शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
2
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
3
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
4
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
5
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
6
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
7
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
8
Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
9
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
10
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
11
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
12
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
13
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
14
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
15
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
16
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
17
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
18
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
19
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
20
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे पाण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 16:25 IST

हिंगोणा गावात पाणीपुरवठा हा ४० ते ४५ दिवसांनी होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा आणला आणि कार्यालयाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देसंतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर धडक मोर्चाअचानक आलेल्या मोर्चाने प्रशासनाची उडाली धांदलमोर्चामुळे ग्रामपंचायतीची सभा रद्दगावाला होतो ४० ते ४५ दिवसांनी पाणीपुरवठाजलसंकट असतानाही माथेफिरूने गावातील मुख्य जलवाहिनी फोडलीपुन्हा पाणीपुरवठ्यात होतोय खंडग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची संतप्त महिलांची मागणी

रणजित भालेरावहिंगोणा, ता.यावल, जि.जळगाव : गावात पाणीपुरवठा हा ४० ते ४५ दिवसांनी होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा आणला आणि कार्यालयाला कुलूप ठोकले. या ग्राम पंचायतीवर प्रशासक बसवावा, अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे.सध्या मे महिना सुरू आहे. उन्हाच्या तीव्रतेत दिवसेंदिवस भरपूर वाढ आहे. परिणामी परिसरातील विहिरींच्या जलपातळीत झपाट्याने घट होत आहे. याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याअभावी केळी बाग फेकून दिली आहे तर ग्रामस्थांना पिण्याचे पाणी हे तब्बल ४० ते ४५ दिवसांनी मिळत आहे. याचाच उद्रेक म्हणून १० मे रोजी सकाळी १० वाजता गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा आणला आणि आपला संताप व्यक्त केला.विशेष म्हणजे १० रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पाणीटंचाई निवारणासाठी विशेष मासिक सभा बोलविलेली होती. ही सभा सुरू होण्याअगोदरच गावातील महिलांचा मोर्चा धडकल्याने ग्रामविकास अधिकारी व कार्यकारी मंडळाची एकच धांदल उडाली. त्यामुळे ही सभा होऊ शकली नाही. गावापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मोर मध्यम प्रकल्पाचा गावाला काडीमात्र फायदा नाही. तसेच गावात मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत अंदाजित ४७ लाख रुपये एवढा निधी जलवाहिनीसाठी व जलकुंभासाठी त्यात ट्यूबबवेल व विहीर यांचा समावेश नसल्याने या योजनेचा गावासाठी काय फायदा? म्हणजे शासनाचे ४७ लाख हे वाया जातील, असे बोलून दाखविले.गावात एवढे जलसंकट असतानासुद्धा कोणीतरी माथेफिरू अज्ञात इसमाने गावातील मुख्य जलवाहिनी फोडून टाकली आहे. त्यामुळे ४० ते ४५ दिवसांनी होणाºया पाणीपुरवठ्यात खंड पडला आहे. म्हणजेच जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार गावात सध्या घडत आहे, अशी संतप्त भावना या वेळी बोलून दाखविण्यात आली.प्रतिक्रियागावातील पाणीटंचाई बघता तात्पुरत्या स्वरूपात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काही शेतकऱ्यांकडून त्यांच्या विहिरीचे पाणी जोडले आहे.-आर.ई. चौधरी, ग्रामविकास अधिकारीगावातील भीषण पाणीटंचाई बघता गावाच्या आजूबाजूच्या विहिरींची पाहणी करून यावल तहसीलदारांंना ६ मे रोजी झालेल्या बैठकीत ८ विहिरी अधिग्रहण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.-डी.एच.गवई, तलाठी, हिंगोणादिवसेंदिवस जलपातळीत घट होत आहे. जलपातळी ४०० ते ५०० फूट खोल गेली असल्याने गावात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी काही शेतकºयांकडून पाणी घेतले आहे. ग्रामपंचायत मालकीच्या जलस्वराज्य विहिरीत कॉम्प्रेसर टाकून पाणी प्रश्र लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.-सत्यभामा शालिक भालेराव, सरपंच, हिंगोणा, ता.यावल

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल