शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे पाण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 16:25 IST

हिंगोणा गावात पाणीपुरवठा हा ४० ते ४५ दिवसांनी होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा आणला आणि कार्यालयाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देसंतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर धडक मोर्चाअचानक आलेल्या मोर्चाने प्रशासनाची उडाली धांदलमोर्चामुळे ग्रामपंचायतीची सभा रद्दगावाला होतो ४० ते ४५ दिवसांनी पाणीपुरवठाजलसंकट असतानाही माथेफिरूने गावातील मुख्य जलवाहिनी फोडलीपुन्हा पाणीपुरवठ्यात होतोय खंडग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची संतप्त महिलांची मागणी

रणजित भालेरावहिंगोणा, ता.यावल, जि.जळगाव : गावात पाणीपुरवठा हा ४० ते ४५ दिवसांनी होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा आणला आणि कार्यालयाला कुलूप ठोकले. या ग्राम पंचायतीवर प्रशासक बसवावा, अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे.सध्या मे महिना सुरू आहे. उन्हाच्या तीव्रतेत दिवसेंदिवस भरपूर वाढ आहे. परिणामी परिसरातील विहिरींच्या जलपातळीत झपाट्याने घट होत आहे. याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याअभावी केळी बाग फेकून दिली आहे तर ग्रामस्थांना पिण्याचे पाणी हे तब्बल ४० ते ४५ दिवसांनी मिळत आहे. याचाच उद्रेक म्हणून १० मे रोजी सकाळी १० वाजता गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा आणला आणि आपला संताप व्यक्त केला.विशेष म्हणजे १० रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पाणीटंचाई निवारणासाठी विशेष मासिक सभा बोलविलेली होती. ही सभा सुरू होण्याअगोदरच गावातील महिलांचा मोर्चा धडकल्याने ग्रामविकास अधिकारी व कार्यकारी मंडळाची एकच धांदल उडाली. त्यामुळे ही सभा होऊ शकली नाही. गावापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मोर मध्यम प्रकल्पाचा गावाला काडीमात्र फायदा नाही. तसेच गावात मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत अंदाजित ४७ लाख रुपये एवढा निधी जलवाहिनीसाठी व जलकुंभासाठी त्यात ट्यूबबवेल व विहीर यांचा समावेश नसल्याने या योजनेचा गावासाठी काय फायदा? म्हणजे शासनाचे ४७ लाख हे वाया जातील, असे बोलून दाखविले.गावात एवढे जलसंकट असतानासुद्धा कोणीतरी माथेफिरू अज्ञात इसमाने गावातील मुख्य जलवाहिनी फोडून टाकली आहे. त्यामुळे ४० ते ४५ दिवसांनी होणाºया पाणीपुरवठ्यात खंड पडला आहे. म्हणजेच जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार गावात सध्या घडत आहे, अशी संतप्त भावना या वेळी बोलून दाखविण्यात आली.प्रतिक्रियागावातील पाणीटंचाई बघता तात्पुरत्या स्वरूपात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काही शेतकऱ्यांकडून त्यांच्या विहिरीचे पाणी जोडले आहे.-आर.ई. चौधरी, ग्रामविकास अधिकारीगावातील भीषण पाणीटंचाई बघता गावाच्या आजूबाजूच्या विहिरींची पाहणी करून यावल तहसीलदारांंना ६ मे रोजी झालेल्या बैठकीत ८ विहिरी अधिग्रहण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.-डी.एच.गवई, तलाठी, हिंगोणादिवसेंदिवस जलपातळीत घट होत आहे. जलपातळी ४०० ते ५०० फूट खोल गेली असल्याने गावात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी काही शेतकºयांकडून पाणी घेतले आहे. ग्रामपंचायत मालकीच्या जलस्वराज्य विहिरीत कॉम्प्रेसर टाकून पाणी प्रश्र लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.-सत्यभामा शालिक भालेराव, सरपंच, हिंगोणा, ता.यावल

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल