जळगाव : जिल्हा कारागृहातून तीन आरोपी पळाल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली. सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गोरव विजय पाटील रा.तांबापुरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड'अमळनेर) असे पळालेल्या आरोपींची नावे आहेत. सुशील मगरे हा पोलीस दलातून बडतर्फ झालेला आहे. पुणे येथील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने दरोडा टाकला होता. एलसीबीच्या पथकाने त्याला डिसेंबर २०१९ मध्ये बडोदा येथून अटक केली होती.
जळगाव कारागृहातून तीन आरोपींचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 08:48 IST