शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

टाळेबंदीने ‘शिक्षणाच्या आईचा घो!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:54 IST

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीने आपले मासिक आवर्तन नुकतेच पूर्ण केले असून याकाळात शिक्षण क्षेत्राची पूर्ण वीण उसवली गेली आहे.

ठळक मुद्देगोंधळाची स्थितीशिक्षकांमध्ये संभ्रमनिकालाविषयीच्या सूचनेची प्रतीक्षा

जिजाबराव वाघ चाळीसगाव, जि.जळगाव : कोरोनापासून बचाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीने आपले मासिक आवर्तन नुकतेच पूर्ण केले असून याकाळात शिक्षण क्षेत्राची पूर्ण वीण उसवली गेली आहे. शैक्षणिक वर्षाची घडी विस्कटली आहे. इयत्ता पहिली ते आठवीसह नववी आणि अकरावीचा निकाल कसा लावयचा? याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. शासनाच्या वतीनेदेखील याबाबत अजूनही योग्य सूचना नाहीत. एकूणच गोंधळाची स्थिती आहे.कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी गर्दी होणारी सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, बालकमंदिरे हे त्याचे मुख्य घटक. ऐन परीक्षेच्या काळातच शाळांमधील किलबिलाट थांबला असून नेहमी गजबजणाऱ्या शाळा, महाविद्यालयांचे प्रवेशव्दार 'कुलूपबंद' आहे.गत एक महिन्यात शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत आणि नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना 'वरच्या' वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याच विद्यार्थ्यांचा 'निकाल' कसा लावयचा? याबाबत कुठलीही ठोस सूचना नाही. मार्गदर्शनदेखील नाही. त्यामुळे शिक्षक वर्ग संभ्रमावस्थेत आहे.३ मेपर्यंत निकालाबाबत काहीही करू नये, अशा सूचना असल्याचे मुख्याध्यापक सांगतात. टाळेबंदी मार्चमध्ये जाहीर झाली. तिचा लंबक मेपर्यंत पुढे सरकला आहे. त्यामुळे निकाल लावायचा कधी आणि पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होणार कधी? अशा प्रश्नांची प्रश्नपत्रिकाच तयार झाली असून शासनाकडून 'उत्तरपत्रिकेची' प्रतीक्षा आहे.आॅनलाईनचा 'फज्जा'मराठी माध्यमातील शाळांचे शैक्षणिक वर्ष जून ते एप्रिल असते, तर सीबीएस माध्यमातील शाळांचे शैक्षणिक वर्षाची घंटा १ एप्रिल रोजी वाजते. परीक्षाच रद्द झाल्याने आणि निकाल कसा लावयाचा याविषयी संदिग्धता असल्याने मराठी माध्यमात अध्यापन करणारे शिक्षक कमालीचे गोंधळलेले आहे. त्यामुळे आॅनलाईन अभ्यासक्रम शिकवण्याचे प्रयोग कमी झाले.केंद्रीय बोर्ड असणाºया शाळांमध्ये १ एप्रिलपासून आॅनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटचे नेटवर्क नसणे. हा आडसर आहेच. बहुतांशी पालक व विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रक्रिया कशी करायची याची माहिती नाही. शैक्षणिक क्षेत्रातही डिजिटल शिक्षित शिक्षक मनुष्यबळ फारसे नाही. त्यामुळे आॅनलाईन अध्यापनाचा फज्जा उडाला आहे.दहावीच्या इतिहासाच्या उत्तरपत्रिकेचे गठ्ठे पडूनचइयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा शेवटचा पेपर टाळेबंदीमुळे रद्द झाला. याअगोदर झालेल्या इतिहासाच्या पेपरचे गठ्ठे भूगोलाच्या उत्तरपत्रिकांसोबत पाठवायचे असल्याने तालुकास्तरावर असणा-या कस्टडी रुममध्ये पडून आहे. याचा थेट परिणाम दहावीच्या निकालावरही होणार आहे.६ लाख २२ हजार विद्यार्थीइयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा आकारिक मुल्यमापनानुसारच होईल. मात्र याबाबत स्पष्ट सूचना नाहीत. विद्यार्थ्यांना 'वरच्या' वर्गात पाठविण्याचे शासनाने निर्देशित केले आहे. यानुसार जिल्ह्यातील सहा लाख २२ हजार ६६९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील इयत्तेत जातील.टाळेबंदीमुळे एकूणच गोंधळाची स्थिती आहे. निकालाबाबत स्पष्ट मार्गदर्शन नाही. नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याविषयीदेखील तर्कवितर्क आहे. इंटरनेट उपलब्धता पाहता आॅनलाईन अध्यापनाचे प्रयोग फारसे यशस्वी झाले नाहीत. एकावेळी ७० ते ८० विद्यार्थी आॅनलाईन होणे शक्य नाही. त्यामुळे शासनाच्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा शिक्षण क्षेत्रातील सर्वांना आहे.- डॅनियल दाखलेमुख्याध्यापक, गुड शेफर्ड विद्यालय, चाळीसगाव. 

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव