाणात येऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव