शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Lok Sabha Election 2019 : मुद्दे पे चर्चा : शंभर कोटींची घोषणा कामांची मात्र प्रतीक्षा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:04 PM

जनतेच्या जिव्हाळ््याच्या विषयाचा लोकमतने घेतलेला आढावा

जळगाव : आॅगस्ट २०१८ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेचा पराभव करून पहिल्यांदाच महापालिकेत सत्ता काबीज केली. प्रचारादरम्यान शहराच्या विकासाचा मुद्दा घेवून गेल्यामुळे भाजपाला फायदा मिळाला. सत्ता मिळविल्यानंतर अवघ्या १५ दिवसात शासनाकडून शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर होवून आला. मात्र, आठ महिने होवून देखील या निधीतून होणाऱ्या कामांची प्रतीक्षा कायम आहे.नगरोथ्थान अंतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पहिले चार महिने या निधीतून होणाºया कामांचे कोणतेही नियोजन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले नाही. जानेवारी २०१९ मध्ये महानगरपालिकेच्या महासभेत या निधीतून होणाºया कामांचे नियोजन पूर्ण करून मंजूरी देण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे अंतीम मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे.अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेमुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तसेच लवकरच शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरु होणार असून त्यामुळे शासनाने रस्त्यांची कामे या दोन योजना संपल्यानंतरच करण्याचा सूचना दिल्या आहेत.अशा परिस्थितीत शहराच्या विकासासाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असताना त्यातून शहराचा विकासासाठी करण्यात येणाºया कामांचे नियोजन व्यवस्थित करणे गरजेचे आहे.तसेच या निधीला शासनाकडून लवकरच मान्यता मिळून कामांना देखील सुरुवात झाल्यास जळगावकरांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर देता येणार आहे.१०० कोटींचा प्रवास१६ आॅगस्ट २०१८ रोजी नगरोथ्थान अंतर्गत मनपाला १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला. ८ आॅक्टोबर २०१८ मध्ये हा निधी खर्च करण्यासाठी मनपाच्या हिश्श्याची ३० टक्क्याची रक्कम भरण्यासाठी शासनाकडून विशेष निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर अद्यापपर्यंत मनपाला विशेष निधीबाबत कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. जानेवारी २०१९ मध्ये महासभेने १०० कोटी तून होणाºया १५८ कामांची यादी तयार करून मंजुरीसाठी बांधकाम विभागाकडे पाठवली. त्यातून १२ एप्रिल रोजी ८८ कामांना बांधकाम विभागाने मंजूरी दिली असून, अंतीम मान्यतेसाठी हा प्रस्ताव आता शासनाकडे पाठविला आहे.दीड वर्षांपासून भुयारी गटार योजनेची प्रतीक्षा कायमजळगाव शहरासाठी १९६ कोटी रुपयांची भुयारी गटार योजना देखील मंजूर झाली असून गेल्या दीड वर्षांपासून ही योजना निविदांच्या फेºयात अडकली होती. दरम्यान, आता नवीन तंत्रज्ञानानुसार या योजनेचे काम करण्याचा सूचना शासनाकडून देण्यात आल्या असून, मनपाकडून यासाठी निविदा काढण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. दरम्यान, या योजनेला सुरुवात एप्रिल २०१८ मध्ये होणे अपेक्षित असताना दीड वर्ष उशीर झाला आहे.तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?नगरोथ्थान अंतर्गत मंजूर झालेल्या निधीला शासनाकडून लवकरच मंजूरी मिळण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. तसेच ८८ कामे ही रस्त्यांची असून, पावसाळ्याआधी निविदा प्रक्रिया राबवली तर आॅगस्ट मध्ये कामांना सुरुवात होवू शकते.या निधीतून शहरातील महत्वाची कामे मार्गी लावणे गरजेचे असून, मुख्य पाच रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्याचींही समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. गटारींच्या कामांचे प्रस्ताव मनपाने दिले असून, ही कामे रद्द करून इतर कामे यातून करायला हवीत. कारण शहरासाठी भुयारी गटार योजना मंजूर असताना गटारींचे कामे योग्य ठरणार नाहीत. यासह उद्याने विकसीत करून शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होवू शकते.अमृत अंतर्गत शहरात कामे सुरु आहेत. सर्वच भागातील रस्ते करता येणे शक्य नसून, मुख्य पाच रस्त्यांवर भर देण्यात येणार आहे. प्रमुख रस्ते शहरातील इतर प्रश्न १०० कोटी रुपयांच्या निधीतून सोडविता येणार आहेत. शासनाकडून अंतीम मान्यता मिळाल्यानंतरच या कामांना सुरुवात होईल.- भगत बालाणी, मनपा गटनेते, भाजपामनपाला पहिल्यांदाच मोठा निधी शासनाकडून मिळाला असून, या निधीतून लवकरात लवकर कामे होणे गरजेचे आहे. घोषणा होऊन अनेक महिने होवून गेले असून, प्रशासनाने तत्काळ पाठपुरावा करून शासनाकडून मंजूरी मिळवली पाहिजे. शहरातील महत्वाच्या समस्या आहे, त्या समस्यांवर निधी खर्च व्हावा.- सुनील महाजन, मनपा विरोधी पक्षनेते

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव